ईद-ए-मिलादुनबीच्या उत्सव कोरोनाच्या सावटाखाली साजरा

 कोरोनाच्या सावटामुळे रंगहीन रॅली,काही लोक रॅलीत सामील झाले.      

   संपादक आशिष मुगटकर


                    

मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

इस्लामी महिन्यांचा तिसरा महिना रब्बी अवलचा 12 वा दिवस,  शांततेचे प्रतिक, मानवतेचा मशीहा आणि जगातील बंधुभाव आणि इस्लामचे प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त जगासह संपूर्ण देश आनंदात साजरा केला जातो. परंतु जगात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना साथीचा रोग पसरल्यमुळे शहरात ईद-ए-मिलादुनबी उत्सवात रंगहीन असा वातावरण पहावयास मिळाले.

दरवर्षी शहरातील विविध कार्यक्रम ईद-ए-मिलादुन्बी उत्सव समितीद्वारे आयोजित केले जातात, परंतु शहरात या वर्षी शहरातील रब्बी अवल महिना १ ते १२ राब्बी अवल म्हणजेच आजपर्यंत शहरातील इस्लामपुरा भागातील खत्मे कुरान ( पठण), व जिर्क्र. इस्लामपुरा मशिदीचे उपाध्यक्ष जिया इद्रिस यांनी सांगितल के १२ सलग बारा दिवस लहान मुलानी कुरानाचा पठन मध्ये सहभाग न नोंदविला आणी प्रत्येक दिवशी समाजातील विविध लोकांनी जेवनाची व्यवस्था केली गेल की शहरात आज ही रॅली रद्द करण्यात आली, प्रेषित मोहम्मद साहेबांच्या अभिमानाने झालेल्या या रॅलीत इस्लामपूर मशिदीचे धार्मिक गुरु यांच्यासह काही लोकांचा समावेश होता. म्हणजेच अलीम साहब इम्रान रझा, माजी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक करीम खान साब, इम्रान मछीवाले, अध्यक्ष मोहम्मद अहमद सरवर्सब, मोहम्मद अजीज, युसुफ भाई खजसाब, इत्यादी काही मुले या रॅली रेल्वे स्थानकाच्या मदीना नगर, मिलत्त नगर, रेल्वे गेट, ईदगाह समोरुन होत गुजरी मार्ग इस्लामपूरा मशीद ला पहुचली तदनंतर धार्मिक गुरु अलीम इम्रान रझा यांनी प्रेषीत मोहम्मद साहेबांच्या जीवनावर भर टाकला व मुलांनी नाते कलीम वाचली 

दरवर्षी प्रमाणे, मोहम्मद साहेबांच्या जन्म दिना वर  लहान मुलांत आणी मोठ्या माणसात जास्त आंनद दिसला नसला तरी रॅली शांतपणे आपल्या नियोजीत स्थळी पोहचली पोलीस निरिक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शन मध्ये पोलिस बंदोबस्त चोख होता .

मुदखेड पंचायत समितीचा प्रभारी कारभार कश्यासाठी

 तालुक्यातील मनरेगा खर्च करण्याची लागली घाई 


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड  पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कदम यांची महानगरपालिकेत बदली झाल्याने इथे रिक्त जागा रिक्त आहे. नवीन बिडीओ पाठवुन रिक्त जागा  भरण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप कष्ट घेतले नाहीत. विशेष म्हणजे पालकमंत्री यांच्या चव्हाण यांच्या मतदारसंघात ही पंचायत समिती आहे. या समितीत तीन सदस्य तीन पक्षाचे आहेत. त्यामुळे शासन स्तरावर चे नवीन गट विकास अधिकारी हवे होते. ग्रामीण विकास स्वच्छ प्रशासना कडुन  करण्यात कोण कुठे पुढाकार घ्यावा याची  चर्चा  कार्यकर्ते करीत  आहेत. 

 चार वेळा मिळालेल्या  संधीचे सोने करण्यात पंचायत समिती मध्ये गेले सहा वर्षांपूर्वी पासुन कार्यरत अधिकारी मारोती जाधव हे अग्रेसर झाले आहेत. सध्या मनरेगा चा निधी खर्च करून रोजगार सेवकांनी सादर केले ते देयक काढले जात आहेत. मनरेगा कामाची सर्व बाजूंनी  पाहणी करून ही रक्कम दिली पाहिजे. परंतु सध्या घाई घाईने हा निधी खर्च करून पंचायत समिती मुदखेड मोकळी होणार आहे. 

ही घाई कश्यासाठी असा प्रश्न सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित करित आहेत. काही माहिती अधिकार कार्यकर्ते मनरेगा कामा ची संपूर्ण माहिती मिळावी अशी मागणी करत आहेत. मनरेगा कामाचे सामाजिक अंकेक्षण करावे लागेल तरच मनरेगा च्या निधीतून  ग्राम पंचायत कडुन झालेल्या कामात किती खरे आहे हे  ग्रामीण जनतेला तसेच  माहीती अधिकार कार्यकर्त्यांना स्पष्ट कळणार आहे. 

मागील पाच वर्षां पूर्वी  झालेल्या मनरेगा कामाची माहिती तालुका स्तरावर आमदार  यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आली होती परंतु पाच सहा वर्षे झाली आमदार किंवा खासदार यांनी आम सभेत प्रमुख  उपस्थिती लावली नसल्याने तालुका प्रशासकीय तसेच पंचायत समिती काम कसे चालते हे सर्व नागरिकांना स्पष्ट दिसत नाही याची चर्चा सुरू झाली आहे.

मनरेगा अंतर्गत अकुशल रोजगाराची पूर्तता, दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरुपी मालमत्ता तयार होईल अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी करणे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत कामाचे स्वरुप व प्राधन्यता (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ मधील शेडयुल १ नुसार)

१. जलसंधारण व जलसंवर्धन कामे

२. दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)

३. जलसिंचन कालव्यांची कामे (लघु व सुक्ष्म जलसिंचन कामासहित)

४. अनुसूचित जातीजमाती, द्रारिद्रयरेषेखालील, भुसुधार खालील व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कर्जबाजारी लहान व अल्पशेतकरी यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणारी कामे, फळझाड व भूसुधार कामे.

५. पारंपारिक पाणीसाठयांच्या योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.

६. भूविकासाची कामे

७. पूरनियंत्रण, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चा-याची कामे

८. ग्रामीण भागात बारमाही जोडरस्त्यांची कामे

९. राजीव गांधी भवन

१०. केंद्रशासनाशी सल्लामसलत करुन राज्यशासनाने ठरविलेली कामे.

वरील योजनांचा समावेश मनरेगा मध्ये आहे परंतु तालुक्यातील  ग्रामपंचायतीत वरील योजनाकिती प्रभावीपणे राबवल्या जातात यांची माहिती सुद्धा गावातील लोकांना असेल कि नाही यात शंकाच आहे.

खालसा पंथ की पुजनीय माता

 माता साहिब देवांजी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ.


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरात गोदावरीच्या काठावरील सत युगतील पतीत पावन  तपोभूमी असलेल्या ऐतिहासिक गुरुव्दार हा "माता साहिब देवांजीच्या" नावाने ओळखला जातो.

या ठिकाणी माता साहिब देवांजीचा ३३८वा जन्मोत्सव सोहळा  दरवर्षी प्रमाने साजरा केला.त्याच पध्दतीने याही वर्षी माता साहिब देवांजी यांच्या ३३९व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे. 

या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दि.२६ सोमवार पासून ते दि.२८पर्यत असनार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याचे उद् घाटन सिंगसाब जत्थेदार बाबा कुलवंत सिंगजी तख्त सचखंड श्री हजूर साहीब नांदेड ,गुरुव्दारा श्री लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंगजी कारसेवावाले,गुरुव्दारा माता साहिबचे प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.


या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दि.२६रोजी सोमवारी पासून  धार्मिक दिवान मध्ये कीर्तनकार,हजूरी रागी,भाई गुरुप्रताप सिंगजी,भाई जीवन सिंगजी, भाई जगतेश्वर सिंगजी पटीयाला,रागी जत्था, गुरुव्दारा माता साहिब देवांजी लाडली फौज यांच्या सुमधुर वाणीतुन कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ रोजी घोड्यांच्या चित्तथरारक कसरती चे प्रात्यक्षिक व नेमबाजी चे आयोजन केले आहे.दि.२८ रोजी या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता महानगर कीर्तन करत गुरुव्दारा हिराघाट या ठिकाणी होनार आहे.

सिंगसाब जत्थेदार बाबा कुलवंतसिंगजी(तख्त सचखंड श्री हजूर साहीब नांदेड),पंचप्यारे साहीबान,कारसेवावाले बाबा नरिंदरसिंगजी,बाबा बलविंदरसिंगजी,हजूरी साथ संगत व दलपंथ यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.


या जन्मोत्सव सोहळ्यात सुप्रसिद्ध रागी, कथाकार, कीर्तनकार व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहे. गुरुव्दारा परिसरात वैद्यकीय सेवा पथकाची नियुक्ती केली आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळन्याचे आवाहन प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंगजी चेलाबाबा प्रेमसिंगजी पिता गुरुगोविंदसिंगजी,गुरुव्दारा माता साहिब देवांजी बुढादल मुगट  यांनी केले आहे.भाविकासांठी याठिकाणी विशेष लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. मुदखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

छावा मराठा संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी इंजि.प्रवीण जाधव यांची निवड.

 नांदेड़ जिल्हा छावा प्रवक्तापदी प्रा. प्रभाकर जाधव, जिल्हा संघटक डॉ. कमलाकर कणसे यांची निवड.


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

नांदेड़ आज विजयादशमीच्या निमित्ताने छावा मराठा संघटना महाराष्ट्र, शाखा नांदेड़ यांची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात सदैव कार्यरत असलेली छावा मराठा संघटना ही मागील २५ वर्षापासून विधायक मार्गावर विश्वास ठेवून लढा देणारे संघटना आहे.आजच्या नव्या पिढीला छावाची रचनात्मक  कार्यपद्धती  कशी आहे.ती ओळख व्हावी. म्हणून छावाचे अनुभवी कार्यकर्ते व नवीन कार्येकर्ते यांच्यात विचारांची देवाण घेवाण व्हावी व नवीन कार्यकारिणी सदस्याची निवड करण्याच्या औचित्यने छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि.तानाजी हुस्सेकर  यांच्या अध्यक्षतेखाली ही विचार मंथन बैठक संपन्न झाली.

या बैठकीला दिल्ली सुप्रीम कोर्टातील नांदेडचे प्रसिद्ध विधीतज्ञ तथा छावाचे माजी कार्यकारी सदस्य एडवोकेट अमोल सूर्यवंशी तसेच लोहा येथील उद्योजक कथा औषध निर्माता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय शिरसागर, दीपक पावडे,  दीपक पाटील राजूरकर, उमाकांत उमरेकर,  खुशाल जाधव, स्वप्नील इंगळे या अनुभवी छावात काम करणाऱ्या कार्यकारी मंडळ सदस्यांच्या उपस्थित सद्यकालीन समाजापुढे असलेल्या नवनवीन समस्यांच्या संदर्भात विचार मंथन करून या समस्यांना सामोरे जाण्याचे छावा संघटनेचे संघटन अधिक मजबूत झाले पाहिजे. त्यासाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्याचा ठराव घेण्यात आला. यामध्ये जिल्हा प्रवक्ता या पदावर प्रा. डॉ. प्रभाकर जाधव जिल्हा संघटक प्रा. डॉ. कमलाकर कनसे आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इंजि.प्रवीण जाधव यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.


 ह्या नवनिर्वाचित सदस्यांना लगेच प्रदेश कार्याध्यक्ष इंजिनियर तानाजी हुस्सेकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या बैठकीला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या नव्या कार्यकारिणीला उपस्थित सर्वांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले.

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पलटी

 टिप्पर पलटी होऊन; दहा मजूर जखमी.

टिपर पलटी :- महाटी शिवारात मुख्य रस्त्यावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा टिप्पर पलटी होऊन दहा मजूर जखमी


मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील महाठी शिवारात्र  अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा  टिप्पर पलटी होऊन दहा जण जखमी.  एका मुजरा चे दोन पाय निकामी झाली  आहेत.
मुदखेड तालुक्यातील येळी, महाठी, माळकौठा या परिसरात अवैधपणे रेतीची वाहतूक ही चालूच असून या मुख्य रस्त्यावर रेती माफिया कडून अवैध रेतीचे साठे जमा केले आहेत. तीच साठा केलेल्या रेतीचे टिपर एम एच१४ ए एस९२१७ गाडी नंबर सकाळी ७ च्या सुमारास  माळकौठा येथे भरून महाठी मार्गे नांदेड कडे निघालेले असतात महाठी येथील एका वळणावर हे टिपर पलटी होऊन त्यात बसलेले १०  मजुरांचे प्राण थोडक्यात वाचले.
या घटनेत त्यातील एका मजुराला मात्र आपले दोन्ही पाय  गमवावे लागले,  इतर नऊ मजुरांच्या डोक्याला, हाताला, पायाला चांगलाच मार लागला आहे.जखमी झालेल्या मजुर हे येळी, दरेगाव येथील आहेत.त्यांची नावे पुढील प्रमाणे 
अंबादास व्यंकटी कांबळे वय १६ मार दोन्ही पाय निकामी झाले. केशव गाढे दरेगाव वय ३० मार टाचला मार, तिरुपती नामदेव ढगे वय ३५ डोक्याला मार , व्यंकटी पवार ड्रायवर वय २४ मार कानाला खुब्याला ,नारायण लांडगे वय ३४ मार हाताला, पायाला वामन ढगे वय ३४मार तोंडाला ,केशव कांबळे वय १६ मार हाताला,पायाला , डोळ्याला ,मोहन टोकलवाड वय ३६मार पाठीला ,कैलास पवार वय ३४ मार कंबर, सुरकतवार वय १९ मार पाठीला आहे. जखमी ना शासकीय रुग्णालयात नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे.





मुगटला मुख्यकार्यकारी अधिकारी मा.वर्षा ठाकूर यांची भेट

विविध विकास कामांचा घेतला आढावा.

संपादक आशिष मुगटकर

सुसंवाद :- मुदखेड तालुका दौऱ्यावर आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.वर्षा ठाकूर यांनी मुगट गावातील शालेय विद्यार्थीनी शी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले.

मुगट/प्रतिनिधी

  दि.२२ रोजी मा. वर्षा ठाकूर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नांदेड यांनी मुदखेड तालुक्याचा दौरा केला. त्यांनी ग्रामपंचायत मुगट,प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे भेट दिली. विविध कामांचा आढावा घेतला.

 प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कासराळीकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणाताई कल्याणे, जिल्हा आरोग्य अधिकारी मुंडे, मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव, नांदेड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, विस्ताराधिकारी गायकवाड, कनिष्ठ अभियंता घोडके, व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मुगट ग्रामपंचायत कडून ग्रामविकास अधिकारी भुरे यांनी त्यांचे स्वागत केले.मुगट ग्रामपंचायत ला भेट देऊन गावातून परत येताना वाटेत त्यांना एक दृश्य दिसले. दोन मुली घरासमोर अभ्यास करत आहेत. तेव्हा त्यांनी ड्रायव्हर ला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून उतरून मुली जवळ गेल्या. त्यांची आस्थेवाईकपणे  विचारपूस केली. त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या मुलींचा अभ्यासाचा ध्यास बघून मॅडम आनंदीत झाल्या.

आपल्या मुदखेड तालुक्याचे हे बोलके चित्र आहे. सगळीकडे अशाच प्रकारे आपल्या तालुक्यातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत पण शिक्षण चालू आहे. हा संदेश या मुगटच्या दोन मुलींनी दिला आहे. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी या दोन मुलींची भेट घेऊन मुलींना मार्गदर्शन केले, त्यांचे कौतुक केले. 

                       

बारड येथे मराठा आरक्षणावर रास्ता रोको आंदोलन

 मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती बद्दल निषेध!.

निवेदन :- बारड येथे मराठा आरक्षणावर समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केले. मराठा आरक्षण त्वरित मिळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या कडे लेखी निवेदन देण्यात आले.


बारड/ प्रतिनिधी

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती बद्दल त्याविरोधात सकल मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी निवेदनावर मराठ्यांना त्वरित आरक्षण द्यावे, मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने आणलेली स्थगिती त्यावर राज्य सरकार व केंद्र सरकार यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने समाजाची दीशाभूल करण्याचे कार्य चालू आहे याबाबत खेद व्यक्त केला आहे.

 यावेळी समाज बांधवांकडून घोषणाबाजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे. राज्यस्तरीय मराठा समिती व छत्रपती संभाजी राजे यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यानुसार राज्य शासन व केंद्र शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी बारड परिसरातील सकल मराठा समाज बांधवां कडून यावेळी करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेस कर सल्लागार उत्तमराव लोमटे, भाजप विधानसभा अध्यक्ष निलेशराव देशमुख, मनसे तालुका अध्यक्ष माधव पावडे यांनी मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले आहे. मराठा समाजाला आरक्षण त्वरित मिळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या कडे लेखी निवेदन देवून मागणी केली आहे.

यावेळी  निलेशराव देशमुख, उत्तमराव लोमटे, माधव पावडे, किसन देशमुख, दीपक पाटील, विजय देशमुख, शरद कवळे, सूर्यभान व्यवहारे,सतिष व्यवहारे, संदीप पुयड, कृष्णकांत देशमुख माधव लोमटे,श्रीनिवास महादवाड, आनंदराव नादरे विरेंद्र देशमुख,बाळासाहेब गव्हाणे, हनुमान देशमुख अमोल लोमटे, कपील पवार,आदीसह  मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक खोळंबली होती. रास्ता रोको आंदोलन संपल्यावर पोलिसांनी वाहतूक सुरळीत पणे चालू केली.

मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत पोलीस स्मृती दिवस साजरा

 संपादक आशिष मुगटकर

 पोलीस स्मृती दिवस :- मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत सर्व बलाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सर्वोच्च शहीदांची  आठवण करून  श्रद्धांजली वाहताना पोलीस महानिरीक्षक डॉ. टी. शेखर,अधिकारी व जवान.


मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

   नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्था येथे डॉ. टी शेखर पोलीस महानिरीक्षक यांनी मुदखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्था  प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला , यांच्या नेतृत्वात पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आला आहे.

यावेळी  पोलीस महानिरीक्षक सीटीसी मुदखेड डॉ. टी शेखर  यांचा आगमनानंतर पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस स्मृती दिवस यांची उपस्थित सर्व अधिकारी, जवानांना संबोधित करून या दिवसाच्या इतिहास बदल उपस्थितांना या दिवसाची ओळख करून देताना सांगितले की १९५९ आज रोजी सीआरपीएफ ची तिसरी बटालियन ची २१ जवानांची एक कंपनी  गस्त घालत असताना लदाख येथे 'हॉट स्प्रिंग' च्या माध्यमा तून चीनच्या जवानांची एक मोठ्या आक्रमण करण्याच्या उद्देशाने निष्क्रिय करण्यात भारताच्या जवंनाना यश प्राप्त झाले भारत मातृभूमीच्या रक्षणार्थ मोलाचं करत असताना आपल्या शूरवीर १० जवान शहीद झाले असल्याचे  संबोधन करताना सांगितले याकारणामुळे प्रत्येक वर्षी २१ ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

तर सर्व बलाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व सर्वोच्च शहीदांची  आठवण करून अंतर्कणाने श्रद्धांजली वाहिली आमच्या बलाबद्दल ही एक अभिमानाची गोष्ट आहे आमचे निर्भिड आणि पराक्रमी जवानांच्या बलीदाना बदल राष्ट्रीय पातळीवर पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याबाबत माहिती दिली आहे, 

पुढे बोलताना बळ हे बहादुरांचा बळ असून ज्यांनी वेळो वेळी विरतेचा प्रदर्शन करून बळास इतिहास घडवून अधिक वर्तमान परिस्थिती मध्ये  समृद्ध केले असल्याचे मनोगत व्यक्त केले आमुचा बळ हे विशाल बळ असून वाहत्या नदी प्रमाणे समान पथक्रमन केले आहे समोर येणाऱ्या हजारच्या अडथळ्यांना मागे टाकून आपल्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी अविरत पुढे जात आहे , देशाची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सम्पूर्ण देशाचा विश्वास आमच्या सोबत आहे जे आम्हाला अधिक बळकटी देत असते जर आम्हास आमच्या प्राणाची आहुती देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा आम्ही करण्यास आम्ही मागे पुढे हटणार नाही देशाच्या विश्वासास तडे देणार नाही.असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे

 पोलीस महानिरीक्षक डॉ. टी शेखर यांनी मागील एक वर्षात देशातील विविध पोलीस बलातील बलिदान दिलेल्या शहीद कर्मचारी यांची यादी वाचून दाखवली आहे

शेवटी पोलीस महानिरीक्षक डॉ. टी शेखर यांनी शहीद कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करून यांच्या बलिदान बदल नमन करून देशाची एकात्मता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपला सर्वोच्च पण पणाला लावण्यासाठी दृढ संकल्प घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे अधिकारी,जवान उपस्थित होते.

मुगट येथे केळी पिकावरील शेतीशाळा संपन्न

 हॉर्टसॅप प्रकल्प अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन


मुगट प्रतिनिधी

 दि.२०रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथे केळी पिकावरील किड व रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प (Hortsap) 2020 अंतर्गत शेतकरी शेतीशाळेस सुरूवात करण्यात आली.

उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव व तालुका कृषी अधिकारी भागवत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला एक शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आजच्या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. कृषी अधिकारी सुनील पुरी यांनी शेती शाळेचे महत्त्व व उद्देश तसेच केळी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक तथा पेस्ट स्काऊट राम कपाटे यांनी केळी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरस (CMV)   चे एकात्मिक रोग व्यवस्थापन तसेच केळी पिकावरील बुरशीजन्य रोग याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

त्यानंतर शिवार फेरी घेऊन शेतकऱ्यांनी केळी पिकावर निरीक्षणे घेतली.

शेतीशाळा यशस्वीते साठी कृषी सहाय्यक राजकुमारी देशमुख यांनी मेहनत घेतली. या शेतीशाळेस मं.कृ.अ. वाघमारे साहेब, कृषी पर्यवेक्षक हिलालपुरे , बी. टी. एम. गीते तसेच रमेश कल्याणे, माधव कल्याणे, विश्वनाथ कल्याणे, नागोराव गिरे, दिगंबर कल्याणे, साईनाथ पांचाळ व गावातील शेतकरी उपस्थित होते.

माजी नगरसेविका वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांच्या पुण्यस्मरणार्थ मास्क वअर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

 बिलोली नगर  परिषदेच्या माजी  नगरसेविका वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांचे गतवर्षी दि. १६ आॕक्टोबर२०१९ रोजी निधन झाले होते.त्याच्या स्मृती प्रित्यर्थ दिवंगत गायकवाड यांचे चिरंजीव पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी शुक्रवारी बिलोली येथील तहसिलसमोर नागरिकांना मास्क आर्सेनिकअल्बम-30 या गोळ्यांचे वाटप नायब तहसिलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. नागेश लखमावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर, माजी नगराध्यक्ष भिमराव जेट्ठे, सेवानिवृत्त तलाठी माधवराव जाधव, पोलीस निरीक्षक  प्रफुल्ल अंकुशकर, नगरसेवक प्रकाश पोवाडे,शेख सुलेमान ,राजेंद्र कांबळे, अभिजित तुडमे,दिलीप उत्तरवाड, गंगाधर पुपलवार यांच्या हस्ते करण्यात  आले.


यावेळी माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, नगरसेवक जावेद कुरेशी, अमजद चाउस, आरोग्य पर्यवेक्षक हणमंत कटके, सुधीर येलमे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

मुदखेड शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्री, गुरांचा वावर बिनधास्तपणे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

 मुदखेड शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्री व मोकाट गुरांचा वावर बिनधास्तपणे सुरू असून नगरपरिषदेकडून या मोकाट फिरणाऱ्या गुरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी चावा घेऊन लहान मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात घडली होती अशी घटना मुदखेडात होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाकडून यावर पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

        शहरातील सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण हे शिवाजी नगर, नांदेड रस्ता,मोंढा भाग,पचलींग हाॅस्पिटल समोरच्या भागात भाजी बाजार भरतो आहे व अशा गर्दीच्या ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांचा व कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे परिणामी दुर्घटना घडू शकते यावर पालिकेकडून उपाययोजना करणे आवश्यक आहे.विशेष म्हणजे मोकाट फिरणाऱ्या गुरांसाठी पूर्वी गजाघाट अस्तीत्वात होते कालांतराने आता उपलब्ध नाही तसेच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणाही उपलब्ध नाही.याच मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांकडून गुजरी भागातील कत्तलखान्यातून मांसाचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले दिसून येतात यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन माने यांनी निवेदनही दिले होते परंतू आतापर्यंत त्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही हे विशेष म्हणावे लागेल.


मुदखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे व काही नगरसेवकही कोरोनाबाधित झाले होते ते यांतून सुखरूप घरी परतले पण सर्व सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नागरिकांतून विचारल्या जात आहे.मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयातही मोकाट कुत्री फिरताना दिसून आली यावर जरी या कुत्र्यांकडून कुणाला चावा घेण्यात आला तर याला जवाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

वासरी येथे महिला किसान दिना निमित्त भाजीपाला बियाण्याचे वाटप

 संपादक आशिष मुगटकर

महिला किसान दिन:- मुदखेड तालुक्यातील वासरी येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगुणाबाई खानसोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राम कपाटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शंकर मुतकलवाड उपस्थित होते.

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 दि. १६ रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गटातर्फे महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगुणाबाई खानसोळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राम कपाटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शंकर मुतकलवाड उपस्थित होते.

माँसाहेब जिजाऊं च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचलन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांनी केले. त्यानंतर कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी परसबागेतील भाजीपाला लागवड तसेच कृषी विभागाच्या महिलांसाठी असलेल्या योजना व शेतमाल प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करून सेंद्रिय खत तसेच कीटकनाशकाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याविषयी सांगितले. त्यानंतर शीलाताई लष्करे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांच्याकडून भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रयागबाई उमाटे, सोमित्रा खानसोळे, रेखा उमाटे, गंगासागर उमाटे, उषा उमाटे, संगीता खानसोळे, आशाबाई खानसोळे, सुंदराबाई लष्करे, संगीता उमाटे, व्यंकणबाई लष्करे व गावातील महिला शेतकरी यावेळी उपस्थित होत्या.

नरेंद्र मोदी विचारमंच च्या युवा जिल्हाध्यक्ष पदी सतिश पाटील मुंगल

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

        मुदखेड तालुक्यातील ईजळी( खा.) येथील रहिवाशी तथा भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते सतिश पाटील मुंगल यांची नांदेड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

    भारताचे पंतप्रधान तथा विश्वगुरु नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देश देशातील तळागळातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविन्यासाठी एक सामाजिक संघटन असावे या उद्देशाने प्रेरित होऊन तसेच नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देशाने प्रेरित होऊन काम करनार्या इतर संघटनांशी समन्वय साधून नरेंद्र मोदी विचार मंच देशभर आपले संघटन मजबूत करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंचाचे रास्ट्रीय अध्यक्ष रविभाई चाणक्य यांच्या सहमतीने,नरेंद्र मोदी विचार मंचचे नांदेड (ग्रा.)जिल्हाध्यक्ष महेश रमेशराव देशपांडे यांनी एका लेखी पत्राद्वारे सतिश पाटील मुंगल यांना नांदेड(ग्रा.) युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळविले आहे.

   माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास देशाचे यशस्वी पंतप्रधान तथा विश्वगुरु नरेंद्र भाई मोदी यांचे नावाने चालणाऱ्या सामाजिक संघटनेच्या युवाजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षानी दाखविला त्या विश्वासास पात्र राहून मोदीजींचे विचार,कार्य आणि उद्देश नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या युवका पर्यंत उतरविण्यासाठी प्रत्येक गावा गावात पोहचन्याचा निर्धार नुतन नांदेड (ग्रा.)  युवा जिल्हाध्यक्ष सतिश मुंगल यांनी व्यक्त केला.

या निवडी चे भाजपाचे ज्येष्ठ नेते मुदखेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी,भाजपा मराठवाडा (दि.वी.आ.)प्रभारी  प्रवीण गायकवाड,भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष हानुमंत देशमुख,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड,माजी सभापती भगवान पानेवार,संचालक तथा भाजपा ता.उपाध्यक्ष बालाजी

पाटील खटिंग,बालाजी तेलंग,माजी संचालक गुलाब सुर्यवंशी,निळकंठ हामंद,अल्पसंख्यांक मोर्चा भाजपचे शेख रफिक,मुदखेड शहर भाजपाचे प्रा.दिनेश शेटे,संजय सोनटक्के,नमो विचार मंचचे ता.अध्यक्ष भायेश्वर  पाटिल मुंगल,सुभाष यरपलवाड,प्रभाकर पांचाळ,म.कबीर गुलाम दस्तगिर,शे.सद्दाम,तुळशीराम चुकेवाड,सरपंच आनंद हेमके,केशव पाटिल ढगे,माधव वाघमारे,भुजंग पाटील वडजे, गणपत कल्याणे अदिनी अभिनंदन केले आहे.

ग्राम पंचायत कार्यालयात जागतिक हात धुवा दिन साजरा

 संपादक आशिष मुगटकर


बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड सह अनेक ग्रामपंचायत मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ' जागतिक हात धुवा दिनाच्या ' निमित्ताने  कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आला होते. 

बारड  सरपंच जयश्री बाई देशमुख, उप सरपंच बाळासाहेब देशमुख,  प्रतिनिधी विलासराव देशमुख सदस्य बालाजीराव अमरे यांनी  ग्राम पंचायत कार्यालयात हात धुण्यासाठी प्रात्यक्षिके पाहून सहभाग घेतला .

 ग्राम विकास अधिकारी अनुप श्रीवास्तव यांनी या संदर्भात माहिती दिली. 

ग्राम पंचायत कर्मचारी संदीप पाणबुडे अमोल दांडेकर सौ.पिठाडिया मॅडम, आठवले मॅडम कन्या शाळा बारड विद्यार्थिनी पल्लवी निलेवार ,समीक्षा कंधारे ,यांनी सूत्र संचालन केले. कोमल देशमुख व तृप्ती पंचभाई यांनी हात धुणे प्रक्रिया केले .  

  


शेंबोली ग्रामपंचायत मध्ये , ग्रामविकास अधिकारी  गिरधारी  मोळके यांनी जागतिक हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी गोवंदे, धुतमल, शहापूरे, कंडापले, आणि ज्येष्ठ नागरिक पठाण, दत्तात्रय दुबेवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस सह आदी मान्यवर उपस्थित होते.

मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालय महिला किसान दिन उत्साहात साजरा

 संपादक आशिष मुगटकर

महिला किसान दिन :- मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयच्या वतीने महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

दि.१५रोजी मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयच्या वतीने महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सिमाताई लष्करे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती.सुनिता बोचरे व डॉ. मंजूषा माचर्डे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक आर. जी. धुमाळे यांनी केले. त्यानंतर मेंडका येथील प्रगतशील महिला शेतकरी कावेरी घोसले यांनी शेती व्यवसायातील महिला सहभागाचे महत्व सांगून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायावर भर देण्याविषयी सांगितले. तसेच डॉ.मंजुषा माचर्डे यांनी शेती करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. म.कृ.अ. वाघमारे साहेब यांनी महिलांसाठी  कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.कृषी सहाय्यक अनिता मोरे यांनी महिला शेतीशाळा विषयी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये सीमाताई लष्करे यांनी महिला बचत गटाचे महिला सक्षमीकरण्यातले महत्त्व सांगून महिलांनी शेती निर्णय प्रक्रियेत पुढे येण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास तालुक्यातील महिला शेतकरी , सुनंदा कदम, रामबाई कुसुमवाड प्रतिभा तिडके विठ्ठल लष्करे, नागोराव गिरे, इंद्रजीत देशमुख, विश्वनाथ कल्याणे , तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक श्रीम. राजकुमारी देशमुख यांनी केले

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुदखेड तालुकाध्यक्ष पदी सौ. पुजा व्यवहारे

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड शहर प्रतिनिधी/अतीक अहेमद

  मुदखेड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सौ. पूजा माधवराव व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रवादी महिला  काँग्रेसच्या मुदखेड तालुकाध्यक्ष पदी सौ. पुजा माधवराव व्यवहारे  यांची निवड केली.सदर निवडीचे नियुक्तिपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष  शिवानंद पाटील शिप्परकर  यांच्या हस्ते देण्यात आले.

  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष यशोदीप पाटील, चक्रधर कळणे, माधवराव व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्षा सौ.पुजा माधवराव व्यवहारे यांनी या पदाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न व अडीअडचणी सोडवून पक्षवाढीसाठी काम करू असे सांगितले.

    या निवडीमुळे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई-नांदेड- मुंबई विशेष रेल्वे आज पासून सुरु

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

प्रवाशांच्या सुविधे करिता मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वे दि.११आज पासून सुरु करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे.ही रेल्वे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे  हि रेल्वे पूर्ण पने आरक्षित असेल. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीचा वेळा आणि दिनांक पुढील प्रमाणे असतील --

१.  गाडी संख्या ०११४१  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई ते हुजूर साहेब नांदेड - हि गाडी दिनांक ११ ऑक्टोबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३० वाजता पोहोचेल.

२. गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -- हि गाडी दिनांक १२ ओंक्टोबर २०२० पासून हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज सायंकाळी १७. ०० वाजता सुटेल आणि औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३५ वाजता पोहोचेल.

हि गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल.

या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि  आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.

हि विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होई पर्यंतच असेल.

प्रवाशांना रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल असे दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले आहे.  

प्रा. पंजाबराव शिंदे यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्रदान

 संपादक आशिष मुगटकर




बारड /प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयीन  प्रा. पंजाबराव शिंदे यांनी मराठी विषयात 'शंकर वाडेवाले व केशव सखाराम देशमुख यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास' हा शोध प्रबंध स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सदर केला होता. त्याची मौखिक अंतिम परीक्षा दि २२/०९/२०२० रोजी घेण्यात आली व त्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी ) ही पदवी प्रदान करण्यात आली .



यांबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड चे अध्यक्ष मा संजयराव देशमुख बारडकर,उपाध्यक्ष मा रमेशचंद्र महाजन,सचिन रामेश्वर कोरबनवाड,सहसचिव अशोक पाटील गव्हाणे,प्राचार्य हेमंत इंगळे, मुख्याध्यापक रामकीशन चुब्बेवार,केम्ब्रिज इंग्लिश स्कुलचे प्राचार्य सचिन पाटील गव्हाणे व संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ पंजाबराव शिंदे यांचे अभिनंदन केले

बारड भोकर महामार्गाचे काम संथ गतीने

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड येथे छत्रपती अंगरक्षक जिवाजी महाला यांची जयंती साजरी

संपादक आशिष मुगटकर


जयंती :- मुदखेड येथे छ.शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाला यांची जयंती साजरी करताना संजय पाटील कुरे शिवसेना तालुकाप्रमुख मुदखेड ,सचिन पाटील माने शहर प्रमुख मुदखेडसुरेश शेटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती  मुदखेड, गंगाधर कुचटवाड जीवा सेना नाभिक  तालुका अध्यक्ष मुदखेड,  ज्ञानेश्वर गायकवाड शहर उपाध्यक्ष जिवा सेना मुदखेड यांची उपस्थिती होती.

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रमुख अंगरक्षक जीवाजी महाला यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुदखेड येथील जीवा महाले चौकात जीवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 यावेळी संजय पा कुरे खुजडेकर शिवसेना तालुका प्रमुख मुदखेड,सचिन पा माने शिवसेना शहर प्रमुख मुदखेड, सुरेश शेटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती  मुदखेड, गंगाधर कुचटवाड जीवा सेना नाभिक  तालुका अध्यक्ष मुदखेड,  ज्ञानेश्वर गायकवाड शहर उपाध्यक्ष जिवा सेना मुदखेड  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान व छत्रपती शिवाजी महाराज भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी राजांनी अफजलखानास मारल्यावर अफजलखानाचा सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला परंतु जिवाजी महालाने सय्यद बंडा शि दोन हात करून आपला दांडपट्टा काढून त्याला पालथा पडले व छ.शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले यावेळी जिवाजी महाला चे वय अवघे 25 वर्षाच्या आत असावे.

रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कानोजी जिथे यांच्या जहागीर अंबवडे गावी वीर कानोजी येथे यांच्या समाधीस्थळाचे च्या बाजूला वीर मावळा तथा छत्रपती अंगरक्षक  जिवाजी महाला यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी राजे यांचे यावेळी प्राण वाचवल्यामुळे "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या प्रसंगावरून पडली.

छत्रपतींच्या या वीर मावळ्यास व योद्धास जन्म तिथि निमित्ताने विनम्र अभिवादन संजय पाटील कुरे शिवसेना तालुकाप्रमुख मुदखेड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.




 

नेते प्रवीण गायकवाड यांची भाजपा मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा

 संपादक आशिष मुगटकर




मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

   मुदखेड येथील भाजपा भोकर विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. 

अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाने नुकत्याच प्रदेश कार्यकारिणीच्या विविध अघाड्यांवर पदाधिकार्यांच्या नियुकत्या जाहिर  केल्या आहेत.

  नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र भाजपाचे कडवे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांची "मराठवाडा प्रभारी पदी"वर्णी लागली आहे.गायकवाड यांनी या अगोदर पक्षाच्या विविध महत्वाच्या पदावर काम करुन आपल्या शारिरीक क्षमतेवर मात करुत त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्य कार्यकारी समितीवर साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळालेले गायकवाड हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते आहेत.

      प्रवीण गायकवाड यांची मराठवाडा प्रभारी पदी वर्णी लागल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपाचे पदाधिकारी, आप्तईष्ट, मित्रपरिवार यांच्या कडून सत्कार होत आहे.

  त्यांच्या राहत्या घरी मुगटचे माजी उपसरपंच तथा भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंदराव कल्याणे  व भोकर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे युवा नेते तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार साहेबांचे कट्टर समर्थक गणपतराव पा.कल्याणे यांनी मुदखेड येथे मा.प्रविण गायकवाड साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.या कार्यक्रमास मुदखेड शहराध्यक्ष पप्पु उर्फ संजय सोनटक्के,.केशव ढगे संरपच वाई.बाबुराव कसबे उप सरपंच वाईकर .प्रभाकर पांचाळ.संंजय राठोड.विलास कल्याणे,जी.एस.पांचाळ आदी उपस्थित होते.


बालाजी गाडेकर यांची स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असो.महाराष्ट्राच्या लातूर विभाग सचिवपदी निवड

 संपादक आशिष मुगटकर

  नांदेड विशेष प्रतिनिधी / पि.एल.गाडेकर

      सध्या भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाचे मोठ्या प्रमाणात सावट असल्यामुळे अनेक बैठका मिटिंग इत्तर ऑनलाईन कारभार होत आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे ऑनलाइन बैठक ऑनलाइन झूम ॲपद्वारे "स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याची" नुकतीच सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील बारड या गावचे सुपुत्र राष्ट्रीय खेळाडू बालाजी एल गाडेकर यांची "लातूर विभाग प्रमुख सचिव पदी " सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बालाजी एल गाडेकर यांची क्रीडा क्षेत्रात विविध भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

   ट्रेडिशनल रेसलिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सी.ए.तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.४ ऑक्टोबर २०२० रोजी स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्यची  दि.४ ऑक्टोंबर रोजी झुम अॅपद्वारे ऑनलाईन सर्वसाधारण सभा(बैठक) संपन्न झाली.यावेळी सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष व सचिव आणि इतर पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीस्तव ऑनलाईन सहभाग घेतला. जवळपास ३ तास चाललेल्या या बैठकीत  महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून कोरोना प्रादुर्भाव काळा नंतर खेळाडूंच्या पुढील भवितव्या बाबद चर्चा करण्यात आली.तर बेल्ट रेसलिंग व पेनक्रेशन या खेळा विषयी माहिती देण्यात आली.तसेच महाराष्ट्रातील ८ विभागात या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता विभाग प्रमुखांची  निवड (नियुक्ती) करण्यात आली. यामध्ये प्रथमच नांदेड जिल्ह्याला लातुर विभागात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. बारड येथील एक जिद्दी कष्टाळू मेहनती पालक वर्गामध्ये विश्वासात पात्र ठरलेला एक राष्ट्रीय खेळाडू अनेक खेळांमध्ये पारांगत असलेला अनेकांच्या मनामध्ये क्रीडाविषयक  अनेकांच्या मनामध्ये खेळाविषयी मोठा विश्वास निर्माण करून त्यांना आंतरराष्ट्रीय पदापर्यंत घेऊन जाणारा इतरांच्या मनामध्ये खेळाविषयी प्रेम जागवणारा त्याच्या नेतृत्वाखाली अनेक आत्मसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना निर्भीड करणारे तसेच शेकडो मुलींना कराटे याद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे आणि देशासाठी पात्र खेळाडू तयार करणारे अशी त्याची ओळख निर्माण झाली होती याप्रसंगी सर्वानुमचे  लातूर विभाग प्रमुख सचिव पदी बालाजी एल.गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मधून विविध संघटना सामाजिक क्षेत्रातून व क्रीडा क्षेत्रातून त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केल्या जात आहे त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपाच्या मराठवाडा प्रभारी पदी प्रवीण गायकवाड यांची निवड

  संपादक आशिष मुगटकर



मुदखेड शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

   भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाने नुकत्याच प्रदेश कार्यकारिणीच्या विविध अघाड्यांवर पदाधिकार्यांच्या नियुकत्या जाहिर करण्यास सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक जयसिंग कृ.चव्हाण आणि प्रदेश प्रभारी प्रमोद जठार यांनी घोषित केलेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग विकास आघाडीचा जंबो विस्तार प्रसिद्धीस दिला आहे.

  यात प्रदेश सह, संयोजक,प्रभारी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अस्या विविध पदांचा प्रामुख्याने समावेश आहे.

     या जंबो कार्यकारिणीत नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र भाजपाचे कडवे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांची "मराठवाडा प्रभारी पदी"वर्णी लागली आहे.गायकवाड यांनी या अगोदर पक्षाच्या विविध महत्वाच्या पदावर काम करुन आपल्या शारिरीक क्षमतेवर मात करुत त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्य कार्यकारी समितीवर साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळालेले गायकवाड हे नांदेड जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्ते आहेत.पुन्हा एकदा मराठवाड्यातिल नांदेडसह लातूर,बिड,उस्मानाबाद,औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली या आठ जिल्ह्यात प्रभारी म्हणून काम करण्याची संधी देऊन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाने प्रवीण गायकवाड यांना गौरवान्वित केले आहे.

    या आघाडीचा विस्तार पुढिल प्रमाणे सह सहयोजक:1विजय मांडल कर (रायगड)2.डॉ भगवान चव्हाण (औरंगाबाद),विशेष सल्लागार: राजेंद्र पुरोहित(मुंबई),जनसंपर्क प्रभारी:हेनत (काकासाहेब)दिक्षीत नाशिक,शासकीय योजना व प्रकल्प:-सौ.अर्चना जोशी (कल्याण)

वैद्यकीय विषयक प्रभारी :- डॉ.राजू राऊत,क्रिडा प्रभारी:धनंजय दा.ऊपासनी(नागपूर),सह क्रिडा प्रभारी:योगेश मोकाशी (ठाने),कार्यालय प्रमुख:हार्शल साने (मुंबई),मराठवाडा विभाग प्रभारी :-. प्रवीण गायकवाड   (नांदेड ग्रा.)

कोकण विभाग प्रभारी :- साहजीकच कोळी (रत्नागिरी),मुंबई विभाग प्रभारी:विशाल पाटिल(मुंबई),पश्चिम महाराष्ट्र प्रभारी:संजय चौगुले (कोल्हापूर),उत्तर महाराष्ट्र प्रभारी :-सतिश चोरडीया(धुळे),पुर्व विधर्भ प्रभारी:अमोल वाळके(नागपूर ग्रा.) ठाणे विभाग प्रभारी :- मदन सकलेजा(ठाणे), पश्चिम विदर्भ प्रभारी :- लक्षमन भांबेरे(बुलढाणा)

सदस्य:1भास्कर हिवराळे(अमरावती ग्रा.),2गणेश पाटील(जळगाव),अनील कुलकर्णी (वाशिम),संजय वानखेडे (जळगाव),अशोकाला चौधरी(भंडारा ग्रा.),दिपक आनंत दळवी(सिंधुदूर्ग),सुहास कर्णिक (मुंबई),पराग आपटे(पुणे),मनोज पटवारी,श्रवण बाधित,(जालना),हिरालाल गुप्ता(नागपुर ग्रा.),मारुती मुंडे(उस्मानाबाद)

 या राज्याच्या जंबो विस्तारात प्रवीण गायकवाड यांची वर्णी लागल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश संयोजक जयशिंग कृ.चव्हाण यांनी देखील त्यांच्या  नियुक्ती पत्राद्वारे निवड झाल्याचे कळऊन पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


' केळी ' पीक विमा शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत पालकमंत्री आक्रमक

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश.
कृषी अधीक्षक, विमा प्रतिनिधींचे उडवाउडवीचे उत्तरे.
 

संपादक आशिष मुगटकर

तात्काळ बैठक :- नांदेड येथील बचत भवनात केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या तक्रारींची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दखल घेऊन आक्रमक भूमिका घेत कृषी अधीक्षक विमा प्रतिनिधी यांना धारेवर धरून जाब विचारताना.

बारड / प्रतिनिधी

    दि.५ - नांदेड जिल्ह्यातील कृषी मंडळांतर्गत काही गावे विमा कंपनीने वगळल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या तक्रारींची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दखल घेऊन आक्रमक भूमिका घेत कृषी अधीक्षक विमा प्रतिनिधी यांना धारेवर धरून जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश देऊन दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असा पवित्रा घेतला आहे.


       केळी लागवड तसेच निगराणी करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हवामानात सातत्याने होणारा बदल केळी उत्पादनावर परिणामकारक ठरतो. या धास्तीने केळी उत्पादक शेतकरी नेहमी विमा उतरवित असतो.विम्याची रक्कम केंद्र शासन राज्य शासन तसेच केळी उत्पादक शेतकरी विमा कंपनीला आदा करतात.जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या वर्षी च्या मोसमात पीक विमा काढला आहे.बदलत्या हवामानामुळे उष्णतेचा केळी पिकाला फटका बसला असून कृषी विभागाने पंचनामा अहवाल पाठविला आहे. परंतु हवामान आधारित तपासणी यंत्राच्या उष्णता मोजमापाचा दाखला देत या गावात केळी पीक विमा जास्त उत्तर देण्यात आला त्या गावांना वळविण्यात आले सल्याचे शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. तापमानात तफावत असल्याचे दाखवून विमा कंपनीने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील कृषी मंडळातील गावे वगळून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.यापूर्वी केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने न्यायालयात धाव घेऊन दादा मागण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

    नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड कृषी मंडळ अर्धापुर तालुका केळीचे माहेरघर असून याठिकाणी केळी मुख्य पीक आहे. त्यामुळे सहाजिकच बहुतांश केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला असून कंपनीने स्वीकारलाही आहे.परंतु जेव्हा नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा कंपनीने जास्त विमाधारक शेतकऱ्यांच्या गावांना वंचित ठेवण्याच्या तक्रारी आहेत.केळी नुकसानीचे पंचनामे करणे विमा कंपनीला मजबुरी झाल्याने हवामान तपासणी केंद्राचा आधार घेतला जातो. ज्या गावात विमाधारक शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे त्या गावासाठी तापमान निकषाचा आधार घेतला जातो अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अनेक कृषी मंडळांतर्गत गावे तापमान कमी दाखवून वगळण्यात आले असून विमा कंपनीचे गुराळ शेतकऱ्यां साठी काही नवीन नाही.यापूर्वी न्यायालयात धाव घेणाऱ्या शेतकर्‍यांसमोर विमा कंपनीने नांगी टाकत नुकसान भरपाई देणे भाग पडले आहे. न्यायालयात गेले ते लाभार्थी ठरले बाकी सर्व केळी उत्पादकांना वंचित रहावे लागले हे सत्य वास्तव आहे.


      जिल्ह्यातील कृषी मंडळ अंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांवर  हीचवेळ ओढवली असून वकिलाची फी दलालाची मनधरणी करत कोरोना संकटात अधिक आर्थिक भुर्दंड भरावा लागल्याची वेळ येऊ नये यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषी मंत्र्यांची भेट घेऊन गाराने मांडले असून याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड कृषी मंडळ तसेच अर्धापूर तालुक्याची कृषी मंडळ वगळण्यात आलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.

       पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ता.५(सोमवार) तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी दालनात तातडीची बैठक बोलावली होती.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ विपीन विटणकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावनगावकर, संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत शेतकरी प्रतिनिधी म्हणून उत्तमराव लोमटे हनुमंतराव राजेगोरे, कृषीभूषण शेषेराव दंडे, डॉ. किरण देशमुख प्रताप देशमुख, गंगाधरराव देशमुख पार्डीकर, बालाजी कल्याणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

    पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कृषी अधीक्षक विमा प्रतिनिधी वगळण्यात आलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विमा तक्रारी बाबत विचारणा केली परंतु शेतकर्‍यांच्या तक्रारी बाबत वगळण्यात आल्याचा हवामान विभागाचा पुरावा आढळून आला नाही. यावेळी पालकमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत विमा प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाब विचारून धारेवर धरले.

     जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना मुदखेड तालुक्यातील मुदखेड मंडळ मुगट मंडळ जसं निकषात बसवले त्यानुसारच बारड अर्धापूर मंडळ निकषात बसवता का आली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना पण  ४२ह.  किंवा ते ३३ह.  किंवा ३९ ह.या विमा क्लेमच्या निकषात का बसवताआले नाही असा जाब यावेळी विचारला आहे. शेतकर्‍यांच्या वतीने उत्तमराव लोमटे हनुमंतराव राजेगोरे डॉक्टर किरण देशमुख शेषराव दंडे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.कृषी विभागाने तसेच विमा प्रतिनिधीने समाधानकारक उत्तरे न दिल्याने उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे.

   या समितीत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, उपजिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, शेतकरी प्रतिनिधी यांची चौकशीसाठी समिती नेमून अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना देण्यात आली आहे.







केळी पीक विमा संदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बचत भवनात बैठक

 पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केळी पीक विम्या विषयी सविस्तर चर्चा.

शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडून केळीचा वीमा मिळान्याची केली मागणी.

संपादक आशिष मुगटकर

बैठक :- नांदेड येथील  बचत भवनात आयोजित बैठकीत केळी पीक विम्या विषयी आपले मत मांडताना शेतकरी प्रतिनिधी उत्तमराव लोमटे बारडकर, सोबत इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.

नांदेड प्रतिनिधी/आशिष कल्याणे

दि.५ रोजी नांदेड येथील जिल्हा नियोजन भवनात  जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती होती. बारड ,अर्धापूर येथील शेतकऱ्यांचा केळी पीक विमा बाबतच्या तक्रारी वर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना  केळीचा पीक वीमा  मिळान्याची आशा पल्लवीत झाली आहे.

 बारड व अर्धापुर परिसरातील केळीचे पीक घेवून, केळीचा वीमा भरलेले शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा   पीक विमा कंपनीने  शेतकऱ्यांना केळीच्या वीम्यापासुन वंचीत ठेवन्यात आले आहे. याबाबत अनेक मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी,बारड, अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या कडे, तसेच पीक विमा कंपनीकडे सुद्धा केल्या गेल्या. 

विमा कंपनीने यामध्ये केलेला अनागोंदी गैरकारभार हा पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांच्या निदर्शनाश शेतकऱ्यांनी यावेळी  आणुन दाखवला.त्यामुळे पीक विमा कंपनी गोत्यात येण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांनी  या विषयी विशेष लक्ष दिल्यामुळे केळी पीक विमा बाबत ताबडतोब एक उच्चस्तरीय समीती स्थापण करुन जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाचा सखोल अहवाल मागवला आहे.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबतीत कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरले व केळी पीक विमा बाबत तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना ही यावेळी कृषी विभागाला देण्यात आली.

बारड येथुन शेतकरी प्रतिनीधी म्हणुन उत्तमराव लोमटे ,प्रतापराव देशमुख तर अर्धापुर विभागातुन श्री गंगाधरराव देशमुख पार्डीकर,नंदकिशोर देशमुख पार्डीकर या  सर्वांनी ठासुन पणे   शेतक-यांची बाजु भक्कम मांडली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री हनुमंत राजगोरे व ता. अध्यक्ष बालाजी कल्याणकर आदींनी या ठिकाणी शेतकऱ्यांची  बाजु मांडली.लवकरच या प्रकरणाचा निकाल बारड व अर्धापुरच्या शेतकऱ्यांच्या बाजुने लागेल असे मत शेतकरी प्रतिनिधी उत्तमराव लोमटे बारडकर यांनी व्यक्त केले

बारड मंडळाला विमा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे तालुका काँग्रेस कमिटी व बारड शेतकऱ्यांन कडून मागणी

 संपादक आशिष मुगटकर

चर्चा :- नांदेड येथील कार्यक्रमात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना केळी पीक विम्यातून बारड मंडळ वगळ्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुसकान होऊन विमा मिळाला नसल्याने मोठे नुसकान झाले असल्याने या शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळावा या विषयावर चर्चा करताना उत्तमराव लोमटे बारडकर,बंटी कांबळे .

बारड / प्रतिनिधी

    मुदखेड तालुक्यातील बारड मंडळाला हेतूस्पर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून विमा कपंनी कडून वगळण्यात आले असल्याने या परिसरातील  शेतकऱ्यांचे  नुसकान होवून विमा केल्म मिळाला नसल्याने याची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळवून देण्यासाठी मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी व बारड येथील शेतकऱ्यांन कडून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

     सन २०१९/२०मध्ये या मंडळातील शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात केळी विमा विमा कंपनी कडून मोठ्या प्रमाणात उतरवला होता या काळात वारा,तापमान मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या केळी बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे.

      परंतु विमा कंपनी ने तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. मुदखेड मंडळ, मुगट मंडळ या दोन मंडळाला विमा केल्म मंजूर केला असून तालुक्यातील बारड मंडळ वगळ्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा मिळाला नसल्याने मोठे नुसकान झाले असल्याने या शेतकऱ्यांना विमा त्वरित मिळवून देण्याची मागणी यावेळी निवेदन देऊन केली आहे.

      यावेळी निवेदनावर मुदखेड काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार,पंचायत समिती उपसभापती आनंदराव गादीलवाड,काँग्रेस शहरअध्यक्ष माधव कदम,उत्तमराव लोमटे बारडकर,मैसाजी भांगे, राजाआप्पा कोतावार, प्रताप देशमुख, रोहीदास जाधव,भिमराव कल्याणे,केशव मुंगल, बंटी कांबळे, प्रभाकर सुर्यवंशी, प्रभाकर भिंगेवार, शेषेराव दंडे, धाराजी पवार, किशोर पिल्लेवाड,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सरेगाव जि.प.शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

   संपादक आशिष मुगटकर

जयंती :- सरेगाव येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेत महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करताना गावातील मान्यवर मंडळी,मुख्यध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका हे उपस्थित होते.

बारड / प्रतिनिधी

      मुदखेड तालुक्यातील  सरेगाव येथील जि.प.प्रा.शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांची जयंती साजरी करण्यात आली.

  गावातील मान्यवर  मंडळींच्या  हस्ते या महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोपिराज पा.कळणे,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री चक्रधर पा.कळणे,से.स.सो.चे चेअरमन श्री बालाजी पा.गिरे,मुख्याध्यापक श्री डी.एल.कदम,प्रा.प.शिक्षक तथा शिवव्याख्याते श्री  एम.टी.जाधव,प्रा.प.शिक्षक श्री बी.वाय.गरुडकर,श्री एम.एस.राउत,(स.शि.)श्री एस.जी.गैनवार(स.शि.)सौ.एस.एम.बाचा, श्री.जी.पी.शिरुरकर, अंगणवाडी ताई आदींची यावेळी उपस्थिती होती.

वासरी येथे कृषी विभाग आत्मा तर्फे गट क्षमता बांधणी कार्यक्रम संपन्न

संपादक आशिष मुगटकर

मार्गदर्शन शिबिर :- मुदखेड तालुक्यातील वासरी या गावात कृषी विभाग आत्मा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट वासरी यांच्यातर्फे गट क्षमता बांधणी व पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. 


मुदखेड/ तालुकाप्रतिनिधी

   दि.०२ मुदखेड तालुक्यातील वासरी गावात कृषी विभाग आत्मा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट वासरी यांच्यातर्फे गट क्षमता बांधणी व पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.  

   गावातील नागरिक शंकर मुतकलवाड यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यक्रमात गट क्षमता बांधणी  या विषयी तालुका तंत्र व्यवस्थापक मुदखेड श्री व्ही बी गीते तर पशु आरोग्य या विषयी डॉ. कांबळे साहेब पशू विकास अधिकारी पं. स. मुदखेड यांनी मार्गदर्शन केले 

  कृषी सहाय्यक तथा पेस्ट स्काऊट राम कपाटे यांनी सोयाबीन बीजोत्पादन व साठवण, कीटकनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी, केळीवरील CMV व BBTV रोग, आणि कृषी विभागाच्या विविध योजना तर मन्मथ गवळी यांनी रब्बी हंगाम पूर्वतयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  

    कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांच्याकडून शेतकऱ्यांना जनावरासाठी पशुखाद्य व कॅल्शियम चे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमात शेतकरी गटांना खतावणी रजिस्टर चे वाटप करण्यात आले. 

   या कार्यक्रमासाठी मं. कृ. अ.वाघमारे साहेब , डॉ.चौधरी , शिवानंद खानसोळे सरपंच वासरी , पिंटू पाटील, कृषी मित्र साईनाथ पवार , श्रीराम येडे, गुलाब उमाटे, दिपक कांजाळकर , नरहरी खानसोळे, नरहरी कांजाळकर , दत्ता खानसोळे, साईनाथ उमाटे , दादाराव येडे व गावातील शेतकरी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही बी गीते (आत्मा) तर आभारप्रदर्शन विठ्ठल लष्करे यांनी केले.

मुदखेड वंचित बहुजन महीला आघाडी कडून मनिषा वाल्मीक प्रकरणी शहरात कॅन्डल मार्च

संपादक आशिष मुगटकर

कॅन्डल मार्च :- मुदखेड शहरात मनीषा वाल्मीक प्रकरणी  वंचित बहुजन महीला आघाडीच्या  वतीने जाहीर निषेध व्यक्त करत शहरात कॅन्डल मार्च काढून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागे समोर मेनबती लावून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

         उत्तर प्रदेश राज्यातील हाथरास येथे घटलेली घटना ही सभ्य समाजाला आणि देशाला काळीमा फासणारी आहे. येथील तरुणी मनीषा वाल्मीक प्रकरणी मुदखेड वंचित बहुजन महीला आघाडीच्या  वतीने जाहीर निषेध व्यक्त करत शहरात कॅन्डल मार्च सायंकाळी आठ वाजता शहरातील लुबीनी विहार येथुन सुभाष गंज मोढा मार्ग रेल्वे गेट व भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी येऊन मेनबती लाऊन मनिषा वाल्मीक ला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

     या प्रसंगी  नगरसेवक अँड. कमलेश चौदंते यांनी आरोपीना फाशी देण्यात यावे अशी मागणी केली तसेच प्रत्येक भारतीय महीलेला संरक्षण करिता शासनाने शस्त्र परवाने देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक चौदंते यांनी केली आहे.  

       यावेळी संगीता थोरात, दीपक हाटकर, सखुबाई गायकवाड, अनिता माते, पल्लवी चौदंते, आशाबाई चौदंते, गंगासागर चौदंते, शिल्पा चौदंते, वच्‍छलाबाई हनुमंते, यांच्या सह बाबासाहेब चौधरी, बाबासाहेब चौदंते, शिवानंद देवके, राहुल आपा चौदंते, निखिल चौदंते, विशनु गायकवाड, सुशील कदम, मुन्ना चौदंते, सुरज कोथली, सुरज चौदंते, प्रदिप मांजरे, अर्जुन धोतरे, यांच्या सह आदिंची उपस्थितीत होते.

भोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे निर्देश



आढावा बैठक :-   राष्ट्रीय महामार्गमार्फत भोकर ते रहाटी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे या विषयावर मंत्रालयात आढावा बैठकीत चर्चा करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकरावजी चव्हाण  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

    दि. १ : नांदेड जिल्ह्यातील भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

 मंत्रालयात भोकर ते रहाटी रस्त्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र. देबडवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग (कोकण) मुख्य अभियंता त.की. इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.जंजाळ, श्री.रहाणे, अधीक्षक अभियंता श्री.औटी यावेळी उपस्थित होते.

 सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, भोकर ते रहाटी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे याबाबत जनक्षोभ निर्माण होऊन अनेक तक्रारी, निवेदने माझ्याकडे आली होती. नांदेड ते भोकर रस्त्याची परिस्थिती बिकट असून या कामासाठी बराच कालावधी गेला आहे. या कामामध्ये लक्ष घालून काम केल्यास ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात यावी. कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.



लोकप्रिय बातम्या