आंबेगाव येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.


जयंती :- आंबेगाव येथे  साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर,श्री रावसाहेब पाटील मुसळे,पोलीस पाटील देवबा जोंधळे,सह आदी ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.

बारड/ प्रतिनिधीला

मुदखेड तालुक्यातील आंबेगाव येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुदखेड राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या हस्ते तैलचित्राचे पुजन व ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.


अशा या साहीत्यसम्राट आण्णांची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी आण्णांच्या तैलचित्राचे पुजन करण्याचे व ध्वजारोहन करण्याचे मोठे भाग्य लाभले असे शिप्परकर म्हनाले. यावेळी गावच्या सरपंच सौ.सावित्रीबाई वाघमारे, श्री रावसाहेब पाटील मुसळे,पोलीस पाटील देवबा जोंधळे, ग्रा.पं. सदस्य वामन जोंधळे, चांदराव पोतरे, साहेबराव जोंधळे, दिलीप जोंधळे, नामदेव कांबळे, साईनाथ शिंदे, काशिनाथ जोंधळे आदींची उपस्थिती होती.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आमची प्रार्थना

 - पालकमंत्री अशोक चव्हाण 

 संपादक आशिष मुगटकर

स्नेहभेट :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी आज हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्यामसुंदर शिंदे, लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी, संतोष पांडागळे, बालाजी बंडे, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.
बारड/ प्रतिनिधी

नांदेड राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यात्माबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत काळजी करण्याची असून या वयात ते कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी आज हॉस्पिटलला भेट देऊन डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्यामसुंदर शिंदे, लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी, संतोष पांडागळे, बालाजी बंडे, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.   

विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लाखो भक्तांवर प्रेम केले आहे. चव्हाण कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचे स्नेह आम्हाला लाभल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

बारड येथील नदीवरचा मीनी कोल्हापुरी बंधारा खरडला

 पाच वर्षाखाली उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची अवस्था बखाल...

संपादक आशिष मुगटकर

बंधारा खरडला :- मुदखेड तालुक्यातील बारड येथील गावाच्या शेजारी असलेल्या नदीवर हा बंधारा शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करुन उभारण्यात आला होता.परंतु कामे दर्जेदार झाले नसल्याने बंधारा लवकरच खरडून गेला आहे.


बारड/ प्रतिनिधी

बारड येथील गाव शेजारील असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नदीवरच्या पुलाजवळ  उभारण्यात आलेला मीनी कोल्हापूरी बंधारा पावसाच्या पाण्याने खरडला असल्याने भविष्यात बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमतरता भासणार असल्याने नवीन बंधारा उभारणी करून देण्यात यावा अशी  मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

मागील पाच वर्षा पूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारणाच्या कामातून या बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती परंतु दर्जेदार कामे झाली नसल्याने बंधाऱ्याची अवस्था बखाल झाली आहे.

 बंधाऱ्यास साईट दगडाची स्पीचींग करण्यात आली नसल्याने पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला खालून बोगदा तयार झाला असून  साईडने दोन्ही बाजूला बंधारा खचला आहे तर बंधाऱ्याचे गेट ही नसल्याने पाणी साठवण होत नसल्याने बंधारा पुर्णपणे निष्फल झाला आहे.

बंधारा खालून मोठा बोगदा तयार झाला आहे  बाजूने माती खचल्याने बंधारा पूर्णपणे पाणी साठवण्यासाठी अकार्यक्षम झाल्याने पाणी साठवून होत नसल्याने याठिकाणी नवीन बंधारा करण्याची गरज आहे.

बारड गावाच्या शेजारी असलेल्या नदीवर हा बंधारा शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करुन उभारण्यात आला होता.परंतु कामे दर्जेदार झाले नसल्याने बंधारा लवकरच खचून गेला आहे.नदीवरील या बंधाऱ्यामुळे गावातील वाटर सप्लाय चे लेवल वाढले होते आजूबाजूच्या शेती परिसरातील पाण्याची लेवल क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.तर गावातील लोकांची तहान भागवण्यासाठी वॉटर सप्लाय लेवल वाढण्यासाठी बंधाऱ्याची किमया  फार मोठी होती त्यामुळे हा बंधारा शेतकऱ्या साठी व गावातील पाणी समस्या मिटवण्या साठी लाभदायी ठरला होता.

दुरावस्था :- पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला मोठा बोगदा पडला असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने माती घसरून गेल्याने दोन्ही बाजूनी हा बंधारा खुला झाल्याने पाणी वाहून जात असून या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.

परंतु मागील पडलेल्या पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला मोठा बोगदा पडला असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने माती घसरून गेल्याने दोन्ही बाजूनी हा बंधारा खुला झाल्याने पाणी वाहून जात आहे तसेच बंधाऱ्यावरील गेट तुटून पडल्याने पाणी साठवण होत नसल्याने हा बंधारा फेल झाला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी बंधारा उध्वस्त झाल्याने भविष्यात उन्हाळ्यामध्ये पाणी कमतरता भासणार असल्याने हवालदिल झाला आहे. ठिकाणी नवीन कोल्हापूरी बंधारा उभारूनी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यां कडून करण्यात येत आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्राला मंजुरी.

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारणीसाठी २५ लक्ष रुपयांची मंजुरी.-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर



बारड, मुदखेड/ प्रतिनिधी 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता उत्साहात आनंदी वातावरणात करुन येथील अण्णाभाऊ साठे अनुयायी अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि मातंग समाजाला न्याय दिला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची अध्यासन व अभ्यास केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू व्हावे यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी मंत्रालयात जाऊन चौकशी करून अध्यासन व अभ्यास केंद्र उभारण्यासाठी वेळ का लागत याबाबत माहिती घेऊन विद्यापीठाकडून पाठपुरवा झाल्या नसल्याचे निर्दशनास आले होते पुन्हा विद्यापीठात शिष्टमंडळ घेऊन  जाऊन कुलगुरू उद्धव भोसले यांच्याशी  चर्चा करून विद्यापीठा स्तरावरून पाठपुराव्याची जलदगतीची मागणी केली होती.

   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप सरकारंनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची उत्कृष्ट आनंददायक सुरुवात उत्साह केली होती.अण्णाभाऊ साठे अनुयायी अण्णाभाऊ साठे प्रेमी व मातंग समाजाला यांचा आनंद झाला होता परंतु सध्या सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणतेही नियोजन केले नाही अखेर जन्मशताब्दी वर्ष ३१ ऑगस्ट २०२० रोजी संपन्न होत आहे.यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. कारण की या सरकारमधील मोठमोठे नेते मंडळी हे स्वतःच्याच वडिलांच्या व इतर नेत्याच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये गुंग झाले होते त्यांना जागतिक दर्जाचे प्रतिभावंत विचारवंत स्वतंत्र सेनानी स्वतंत्र भारताचा पहिला आंदोलक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जन्मशताब्दी वर्ष देखील साजरा करावा असे वाटले नाही परंतु महाराष्ट्रात सत्तेवर नसलेले भाजप सरकारने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी मातंग समाजाच्यावतीने माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाच्या वतीने दि.१५ डिसेंबर २०२० रोजी विद्यापीठाचे कुलगुरु उध्दवराव भोसले यांची भेट घेवून मागणी करण्यात आली होती.

 या शिष्टमंडळात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे , अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे, मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर,लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे ,आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु भोसले यांनी अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र विद्यापीठात स्थापन करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले होते. हे अध्यास व अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी २५ ते३०  लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचे कुलगुरुंनी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले होते.

 अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज दि.३१ऑगस्ट २०२० रोजी होत असतानाही विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होवू शकली नाही. राज्यातील सत्ताधार्‍यांना अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे गांभीर्य नसल्यामुळे विद्यापीठात अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी पूर्ण होवू शकली नाही. म्हणून मातंग समाजाच्यावतीने सर्वपक्षीय सकल मातंग समाजाचे शिष्टमंडळ घेवून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली खा.चिखलीकर यांची दि.३० ऑगस्ट २०२० रोजी भेट घेवून अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

माजी आमदार अविनाश घाटे यांनी मातंग समाज शिष्टमंडळाच्यावतीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यात सत्तांतर होवून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. या सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात जन्मशताब्दी वर्षे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. राज्यसरकारमध्ये सत्तेत वाटा मिळविलेल्या तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी मातंग समाजाला न्याय न देता जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत असताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमी अनुयायी यांची आज घोर निराशी केली आहे.

त्यामुळे जन्मशताब्दी वर्षाची सांगता हि एक चांगल्या पद्धतीने करुन मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आज आपण सर्वजण खा.चिखलीकर यांना भेटण्यासाठी आलो आहोत.खा.चिखलीकर यांनी शिष्टमंडळाच्या भावना लक्षात घेवून  समाजाच्या शिष्टमंडळाच्या समक्ष तात्काळ माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे तात्काळ संपर्क साधून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आले आहे.

 अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार’ देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी केली. भ्रमणध्वनीव्दारे देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार अविनाश घाटे यांच्याशी चर्चा करुन आपण अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली नसली तरी आपला खासदार या नात्याने विद्यापीठात हे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा केली असे मानले जाते की २५ लाखांची आपल्या निधितुन रक्कम जाहीर करणारे  खा. प्रताप पाटील भारतातील पहिले खासदार आहेत अशी चर्चा चालू आहे.चिखलीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरु करण्यात येणार्‍या (इमारत बांधकाम) अध्यासन व अभ्यास केंद्र (ग्रंथ खरेदी) सुरु करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे पत्र अविनाश घाटे यांच्या हाती सुपूर्द करुन अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता खा.चिखलीकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने करुन अण्णाभाऊ साठे प्रेमी, अनुयायी आणि मातंग समाजाला न्याय दिले.

 खा.चिखलीकर यांनी मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल समस्त समाजाच्यावतीने अविनाश घाटे यांनी जाहिर आभार मानले.या शिष्टमंडळात माजी आमदार अविनाश घाटे, मारोती वाडेकर, उत्तम बाबळे,एम.बी.उमरे, बालाजीराव थोटवे, गंगाधरराव कावडे, परमेश्वर बंडेवार, पिराजी एल गाडेकर गोपाळराव टेंभूर्णे, पि.जी.केदारे,राजू मंडगीकर, गणपतराव गायकवाड, दशरथ कांबळे, रामदास कांबळे, यादव नामेवार, संभाजी गायकवाड, एन.जी.कांबळे यडूरकर, शंकरराव भंडारे, डो.ई. गुपिले, आर.जे.वाघमारे, मधुकर गोविंदराव वाघमारे,रविंद भालेराव, माणिक कांबळे,शिवराज केदारे, प्रा.एस.सी.सुर्यवंशी, निरंजन तपासकर, एस.एन.जांभळीकर, राजकुमार केदारे, डी.जी.गायकवाड, मल्हारराव वाघमारे, बी.एम.जाधव, नितीन तलवारे, गोपाळ वाघमारे,आनंद वंजारे, हिरप्रसाद सोमपारी, डि.डी.गायकवाड, मारोती वाघमारे, भारत खडसे, वामन कोंगे, उत्तम वाघमारे, अ‍ॅड. बी.आर.कलवले, इंगळे चांडोळीकर आदिंची यावेळी उपस्थिती होती.

बारड नगरीत कोरोना संकटमुक्ती साठी संकट मोचन महाआरती ,गावच्या युवकांचे श्रीगणेशाला साकडे ; जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची प्रमुख उपस्थिती.


कोरोना पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळा कडून विविध उपक्रम

संकट मोचन महा आरती:- कोरोना मुक्ती साठी बारड येथील गणेशाला संकट मोचन महा आरती करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा कर सल्लागार उत्तमराव लोमटे, माजी सरपंच दिलीपराव कोरे,माजी उपसरपंच प्रताप देशमुख, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


बारड/ प्रतिनिधी

बारड नगरीत युवक गणेश मंडळाच्या वतीने कारोना संकट दूर व्हावे यासाठी संकट मोचन महा सामूहिक महाआरती काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली असून यावेळी श्री गणेशाला साकडे घालून ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन चे पालन करत महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर मंडळाकडून विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.

जय योगेश्वर, श्री बसवेश्वर तसेच श्रीराम गणेश मंडळ यांच्या वतीने कोरोना महामारी संकट दूर व्हावे तसेच प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य स्वास्थासाठी युवक गणेश मंडळाच्या वतीने. ता.३० (रविवार) गणपती बाप्पा ना साकडे घातले आहे


यावेळी  काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी उपसरपंच दिलीपराव कोरे, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तम राव लोमटे, प्रताप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रभाकर भिमेवार, समाजसेवक गोकुळ दास दाड, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त संजय मुलंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुलआठवले, युवक काँग्रेस कार्यकर्ते बंटी कांबळे, योगेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन कनसेटे, बसवेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष. कपिल कराळे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवाजी फुलारी, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे. पूजा विधी गजानन स्वामी यांनी केली. कोरोना महामारी चे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, यासंकटावर मात मिळवण्यासाठी लवकर उपचार निघावा यासाठी  संकट मोचन महाआरती घेण्यात आली असून श्रीगणेशाला यावेळी सामूहिक साकडे घालण्यात आले.

यावर्षी सर्वत्र कोरोना महामारी चे संकट असल्याने गावातील सर्व युवक गणेश मंडळाने साध्या पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना करून  या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या कोरोना पार्श्वभूमी नियमावलीचे काटेकोर पणे पालन केले जात असून मोजक्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दररोज सकाळी व संध्याकाळी साध्या पद्धतीने सोशल डिस्टेन्स वापर करून आरती पूजा केली जाते गाव पातळीवर गणेश मंडळाकडून ग्रामस्थांना मास्क,सॅनिटायझर,हातमोजे,आदीमोफत वाटप करण्यात आले आहे. गणेश मंडळाच्या वतीने ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाना कोरोना चे संकट दूर करण्यासाठी सामूहिक आराधना किली आहे.

यावेळी माध्यम समूहाचे प्रतिनिधी नामदेव बिचेवार, गोविंद लोणे, विठ्ठल राठोड, दादाराव गव्‍हाणे, विश्वंभर पुयड, नारायणराव देशमुख, शिरीष वानोळकर, गणपत  लोमटे,नागेश पांचाळ, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना संकट मोचन महाआरती यशस्वीतेसाठी जय योगेश्वर गणेश मंडळाचे ओम उपवार, दीपक उपवार, गजानन अनंतेवार, केदार पवार, नवनाथ लोमटे, सिद्धेश्वर केशेवार, रंगराव लोमटे, आदित्य पांचाळ, शुभम लाहेवार, सारंग मुलंगे ओम मुलंगे, सौरभ कत्रे, शुभम उपवार, केदार मुलंगे,सोमेश लालमे  यांच्यासह  गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.


केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय क्रीडा दिन अंतर्गत "सीआरपीएफ खेलो इंडिया" मोठ्या उत्साहात साजरा

 खेलो इंडिया अंतर्गत  व्हॉलीबॉल सामने आयोजीत



राष्ट्रीय क्रीडा दिन :- मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व पुलिस बल प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय क्रीडा दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “खेलो इंडिया” अंतर्गत  व्हॉलीबॉल सामने आयोजीत करण्यात आले होते.त्यात विजयी झालेला संघ.

मुदखेड/शहर प्रतिनीधी/ अतीक अहेमद

२९ ऑगस्ट २०२० रोजी मुदखेड शहरातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला, ज्याचे उद्घाटन मुख्य पाहुणे, पोलिस महानिरीक्षक, सीटीसी, केरीपब, राकेश कुमार यादव यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे राकेशकुमार यादव यांनी सांगितले की, आज "सीआरपीएफ खेलो इंडिया" भारत सरकारतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संपूर्ण देशात आयोजित करण्यात आला होता आणि केरीपुबल नवी दिल्ली महानिदेशालयाच्या म्हणण्यानुसार, २९ ऑगस्ट रोजी विचारात घेण्याचे विशेष कारण असले तरी या दिवशी हॉकी विझार्ड आणि खेळांशी संबंधित एक महान, प्रतिभावान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्म ०२ ऑगस्ट १९०५ रोजी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद शहरात झाला. त्याने स्वत: ला आणि आपल्या देशासाठी क्रीडा जगात आणि उच्च जातीने आपल्या देशासाठी उच्च केले. ध्यानचंदने आपल्या करिष्माई कामगिरीने संपूर्ण विश्व प्रसिद्ध केले खेळाच्याच्या इतिहासामध्ये सर्वनाक्षरोमध्ये आपले नाव नोंदवले, असेही ते म्हणाले की, त्यांची स्वतःची तब्येतही स्थिर व सदृढ राहते.

यावेळी प्रमुख पाहुणे व पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी सायंकाळी “खेलो इंडिया” अंतर्गत या संस्थेमध्ये व्हॉलीबॉल सामना (प्रत्येकी तीन सहभागींसह खेळला) आयोजित केला आणि खेळाडूंच्या मनोबल वाढविले. खेळासाठी उपस्थित असलेल्या सर्व जवानांना उत्तेजन देऊन सीआरपीएफ "प्ले इंडिया" प्रमाणपत्र सामन्यानंतर सर्व सहभागींना मुख्य अतिथींनी प्रदान केले.

प्रमाणपत्र वाटप :- खेळासाठी उपस्थित असलेल्या सर्व जवानांना उत्तेजन देऊन सीआरपीएफ "प्ले इंडिया" प्रमाणपत्र सामन्यानंतर सर्व सहभागींना प्रदान करताना मुख्य अतिथींनी सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव.

सीटीसी सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव म्हणाले की, आज संपूर्ण देश कोविड -१९ वर संघर्ष करीत आहे, या संदर्भात आपण सर्वांनी जागरुक राहून स्वत: आणि आपल्या कुटुंबीयांनी कोविड -१९ च्या बचाव संदर्भात सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत सुरक्षित ठेवावे लागेल.

यावेळी संस्थेचे कमांडंट लीलाधर महरानिया, उप कमांडंट पुरुषोत्तम जोशी, उप कमांडंट समीर कुमार राव, साहा कमांडंट जगन्नाथ उपाध्याय, साहा कमांडंट रूपेश कुमार, साहा कमांडंट (मंत्र) पुरुषोत्तम राजगडेकर, सहित अधिकारी,अधीनस्थ अधिकारी आणि जवानांनी सामाजिक अंतर आणि मुखवटे वापरूण हजर राहिले.




मुदखेड येथील भाजपच्या घंटानाद आंदोलन परिसरात दनानला

  जनतेचे  घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष 

घंटानाद आंदोलन :- मुदखेड तालुका भाजप कडून  मोंढा मार्केट यार्ड येथील  श्री गणेश मंदिरा समोर भाजप कार्यकर्त्यांनी भक्तीस्थळ असलेले देवालय मंदीरे उघडण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात घंटानाद आंदोलन केले 


बारड/प्रतिनिधी

मुदखेड तालुका भाजप कडून  मोंढा मार्केट यार्ड येथील  श्री गणेश मंदिरा समोर भाजप कार्यकर्त्यांनी भक्तीस्थळ असलेले देवालय मंदीरे उघडण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात घंटानाद आंदोलन केले आहे.घंटानाद आंदोलनाने परिसर दनानुन गेला होता यावेळी घंटानाद आंदोलनाने सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार घंटानाद आंदोलन विधानसभा  अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर ,यांच्या नेतृत्वाखाली  तालुका अध्यक्ष शंकरराव मुतकलवाड,  यांनी मोंढा मार्केट यार्ड मधिल श्री गणेश मंदिर या ठिकाणी भाजपा कडून घंटानाद आंदोलनासाठी निवडले .

यावेळी भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी ठाकरे सरकार विरोधी नारेबाजी करत दारु दुकाने उघडले, एसटी बस सुरु केली, देशी दारु उघडली तर जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या देवालय मंदीरे उघडण्यासाठी परवानगी का नाही ? उध्दवा अजब तुझे सरकार म्हणत यावेळी घोषना बाजी केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला हे आंदोलन लक्ष वेधी ठरले. तर भक्तीस्थळ, मंदीरे त्वरित उघडावी या बाबतीत नारेबाजी केली.

नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठय़ाने घंटानाद करित आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त केले.यावेळी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, प्रमुख कार्यकर्ते प्रविण गायकवाड, तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड, भाजप कार्यकर्ते दिगंबर टिप्परसे,  उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रकाश बलफेवाड, गजानन शिंदे माळकौठेकर, शंकर पवार, दिलीप देशमुख,  गोविंद गोपनपल्ले,  देवा धबडगे, गजानन कमळे, श्रीहरि बैनवाड, सोनु चंद्रे, अमोल अडकणे, मुन्ना चांडक, अमोल अबादार, गजानन  बारडकर,  पिंपळौठेकर पवार, आदि सह प्रमुख कार्यकर्ते आंदोलनातसहभागी झाले. पोलिसांनी बंदोबस्त  ठेवला होता. संजय सोनटक्के, कालीदास जंगीलवाड आदीनी परिश्रम घेतले.

मुदखेड येथे भाजपचा घंटा नाद गाजला

 सर्व सामान्य जनतेचे मंदिरे सुरू करण्याच्या घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष !

घंटानाद आंदोलन :- मुदखेड येथील मोंढा मार्केट यार्ड मधिल  श्री गणेश मंदिर समोर  भाजपच्या कडून धार्मिक मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.त्यावेळी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश  देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त करताना.


 मुदखेड तालुका /प्रतिनिधी

मुदखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंदिरे सुरू करण्यासाठी केलेला घंटानाद आंदोलनाने  सर्वसामान्य जनतेचे  लक्ष वेधून गाजला. 

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थानी सुरू करण्याच्या या मागणीसाठी राज्यभर " दार उघडा उद्धवा दार उघडा " अशी हाक देत " घंटानाद आंदोलन " धार्मिक मंदिरा समोर मुदखेड भाजप कडून करण्यात आले.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केली आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्यात आली.महाराष्ट्रातील ही देवस्थाने सुरू करण्यासाठी अनेक व्यक्ती संघटनांनी एक मुखाने मागणी करून सुद्धा राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही मान्य करत नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 भोकर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष  निलेश देशमुख व तालुका अध्यक्ष शंकरराव मुतकलवाड  यांनी मोंढा मार्केट यार्ड मधिल  श्री गणेश मंदिर चे ठिकाण भाजप च्या घंटानाद आंदोलन साठी निवडले.

 या मुळे सर्वसामान्य जनतेला हे आंदोलन लक्ष वेधी ठरले. नुकतेच तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्याने घंटानाद करित आंदोलनात सहभागी झाले होते. अध्यक्ष निलेश देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त केले. दिगंबर टिप्परसे,  उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रकाश बलफेवाड, गजानन शिंदे माळकौठेकर, शंकर पवार, दिलीप देशमुख,  गोविंद गोपनपल्ले,  देवा धबडगे, गजानन कमळे, श्रीहरि बैनवाड, सोनु चंद्रे, अमोल अडकणे, मुन्ना चांडक, अमोल अबादार, गजानन  बारडकर,  पिंपळौठेकर पवार, आदि सह प्रमुख कार्यकर्ते आंदोलनातसहभागी झाले. पोलिसांनी बंदोबस्त  ठेवला होता. संजय सोनटक्के, कालीदास जंगीलवाड आदीनी परिश्रम घेतले.

कोरोना लस चाचणीत बारड च्या भुमीपत्राचा सहभाग

 सिरम कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा;२८ दिवसानंतर दुसरा डोस 


बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड जि.नांदेड  संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना वरील लसीकडे लागले आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड शिल्ड लसीच्या चाचणीला प्रारंभ झाला असून यात नांदेड जिल्ह्यातील बारड येथील भुमीपुत्र रुपेश बाळासाहेब देशमुख यांचा ही समावेश आहे.त्यामुळे या चाचणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. देशमुख यांच्यावर गुरुवारी ही चाचणी करण्यात आली. या तपासणी साठी २८दिवसाचा कालावधी लागणार आहे.कोरोना संसर्गावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परदेशात पहिली मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतात या लसीचा दुसर्‍या आणि तिसर्‍या मानवी चाचणी चा टप्पा सुरू झाला आहे. भारती विद्यापीठाच्या रूग्णालयात दोन स्वयंसेवकाला अर्धा मिली लसीचा डोस देऊन चाचणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बारड  हे स्वातंत्र्य सैनिकाची भुमी असल्याने या गावाला एक वेगळा इतिहास घडवण्याची ताकद या मातीच असल्याने काहीतरी देशासाठी योगदान करावे हा संकल्प समोर ठेवून बारड येथील भुमीपुत्र रुपेश बाळासाहेब देशमुख यांंनी एक जिद्द दाखवत देशावरील कोरोना संकटावर मात मिळवण्यासाठी  कोविड शिल्ड चा डोस घेऊन मानवी चाचणी लसीचा श्रीगणेशा करण्यात उपयोगी पडले आहेत. यावेळी रुपेश देशमुख यांनी देशावरील कोरोना संकट दूर होण्यासाठी या लसीचा उपयोग सर्वांना लवकर व्हावा व देशासाठी समाजासाठी आपण काही तरी उपयोगी पडलो देशासाठी आपले काही तरी योगदान असावे हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.तसेच ही लस घेतल्या नंतर जो अभ्यास आहे त्यामुळे मॅक्झिमम ताप येऊ शकतो परंतु असे काही झाले नसल्याचे ही त्यांनी सांगितले

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रोजीनीको यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ अंतर्गत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ता.२६ रोजी दोन स्वयंसेवकाला कोवीडशील्ड लसीचा डोस देण्यात आला. या लसीच्या मानवी चाचणीसाठी पाच निरोगी स्वयंसेवकांनी नाव नोंदणी केली होती त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता. निवडण्यात आलेल्या सर्व स्वयंसेवकांची खबरदारी म्हणून कोविंड rt-pcr चाचणी तसेच अँटीबॉडी तपासणी करण्यात आली होती. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरणा लसीचा डोस देण्यात आला आहे. मानवी चाचणीच्या पहिला डोसा नंतर साईड इफेक्ट काय होतात याची तपासणी 28 दिवसाचा कालावधी लागणार आहे. 28 दिवसानंतर या युवकांवर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यावेळी भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका अस्मिता कदम, डॉक्टर संजय ललवाणी, डॉक्टर सोनाली पालकर, डॉक्टर जितेंद्र ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

रुपेश देशमुख यांची प्रतिक्रिया- मानवी चाचणीसाठी माझी निवड अभिमानास्पद आहे.


संपूर्ण जगाला कोरोणा संसर्गजन्य महामारी ने ग्रासले असताना सर्वांचे लक्ष कोरोना लसीच्या शोधाकडे लागले आहे. कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा पुण्यात झाला असल्याने सिरम कोविड शील्ड डोस साठी माझी निवड अभिमानास्पद आहे. देशाच्या सामाजिक कार्यात सहभागी होत असताना स्वयंसेवक पाहिजे अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजली. याबाबत मी कुटुंबाशी चर्चा केली. कुटुंब परिवाराने या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले यानंतर मी भारतीय विद्यापीठाअंतर्गत रुग्णालयात संपर्क साधला माझा स्वाब आणि अँटीबॉडी ची तपासणी करण्यात आली. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर मला लस चा पहिला डोस देण्यात आला. हे माझे भाग्य समजतो. नागरिकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डोंगरगावात कोरोनाने खाते उघडले 32 वर्षाच्या युवकांसह पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाकडून गावात सर्वेक्षण, संपर्कातील सातजणांची अंतिजन टेस्ट

सर्वेक्षण :- डोंगरगाव येथे दोन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण बाधीत झाल्याने खबरदारी साठी आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, सुरेखा गाडेकर,घोरपडे, आदीने सर्वेक्षण केले.

बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड सर्कल येथील डोंगरगावात कोरोनाने खाते उघडले असून 32 वर्षाच्या युवकांसह त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथका कडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र पवार यांनी गावात भेट देऊन पाँझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील सात संशयित लोकांची अँटिजन टेस्ट करण्यात केली आहे त्यामध्ये बत्तीस वर्षाचा युवक पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याची पत्नीही पॉझिटिव झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी यावेळी दिली आहे.

बारड कोविड केअर सेंटर येथे डोंगराच्या पती पत्नी या दोघांना ही उपचारासाठी एडमिठ करण्यात आले असुन एकूण तिन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून सर्वाची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी सुकळीकर यांनी यावेळी दिली आहे

यावेळी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथकाने बत्तीस वर्षाचा युवक पॉझिटिव्ह निघाला असता तातडीने डोंगरगाव येथे जाऊन युवकाच्या घरातील सदस्यांना होम क्याँरंन्टाईन करण्यात आले होते त्यानंतर त्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे गावामध्ये पूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून 32 वर्षाच्या कोरोना पाँझिटिव्ह युवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध मोहीम सुरू असल्या ची माहिती यावेळी डॉ.पवार यांनी दिली आहे पॉझिटिव्ह आलेला युवक हा नांदेड बारड दररोज दोन-तीन दिवस गेला असल्याचे समोर आले आहे त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात आला याचा पुर्ण पणे सर्वे करण्याचे काम आरोग्य विभागाच्या पथकाकडून  सुरू आहे.

गावात दोन रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने डोंगरगाव वाशियानची चिंता वाढली असून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागा कडून करण्यात आले आहे.यावेळी डोंगरगाव गावात सर्वेक्षण करण्यासाठी तसेच कोरोना बाधीत रुग्णांची काँन्टँक्ट ट्रेसिंग मोहीम राबवण्यासाठी डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली.डॉ कासराळीकर, आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, सुरेखा गाडेकर,घोरपडे, यांच्या मार्फत घरोघरी जाऊन  सर्वेक्षण करण्यासाठी परिश्रम घेतले.

मार्गदर्शन :- डोंगरगाव येथे आरोग्य विभागाकडून तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र पवार,यांच्या मार्गदर्शना खाली रुग्ण संपर्कात आलेल्या सात व्यक्तीची आरोग्य पथकाने अँटिजन टेस्ट केली आहे



शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ऊसतोडणी यंत्रास शासनाचे अनुदान मिळवून द्या....

 सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे शेतकऱ्यांचे साकडे

निवेदन :- ऊस तोडणी यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे स्थानिक शेतकरी निवेदन देताना.

बारड/ प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ऊस तोडणी यंत्रास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२०/२१या  वर्षात ऊस तोडणी यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.

या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मजूरा अभावी अडचण निर्माण होऊ नये हा उद्देश समोर  ठेवत या भागातील काही शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहेत त्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करण्यात येत आहे परंतु आज स्थितीत ऊस तोडणी करण्यासाठी खरेदी केलेल्या यंत्र धारक शेतकरीआर्थिक अडचणीत आला असून शासनाची कुठलीच अनुदानाची रक्कम त्यांना मिळाली नसल्याने सध्या स्थितीत शेतकरी अडचणीत आहे.

मागील भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल या आशाने ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहेत.परंतु प्रत्यक्ष अमलबजावणी झाली नसून ऊस तोडणी यंत्र धारकांचे प्रस्ताव साखर आयुक्त स्वीकारत नाही तर ही योजना चालू नसल्याचे सांगण्यात येत आहे सदरिल शेतकर्यानी शासनाचे अनुदान मिळेल हा हेतू समोर ठेवून  वित्तीय संस्थेकडून हे यंत्र कर्जावर खरेदी केले आहे शाषनाकडून कुठलेही अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दोन वर्षाच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन अल्प झाले असल्याने ऊस यंत्र मशीनला व्यवसाय अल्प मिळाल्याने वित्तीय संस्थेचे व्याज मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सध्यास्थितीत उस यंत्र धारक शेतकरी कर्जबाजारी बनला आहे अनुदान मिळाले नसल्यास या सर्व शेतकऱ्यांना उघड्यावर येण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याकडे गांभीर्याने लक्ष देवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न करावे शासनस्तरावरून अनुदान मिळवून देण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर प्रगतिशील शेतकरी प्रभाकर भीमेवार, किशन पवार, शंकर मुंगल,उत्तम जनजवळे,सोनाजी गवळी, मुकेश मामीडवार,माधव पवार,संगमनाथ मुस्तरे, शालीनीताई शेटे, दीपमाला पंचलिग आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बारड येथील युवा कार्यकर्ते पवन टीप्परसे यांची भाजप तालुका सोशल मीडिया संयोजक पदी निवड

 

संपादक आशिष मुगटकर

 

बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते पवन दत्तराव टीप्परसे यांची भाजप तालुका सोशल मीडिया संयोजक पदी निवड झाली असल्याने भाजप युवा कार्यकर्त्यांन कडून निवडीबद्दल स्वागत करण्यात आले आहे.

मुदखेड येथील विश्रामगृहात नुकतीच तालुका ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून भाजप भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्या उपस्थितीत निवड पत्र प्रदान करण्यात आले आहे.

खासदार.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाअध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,भाजपचे जेष्ठ नेते राम चौधरी, जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष किशोर देशमुख, माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड,दींगाबर टीप्परसे,महीला शहरअध्यक्ष जयश्रीताई देशमुख,मुन्ना चांडक, गोविंद गोपनपपले, यांच्या मार्गदर्शनाखाली दी.२४रोजी तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

यावेळी पवन टीप्परसे यांच्या पक्षा अंतर्गत केलेल्या कार्याची दखल घेत तालुका सोशल मिडिया वर त्यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे युवकांना उभारि मिळाली असल्याने त्या माध्यमातून कार्य करण्यासाठी वाव मिळाला आहे.तर यामाध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष बळकटी साठी काम करणार असल्याचे टीप्परसे यांनी यावेळी सांगितले. निवडीमुळे बारड येथे भाजप युवा कार्यकत्यानी जल्लोषात स्वागत केले आहे.यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

डोंगरगाव शिवारात बिबट्याची दहशत...

आखाड्यावरिल वासराचा फडशा शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण

बारड/ प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात बिबट्याच्या दहशदीने थरार... आखाड्यावरील जातीवंत गावरान गाईच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना दी.२२ रोजी रात्री घडली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात अनेक शेतकर्याचा दुग्धव्यवसाय असल्यानेक्षलाखो रुपये किमंती जनावरे आखाड्यावर असतात त्यामुळे शेतकरी भयभीत आहे.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर या परिसरात बिबट्याने आगमन केल्याने भितीदायक परिस्थिती झाली असल्याने थरार निर्माण झाला आहे.

डोंगरगाव परिसर हा जंगल परिसर असल्याने तसेच या भागातील शेतकऱ्यांचे पिके ही बागायती असल्याने केळी ऊस व जंगलातील जूगळ्या याठिकाणी असल्याने बिबट्या च्या थांबण्यासाठी जागा आहे त्यामुळे या परिसरात बिबट्याचे अनेक दिवसापासून बस्तान मांडले आहे. परंतु बिबट्या एका ठिकाणी राहात नसल्याने मागील काही दिवसांमध्ये या भागात बिबट्याचे दर्शन किंवा शिकार केल्याच्या घटना घडल्या नाहीत परंतु अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर बिबट्याने या भागात आगमन केले असून शेतकरी गणेश पाटील व्यवहारे यांच्या गट नंबर ७८ या शिवारातअसलेल्या आखाड्यावरिल गाईच्या वासराचा फडशा पाडला असल्याने या अचानक घडलेल्या घटनेमुळेआखाड्यावर राहणाऱ्या शेतकर मध्ये भितीजन्य वातावरण तयार झाले आहे.

बिबट्या हा या परिसरातील शेतकर्‍यांसाठी नवीन नसून यापूर्वीही या भागात बिबट्याने शिकार केलेले अनेक घटना घडल्या आहेत मागे काही दिवसांपूर्वी तर या भागातील आखाड्यावर असलेल्या घोडीवर बिबट्याने मजल मारत शिखार करुन खात्मा केल्याची घटना या भागात घडली होती.

यावेळी गावातील प्रमुख श्रीनिवास महादवाड यांनी बिबट्या डोंगरगाव परिसरात असल्याची माहिती वनविभागाला कळविले असल्याने घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपान पांडुरंग धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश घुगे यांनी घटना स्थळी पाहणी केली असता बिबट्या च्या पंजाच्या खुना दीसल्या असून वासराच्या घटनेचा पंचनामा केला आहे.डॉ. शेख यांनी वासराची पाहणी करून वैद्यकीय अवहाल घेतला आहे.

विविध शैक्षणिक मागण्यांबाबत अभाविपचे विद्यापीठ परिसरात धरणे आंदोलन

 अभाविपचे शैक्षणिक प्रश्नांन संदर्भात आंदोलन  करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका


धरणे आंदोलन :- विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड


नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

दि.२४रोजी नांदेड येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड तर्फे आज स्वा.रा.ति.म.विद्यापीठात परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. या काळात विद्यार्थी विविध शैक्षणिक समस्यांना सामोरे जात आहेत. आशा विविध शैक्षणिक मागण्यांकडे विद्यापीठ प्रशासन व शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकरी, कामगार, व्यापारी सर्वच वर्ग कोरोना महामारीचा सामना करत असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शैक्षणिक शुल्क आकारत आहेत. अंतिम वर्ष सोडता सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या असताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या नावाने कोट्यावधी रुपये कोरोना काळात वसूल केले. त्याचबरोबर शैक्षणिक शुल्कामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबित राहू नये अन्यथा अभाविप महाविद्यालय स्तरावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा अभाविप प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिला.

     अभाविप शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची भेट घेऊन सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केल्यानंतर कुलसचिव शिंदे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना सोबत संवाद साधला व सर्व मागण्यांवर पंधरा दिवसाच्या आत आम्ही निर्णय घेऊ असे आश्वासन विद्यापीठाच्या वतीने दिले. शिष्टमंडळात प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री बसवराज मेंगापुरे, राधिका जाधव, पवन बेलकोने, प्रियंका चव्हाण हे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित आंदोलन करत्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करून दोन तासानंतर सुटका करण्यात आली.

मागण्या पुढीलप्रमाणे

१) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे.

२) कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे शैक्षणिक शुल्क भरण्यास विद्यार्थी असमर्थ आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरावे या साठी महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहे. परंतु सद्य परिस्थितीत विद्यार्थी शुल्क भरू शकत नाही. म्हणून वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी. तसेच प्रवेश नोंदणी करीत असताना एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त १०% शुल्क आकारण्यात यावे व उर्वरित शुल्क हे चार टप्प्यात घेण्यात यावे.

३) अंतीम वर्ष वगळता ज्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे.

४) कोरोना महामारी मुळे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपल्या गावी घरी गेले आहेत, तरी अशा सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाने त्वरीत परत करावे.

५) १५ मार्च २०२० पासून विद्यापीठ अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय बंद असल्या कारणाने महाविद्यालय संसाधनांचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. त्यामुळे ते शुल्क त्यांना त्वरित परत करावे.


             

मुदखेड भाजप तालुका ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

    नवनिर्वाचित पदअधिकार्याना निवडपत्र प्रधान

निवड बैठक :- मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करताना भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर


बारड/ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाची मुदखेड तालुका ग्रामीण कार्यकारिणी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून यावेळी नवनिर्वाचित पद अधिकार्याना नियुक्ती पत्र प्रधान करुन स्वागत करण्यात आले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मुदखेड तालुका भाजप कार्यकर्त्यांनी निवडीची प्रक्रिया प्रलंबित होती.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राम चौधरी, जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष अँड किशोर देशमुख , माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ ऑगस्ट रोजी येथील मुदखेड शासकीय विश्रामगृहात भाजप तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवार यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

या कार्यकरणी निवडीत तालुका उपाध्यक्ष बालाजी नारायन खटींग रा.शेंबोली, गणेशराव तुकाराम येळमकर रा.मुगट ,कैलास गणेश शिंदे रा.रोहि पिंपळगाव ,गजानन उत्तमराव शिंदे रा.माळकाैठा , मारोतराव मुंजाजी अवातिरक रा.पाथरड रेल्वे स्टेशन, साै.रेणुका शंकर पवार रा.आमदुरा , पंढरी श्रीराम पवार रा.निवघा,बालाजी रघुनाथ तेलंग रा.गोपाळवाड,चिटणीस आनंदराव सुभाषराव हेमके रा.डोणगाव, यशवंत डी.देशमुख रा.चिकाळा, रामेश्वर शिवाजी शिंदे रा.रोहिपिंपळगाव, गोंविद किशन कुरे रा.खुजडा, अनिल सुधाकर कुलकर्णी रा.टाकळी , नीळकंठ संतुका हामंद रा.डोणगाव, साै. अनिता मोतीराम सावंत रा.डोंगरगाव,तालुका सरचिटणीस संजय लक्ष्मण पवार रा.निवघा, अशोक पांडुरंग पवार रा.पार्डी (वै) , सुदाम सोनाही खानसोळे रा.कामळज,  कोषाध्यक्ष: रामदास पा.गिरे रा.सरेगाव,सोशल मिडीया संयोजक पवन गोंविदराव टिप्परसे रा.बारड, यांच्या निवड करण्यात आली आहे.यावेळी कार्यकर्त्यांना निवडपत्र प्रधान करण्यात आले आहे.


यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव शिंदे,शहरध्यक्ष संजय सोनटक्के, महीला शहरध्यक्ष सौ.जयश्री देशमुख, माजी नगरसेवक गोविंद गोपनपले, सरपंच बालाजी मगरे, मुन्ना चांडक,दिंगाबर टीप्परसे, कुणाल चौधरी, प्रकाश सुर्यवंशी, अमोल आडकिने,गजानन कबळे,कालीदास जंगीलवाड, सुभाष येरपलवाड,आशोक पाटील, दीलीप देशमुख, विठ्ठल पवार, देवा धबडगे, शंकरराव पाटील, उत्तम शिंदे, पिटु येरपलवाड, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रेती माफीयावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करणार अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादन

 पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर साधला संवाद

पत्रकार परिषद : - मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण,सोबत गोविंदराव शिंदे नागेलीकर,काँग्रेस कमेठी जिल्हाअध्यक्ष ,नगरपरिषद नगराध्यक्ष मुझीप  अन्सारी जागीरदार काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, शहराध्यक्ष माधव कदम, सर्व पत्रकार उपस्थित होते.

 बारड/ प्रतिनिधी  
रेती माफीयावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील नगरपरिषद आढावा बैठकिसाठी आले असता पत्रकारांना बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी काँग्रेस कमेठी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगरपरिषद नगराध्यक्ष मुझीप  अन्सारी जागीरदार काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, शहराध्यक्ष माधव कदम, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संजय कोलते, गंगाधर डांगे, मनोज कमटे,उत्तम हनमंते, अतिक अहेमद, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के,नामदेव बिचेवार, सचिन कांबळे ,शेख ईरफान, शेख जब्बार, पिराजी गाडेकर, आशिष कल्याणे साहेबराव गागलवाड, नामदेव राहेरकर, साहेबराव हौसार आदीची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप सरकारच्या मागील पाच वर्षात जिल्ह्यतील संपूर्ण यंत्रणेसह अधिकारी राजकीय हस्तक्षेप करत होते. रेती माफीयांन कडून रेती चोरी मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे  सर्वसामान्य माणसाला रेती गाडी पन्नास हजार पर्यंत विकत घेण्याची वेळ आली असल्याने याबाबत स्वता लक्ष घालून रेती चोरी करणाऱ्या  रेती माफीयावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बाबत आरोग्यविषयक बाबीवर तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये सिने टायझर ऑक्सिजन टॅंक, आरोग्य विषयक रुग्णालय सुविधा, मास्क पीपी किट, आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली आहे. 
यावेळी त्यांनी मुदखेड तालूक्यातील विकास कामाचा आढावा घेतला आहे तसेच नगर परिषदेच्या अडचणी जानुन घेतल्या आहेत  तसेच  कोरोना पार्श्वभूमी असताना मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे शहरात नऊ कोटींचा विकास निधी प्रक्रिया केला आहे.तर  जिल्ह्यातील छोटे मोठे रस्ते जिल्हा मार्गाला  जोडण्यात आले असून त्यांची विकास कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.तसेच तालुक्यातील संपूर्ण छोट्यामोठ्या पुलाची कामे पण मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे .यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मराठा आरक्षणा बाबतीत पुढील भुमिका कशी असेल याबाबत माहिती विचारली असता यासाठी आपण आरक्षण बाबतीत प्रयत्नशील असल्याची माहीती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना वसाहत निर्मिती करून देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी  रिजर्व बँकेच्या नियमाचे पालन बँकेचे अधिकारी करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.तर सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकर्यानंच्या नुसकानीचे पंचनामे करण्यात येणार असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी साहेबराव गागलवाड,नामदेव राहेरकर,साहेबराव हौसारे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.



पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

 विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सुचना

आढावा बैठक : - मुदखेड नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब.


नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

दि.२३ ऑगस्ट  रोजी मुदखेड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी तथा राज्यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री  तथा नांदेडचे पालकमंञी मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध विषयांवर तालुक्यातील सर्व कामांची आढावा बैठक घेऊन संबंधीत लोकांना कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सूचना करण्यांत आल्या व नवीन कामे प्रस्तावित करणेसाठी माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यांत आले. व तालुक्यातील पत्रकार मंडळींशी संवाद साधला!

    त्या प्रसंगी बैठकीस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, जि.प.सदस्य प्रतिनिधी भिमराव पा. कल्याने, नांदेड जिल्हा ओ.बि.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी, मुदखेड शहराध्यक्ष माधव कदम, उपसभापती आनंदराव गादीलवाड, माजी सभापती रत्नाकर शिंदे, तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव रामराव खांडरे, डॉ. फुलवारे,जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष भुरेवार, भोकर विभागीय अधिकारी श्री. कंधारे साहेब, तहसीलदार दिनेशजी झापंले, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजपुत, उपकार्यकारी अभियंता पाटील, गटविकास अधिकारी अनंत कदम, पोलीस निरीक्षक निकाळजे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्येकर्ते, सरपंच, सर्व पत्रकार, व तालुक्यातील प्रमुख कार्येकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते .

पालकमंत्र्यांच्या मुदखेड दौऱ्यामुळे मुगट शाळेसमोरील घाण साफ

 संपादक आशिष मुगटकर

घाणीचे साम्राज्य :- मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळे समोर घाण व केरकचरा ढीग.

 मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुगट जिल्हा परिषद शाळेच्या समोर गेल्या अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य व केर कचऱ्याचे ढीग वाढले होते पण अचानक रात्री ही घाण व केअर कचऱ्याचे ढीग अचानक गायब झाल्यामुळे रविवारी सकाळी रस्त्याने फिरणाऱ्या नागरिक मोठ्या कुतुहलाने याकडे पाहू लागली होती याचे कारण ही असेच आहे.हे साफ करण्याचे कारण ठरले नांदेड चे पालकमंत्री अशोकराव चव्हाण.

घाण साफ :- मुगट येथील शाळे समोर रातोरात घाण व केरकचरा मध्यरात्रीला साफ करण्यात आला.

 रविवारी पालकमंत्री मुदखेड दौऱ्यावर येत असल्यामुळे या मुख्य रस्त्यावरील व शाळेसमोरील घाण व केरकचरा मध्यरात्रीला साफ करण्यात आला. उशिरा का होईना पण ग्रामपंचायतला जाग आल्यामुळे शिक्षण प्रेमी आनंदी झाले आहेत.ग्रामपंचायत व शाळेने शाळेच्या समोर केरकचरा टाकल्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून शाळेच्या समोर कॅमेरे बसवण्यात आली पण या शाळेसमोर केरकचरा टाकणाऱ्या वर शाळा प्रशासन व ग्रामपंचायत ही कुचकामी ठरली आहे. त्यामुळे या केर कचरा टाकणाऱ्या चे मनोबल दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी घाण ही होतच आहे पण पालकमंत्र्यांच्या मुदखेड दौर्‍यामुळे शाळेसमोरील पावसाळ्यात ही घाण साफ केल्यामुळे शाळे समोरील परिसर हा स्वच्छ दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीत मुदखेड कॉंग्रेसचे पंचायत समिती सभापतींचा जाहीर प्रवेश

  पंचायत समितीत शिवसेनेला मिळनार उपसभापतीपद 

संपादक आशिष मुगटकर

पक्ष प्रवेश :- वंचित बहुजन आघाडीत मुदखेडचे पंचायत सभापती बालाजी सुर्यतळे यांनी  संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश.
    

  मुदखेड / शहर प्रतिनिधी / अतिक अहेमद                    

मुदखेड तालुक्यातील निवघा पंचायत गणातुन निवघा गावातुन कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट जिंकून बालाजी सूर्यतळे यांना नुकतेच मुदखेड पंचायत समितीच्या अध्यक्षपदी बढती देण्यात आली व अचानक एका प्रकारचा भूकंप झाला, राजकीय कॉरिडॉरमध्ये व माजी खासदार व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष. मुदखेड पंचायत समितीतील चार सदस्यांच्या संस्थेत कॉंग्रेसने तीन जागा जिंकल्या, वंचित बहुजन आघाडीच्या सूत्रांनी याची पुष्टी केली, परंतु कॉंग्रेस माजी अध्यक्षांच्या नुकत्याच निधनाने शिवसेनेने बाजी मारली. आज समितीत केवळ तीन सदस्यांचा बचाव झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यानंतर सूर्यतळे यांच्याकडे कॉंग्रेसचे फक्त एक सदस्य आहेत आणि शिवसेनेच्या मदतीने पंचायत समितीने सरकार स्थापन करण्याचा व नांदेडच्या सरकारमध्ये शिवसेनेला भूक देण्याचा हेतू ठरविला. हॉटेल सिटी प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आज शहरातील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्हा, कॉंग्रेस पंचायत समिती सभापतींची भेट वंचित बहुजन मोर्चाच्या भेटीत एक प्रकारचा भूकंप झाल्याची खळबळ उडाली आणि कॉंग्रेस पार्टी बालाजी सूर्यतळे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाच्या तहसील स्तरावर काम केले आणि पक्षाची विचारसरणी व धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरले.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुळे बालाजी सूर्यतळे कॉंग्रेस पक्षात शिरल्यानंतर आतमध्ये संतापले, कारण अद्याप समजू शकले नाही परंतु वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यानंतर तहसील व वंचित बहुजन आघाडीचे धोरण व विचारधारा तहसीलमध्ये कार्यरत आहेत. पुढच्या वर्षी मुदखेड नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेससमोर एक आव्हान उभे करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, असे वाटते.

मेंडका येथील एका वर्षाखाली केलेल्या पुलाच्या भुमीपुजनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर...

 मेंडका गावाशेजारील नदीच्या पुलावरुन पाण्याचा पुर ग्रामस्थांना करावा लागतो अडचणीचा सामना

संपादक आशिष मुगटकर

पुलावरून पाणी : - मुदखेड तालुक्यातील मुदखेड भोकर रोडवरील मेंढका गावातील मुख्य रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिक, प्रवाशी अडचणीत .


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मेंडका येथील रोजचा रहदारीचा असलेल्या गावाशेजारील नदीच्या पुलावरून चार दिवसापासून चालू असलेल्या पावसाने छोटेखानी असलेल्या नळकांडी पुलावरून पाण्याचा पुर जात असल्याने  गावात जाण्यासाठी चा एकमेव पुलावरील रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे या पुलाचे मागील एक वर्षाखालील भूमिपूजन केले आहे. परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाच्या कामाचा विसर पडला असल्याने तब्बल एक वर्षापासून हे काम प्रलंबित पडले असून ग्रामस्थांना याबाबत अनेक वर्षापासून नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

तब्बल चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मेंडका नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नदीवरून गावात जाता येत नाही तर गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नसल्याने कामासाठी जाणेयेने बंद असून अनेक समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

शेतातील व्यक्तींना गावात येता जाता येत नाही तर गावातील व्यक्तींना तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण सेवेसाठी, ईरत कामासाठी पण पुलावरून पाणी असल्याने जाता येत नसल्याने तब्बल गावातील रहदारी ठप्प होत आहे पुलावरून पाणी आले म्हणजे ग्रामस्थांना मोठे संकट उभे असल्याचे चित्र या ठिकाणी आहे.

अनेक दिवसापासून ग्रामस्थान कडून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी होती त्याची दखल घेत या कामाचे भूमिपूजन ही झाले परंतु प्रत्यक्षात कामाला मुहूर्त कधी? असा सूर ग्रामस्थांकडून उमटत असून रोष निर्माण झाला आहे.  

तर काही इमर्जन्सी कामे असल्यास ग्रामस्थांना याच पुलावरून जावे लागते परंतु पावसाचे पाणी आल्याने हा पूल कायम बंद होतो तर काहीनि आरोग्यसेवेसाठी तत्परतेने जाण्याचे काम पडल्यास गावातील नागरिक आपला जीव मुठीत धरून या पुलावरून धोका पत्करत आरोग्यसेवेसाठी जाताना दिसतात परंतु या या प्रकारामुळे जीवीत हानी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज  आहे याबाबत सा.बा.विभागाचे अभियंता तुकाराम पिंगळे यांच्या कडे संपर्क साधला असता पावसाळ्यानंतर म्हणजे अजून दोन महीण्यानी या कामाची सुरवात करण्यात येणार असून यासाठी निधी उपलब्ध आहे अशी  माहिती दिली आहे. ग्रामस्थांची सतत भेडसावणारी समस्या सोडवावी अशी मागणी समस्त मेंडका गावकऱ्यांन कडून करण्यात येत आहे.

राजर्षी शाहू विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दिला लॅपटॉप भेट

 माजी विद्यार्थ्यीचा स्नेहभावनेतुन अभिनव उपक्रम.

संपादक आशिष मुगटकर

 लॅपटॉप भेट : - शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट स्वीकारताना राजश्री शाहू विद्यालय नांदेड येथील संचालक मंडळ, प्रमुख अतिथी व मुख्याध्यापक.

नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे

नांदेड दि. : नांदेड, वसंतनगर येथील आय.एस.ओ.मानांकित असलेली जिल्ह्यातील प्रसिद्ध शाळा म्हणुन राजर्षी शाहू विद्यालयची  ओळख आहे.या विद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात  आपले नाव, शाळेचे नाव, लौकीक करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.शाळेविषयी सर्वांनाच आस्था व जिव्हाळा असतो.स्नेहभावनेतून या शाळेतील१९९४ वर्षीच्या इयत्ता  १०वीत शिकलेल्या माझी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य शाळेला ४०हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप भेट दिला. 

माजी ४२ विद्यार्थी समुहांपैकी डॉ.अरूण निवळे पाटील ,प्रभाकर सावंत,रवीशंकर सूर्यवंशी, कुलदीप जाधव, दिपक भालेराव, पवन नावंदर , जगन्नाथ देशमुख आदिंचा मुख्याध्यापक बालाजी हंगरगे सरानी  शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. व त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मराठवाडा शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.डॉ.नामदेवराव अंबोरे,प्रा.डॉ.प्रतापराव जाधव,प्रा.एम.यू.देशमुख,डॉ.गायत्री वाडेकर,दिगंबरराव बोरकर,माजी मुख्याध्यापक देवीदास गवाले,शाळेचे मुख्याध्यापक बालाजी हंगरगे,डॉ.पांडुरंग यमलवाड,पंजाबराव सावंत उपस्थित होते. 

शासकीय नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी क्रीडा प्रमुख तुकाराम रामनबैनवाड ,अमोल भंगाळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख  विठठ्ल  पोकलेवाड व टापरे शिवानंद यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार माणिक गाडेकर यांनी व्यक्त केले.

शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी.

विद्यार्थी नेते भास्कर डोईबळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

संपादक आशिष मुगटकर

नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

  आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली चार महिन्यापासून संपूर्ण व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे यातच बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यातच आता 'कोरोना' चा धक्का हजारोंचा रोजगार उध्वस्त करून गेला. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' च्या अहवालानुसार मार्चमध्ये ८.७४ टक्के असलेल्या बेरोजगारीचा दर मे महिन्यामध्ये २७.११ टक्के एवढा उच्चांकी झाला.साहजिकच ज्यांनी शैक्षणिक कर्जे घेतली होती,त्यांच्यावर तर आभाळच कोसळले आहे.शैक्षणिक कर्ज योजनेनुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच ते सात वर्षाच्या कालावधीत नोकरी करत कर्जाचे हप्ते फेडण्याची तरतूद असते ही मुदत वाढवताही येते पण ज्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे,त्यांना रोजगारच मिळणार नसेल तर ते कर्ज फेडणार तरी कसे? त्यामुळे ज्याप्रमाणे मोठमोठ्या उद्योगपतींसाठी व शेतकऱ्यांसाठी सरकार मदतीचा हात पुढे करत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज घेतलेल्या युवकांना देखील कर्ज माफ करून दिलासा द्यावा अन्यथा कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अश्या आशयाचे निवेदन भास्कर डोईबळे यांनी मुख्यमंत्री महोदयांना ई-मेल द्वारे पाठवले आहे. 

 पुढे बोलताना भास्कर डोईबळे यांनी शिक्षणाचे खाजगीकरण वाढले आहे आणि शिक्षण संस्थांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या काळात अनेक घटकांना आर्थिक पॅकेज देताना केंद्र सरकारने शैक्षणिक कर्जाच्या समस्येचा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या आणि बेरोजगार असलेल्या युवकांसमोर हप्ते फेडण्याची गंभीर आवाहन आहे केरळ सरकारने या संदर्भात थोडी संवेदनशीलता दाखवत 'शैक्षणिक कर्ज परतफेड साह्य योजना' सुरू केली आहे. त्यानुसार सहा लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांच्या कर्जाची अंशतः फेड राज्य सरकार करते याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती विद्यार्थी नेते भास्कर डोईबळे यांनी केली आहे.

गणेश उत्सव व आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सव शासनाच्या नियमांचा पालन करून साजरे करावे

 कोरोनाच्या महामारी मध्ये शासनाला सहकार्य करुण महामारीचा नायनाट करा - उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांचे अहवान

संपादक आशिष मुगटकर

शांतता बैठक :- मुदखेड पंचायत समिती येथील डॉ. शंकरराव  चव्हाण सभागृहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे.


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

दिनांक १८ ऑगस्ट रोजी  मुदखेड पंचायत समिती येथील डॉ. शंकरराव  चव्हाण सभागृहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक दुपारी ०४.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे होते  बैठकीत नांदेड जिल्हा पोलीस दलाचे अप्पर अधिक्षक  विजय पवार, उपअधीक्षक बाळासाहेब देशमुख, नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार , तहसीलदार दिनेश झांपले, नगर परिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे ,वैद्यकीय अधिक्षक डाॅ. कपिल  जाधव यांची प्रमुख उपस्थित होती . 

प्रास्ताविकात शासनव्यवस्था, उत्सव साजरे करताना शासनाने दिलेल्या दिशा निर्देश व नियमानुसार माहिती मुदखेड पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली, त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष केशवराव कदम, माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी, नप गट नेते तथा कांग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, तहसीलदार झांपले  यांनी विचार मांडले ,नगराध्यक्ष मुजीब  जहागीरदार यांनी नगर परिषद सर्व सहकार्य करणार असे स्पष्ट  केले. माजी नगरसेवक कैलास गोडसे यांनी उत्कृष्ट  गणेश मंडळास  बक्षीस जाहीर केले व परंपरा कायम ठेवली . कोवीड रोगाची महामारी च्या काळात एखाद्या मंडळ मुर्ती स्थापन  करत नसेल तर त्यांना   पुढील वर्षी परवानगीस प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले.    अध्यक्षीय भाषणात प्रशासन  प्रमुख  उपविभागीय अधिकारी खंदारे  यांनी दिली  सध्या कोरोना ग्रस्त रूग्ण संख्या वाढली असून मास्क वापर करून सोशल डिस्टेंस ठेवून उत्सव साजरा केला पाहिजे असे स्पष्ट केले. 

उत्कृष्ट सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार संजय नागमवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश भाले, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक करिम खाँ साब, नगरसेवक इम्रान मच्छिवाले,  भाजप नेते प्रवीण गायकवाड ,पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर,शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्र,  रामेश्वर वाघमारे, अनंत कुलकर्णी, , गोंविद प्रसाद कालाणी,  नगरसेवक प्रतिनिधी उत्तम चव्हाण चांदू चमकूरे ,ॠषीकेश पारवेकर, वीज वितरण चे कोरेबैनवाड, ज्येष्ठ प्रत्रकार मनोज कमटे, अजगर हुसेन, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के, शेख इरफान, आशिष कल्याणे पाटील, अतिक अहेमद आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी व्यक्त केले सहायक पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे, यु.डी बुकतरे, बळीराम राठोड , हेड काँस्टेबल केशव पांचाळ ,हेड काँस्टेबल ठाकूर आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल

मुदखेड शहरातील सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये सदभावना दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

         संपादक आशिष मुगटकर

शपथ :- मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात उपस्थित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि जवान, सीडब्ल्यूसीचे केंद्रीय कमांडंट लीलाधर महरानिया शपथ घेताना.


मुदखेड/ शहर प्रतिनिधि/ अतीक अहमद                               

 मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात उपस्थित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि जवान यांनी सीडब्ल्यूसीच्या केंद्रीय कमांडंट लीलाधर महरानिया यांनी आज सकाळी ११ वाजता शपथ घेतली.

या प्रसंगी कमांडंटने त्या दिवसाच्या संदर्भात सांगितले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी सदभावना दिन साजरा करतो कारण दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे एकमेव ध्येय इतरांसाठी व सर्वांसाठी शुभेच्छा होते. सर्व लोकांमध्ये समुदाय एकता, राष्ट्रीय ऐक्य, शांती, प्रेम आणि आपुलकी कायम ठेवली जावी, याशिवाय त्यांनी आपल्या सामाजिक आणि आर्थिक कार्याद्वारे देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले. सृष्टीचे दर्शन स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

या वेळी कमांडंट महरानिया म्हणाले की सर्व सैनिक आणि सामान्य नागरिकांमध्ये समान भावनेने उपस्थित रहावे आणि आम्ही हिंसाचाराचा उपयोग करणार नाही. जर एखादी समस्या उद्भवली असेल तर तो कायद्याच्या कक्षेत सोडविला गेला पाहिजे. गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि आपण एकमेकांना मदत केली पाहिजे आणि देश प्रगतीसाठी सदैव तत्पर असायला हवा, तरच आपला देश एक विकसित राष्ट्र बनू शकतो.

लीलाधर महरानिया यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, देश आज  कोविड -१९ शी  झुंज देत आहे. आपण जागरूक असले पाहिजे. स्वत: आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे होय.

या प्रसंगी  पुरुषोत्तम जोशी उप.कमांडंट, समीर कुमार राव, उप. कमांडंट, जगन्नाथ उपाध्याय, सहाय्यक कमांडंट, रूपेश कुमार, सहाय्यक कमांडंट, पुरुषोत्तम राजगडकर सहायक कमांडंट (मंत्रा),अधिनस्थ अधिकारी आणी जवान सामाजिक अंतर आणि फेस मास्क वापरुन जवान उपस्थित होते.

शेतकऱ्यांनचे कामधेनू असलेल्या ईसापुर जलशयाचा पाणीसाठा झाला ८० टक्के

 शेतकऱ्यांना बागायतीसाठी पाणी पाळ्या मिळणार  उपविभागीय अधिकारी यांची माहिती

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

पावसाळा सुरू होवून दोन महीने झाले परंतु  आठवड्यात पडणाऱ्या पावसाने ईसापुर जलाशयाच्या पाणी साठ्यात मुबलक वाढ झाली असुन धरणात जिवंत पाणी साठा ८० टक्के झाला असून धरणाच्या सौर्स वाँटर फोल्लो द्वारे पाणी थोड्या प्रमाणात चालू असून धरणाचा पाणी साठा वाढणारच शेतकऱ्यांना बागायती साठी पाणी पाळ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीयअधिकारी रमेशराव देशमुख यांनी यावेळी दीलीआहे. शंभर टक्के पाणीसाठा कधी होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून धरण पुर्णपणे भराण्याची अपेक्षा शेतकऱ्यांन कडून व्यक्त केली जात आहे.

हरितक्रांती चे जनक डॉ शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी धोरणाने या भागाचा कायापालट झाला असून हरित क्रांती घडली आहे या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी तसेच हा परिसर बागायती होण्यासाठी डॉ शंकरराव चव्हाण यांनी  इसापूर धरणाच्या माध्यमातून या भागात जलक्रांती घडवून आणली आहे.त्यांच्या या दूरदृष्टी धोरणाने या परिसरातील शेतकरी केळी, ऊस, हाळद, फळबागा,खरबूज, टरबुज, अशी बागायती पिके भर उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याच्या माध्यमातून घेत असून लाखोचे उत्पादन काढतआहे.धरणाच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला असून सुजलाम सुफलाम बनला असून सर्वत्र हरितक्रांती घडली आहे

धरण शंभर टक्के झाले म्हणजे पुढील एक वर्षे बागायती पिके शेतकऱ्यांना काढता येतात. धरणात मोठा पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना बागायती पिके घेण्यासाठी मुबा मिळतो तर त्या दुष्टीने शेतकरी पुढील पिकाच्या नियोजनाची वाटचाल करीत असतो

गेल्या वर्षी धरणात पाणी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होता त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासली नाही तर धरणाच्या माध्यमातून बागायती पिके घेण्या साठी वाव मिळाला होता नदी नाल्याना  पाणी सुटल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला होता.त्यामुळे यापरिसरातील शेतकऱ्यांसाठी बागायती ला आधार देणारे ईसापुर धरण हे कामधेनू बनले आहे.

कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी : आयुर्वेदाचा मूलमंत्र

 पंचमहाभूत विकृतीतून जनपदध्वंश व्याधी : वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांचे समुपदेशन 

नांदेड / विशेष प्रतिनिधी / प्रतापराव देशमुख बारडकर

 आयुर्वेद शास्त्रानुसार पंचमहाभूत विकृत होऊन सृष्टीत विषमता निर्माण होऊन कोरोणा सारखे जनपदध्वंश व्याधी निर्माण झाला आहे. आयुर्वेदातील औषधी, पंचकर्म, आहार, विहार, योगासन, प्राणायाम, सकारात्मक जीवनशैली इ. गोष्टींचा अवलंब करून कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे समुपदेशन वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांनी केले आहे. जनसंपर्क सेवेत अहोरात्र जीवाची भीती न बाळगता कार्य करणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोलाचा संदेश, जनजागृती अभियान, सामाजिक ऋणानुबंधातून राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोणा विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी मोलाचे प्रबोधन व उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

आयुर्वेदातील ब्रम्हांडी ते पिंडी या तत्त्वानुसार निसर्गात आहे तेच शरीरात आहे. पंचमहाभूते पृथ्वी, जल, आकाश, तेज, वायू यांचे सृष्टीत विषमता निर्माण झाल्याने शरीरात देखील विषमता निर्माण झाल्याने कोरोणा सारखे जनपदध्वंश महामारी उदयास आली आहे. निसर्गात समानता आणणे तूर्तास तरी शक्य नसल्याने विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आयुर्वेदातील औषधी, पंचकर्म. आहार, विहार, योगा, प्राणायाम, सकारात्मक जीवनशैली त्याचबरोबर शासन निर्बंधाचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चित कोरोना पासून बचाव केला जाऊ शकतो. 

मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गंडूष, नस्य, धूमनस्य व औषधींचा वापर प्रभावी उपाय आहे. नस्यामध्ये वेखंड, केसर इ. औषधींचे  तेल करून दोन्ही नाकपुडीत दोन दोन थेंब टाकल्यास नाकातील आंतरत्वचेची प्रतिकारशक्ती वाढते व तेथे स्निग्धता आल्याने काही अंशी विषाणू तेथे चिटकून त्याचे फुफ्फुसात जाण्यास प्रतिबंध होऊ शकतो. सर्वसाधारणपणे नागरिकांनी नस्य औषधी ऐवजी घरातील तूप किंवा खोबरेल तेलाच्या थेंबाचा वापर करता येईल. धुमनस्य म्हणजे नाकातून औषधी युक्त धूर घेणे होय. त्रिकटू, वेखंड, विडंग इ. औषधींचे मिश्रणाचे धुमनस्य घेतल्याने नाकातील निर्जंतुकीकरण करून श्वसनलिकेचे शुद्धीकरण होते. सर्वसाधारणपणे घरघुती हळदीचा धूर घेता येईल. गंडूष म्हणजे औषधीयुक्त काढ्याने किंवा तेलाने गुळण्या करणे होय. गंडूष औषधी मध्ये त्रिफळा, जेष्ठमध, खदिर इ. यांच्या मिश्रणातून तयार केलेले काढ्याने किंवा तेलाने दररोज सकाळी उठल्यानंतर गुळण्या केल्यास मुखातील व गळ्यातील आंतरत्वचेची प्रतिकारशक्ती वाढते तसेच गळ्यातील कफ, सलाइव्हा, सिक्रेषण इ. बाहेर पडल्यामुळे गळ्यामध्ये संसर्गासाठी फोकस किंव्हा सरफेस एरिया राहत नाही त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. सर्वसाधारणपणे नागरिकांनी घरातील मीठ मिश्रित कोमट पाण्याच्या गुळण्या केल्या तरी चालतात. रससिंदूर, अभ्रक, टंकन, प्रवाळ, शंख, सुंठी, गुडूची, लवंग, दालचिनी इ. औषधी वापरून फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती वाढविता येते. 

आहारांमध्ये भूक लागली तेंव्हाच जेवण करणे, रात्रीचे जेवण लवकर घेणे, हलके अन्न खाणे त्यामध्ये फळभाज्या, दाळी वर्ग, भाकरी, चपाती, फळे, दुध, तूप, ताक व ड्रायफ्रुट इ. वापर करणे. तसेच घरचे साधे व ताजे जेवण करणे. नियमितपणे योगा, व्यायाम केल्याने चांगली भूक लागून अन्नपचन व्यवस्थित होते. त्यामुळे शरीर लवचिक व मजबूत राहते. नियमित प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो त्यामुळे फुफ्फुस उत्तमरीत्या कार्यरत राहते. हा विषाणू फुफ्फुसाला संक्रमित करून कोरोणा व्याधी उत्पन करतो. त्यामुळे फुफ्फुसाला उत्तमरीत्या कार्यरत ठेवण्यासाठी कपालभाती, अनुलोम विलोम, ओमकार, भाम्बरी इ. प्राणायाम नियमित करणे आवश्यक आहे.

 दैनंदिन वाढत्या ताणतणावात रात्रीला कमीत कमी आठ तास निवांत झोप घेणे आवश्यक आहे. तसेच सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सोबतच शासनाने सांगितलेल्या मास्क, सॅनिटायझर, गर्दीत न जाने इ. नियमांचे व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

वरील सर्व उपाय केल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे कोरोणा विषाणूंचा संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो. म्हणून सर्वांनी आयुर्वेदातील उपाययोजना केल्या व शासनाचे निर्देश पाळले तर निश्चितपणे कोरोणा संसर्ग होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो व आपले सर्व दैनंदिन काम आपण नियमितपणे करत कोरोना सोबत जगू शकू कारण कोरोना चा प्रादुर्भाव कधी संपेल हे सांगणे तूर्तास तरी शक्य नाही म्हणून आज घडीला आपल्याला कोरोना सोबत घेऊन त्यापासून बचाव करतच जगावे लागेल त्यासाठी आयुर्वेद औषधी चा वापर हा पर्याय आहे.

वैद्य विश्वंबर पवार यांनी वैद्यकीय आयुर्वेदिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा घटक नात्याने व आपण समाजाचेद काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेने आपात्कालीन कोरोना बचाव अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. जनसंपर्क सेवेत अहोरात्र वावरणाऱ्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक याशिवाय विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींना समुपदेशन करत आयुर्वेदातील औषधीचे मोफत वाटप करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांनी मोलाचा संदेश, जनजागृती, समुपदेशन अभियान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रभावीपणे राबवून कोरोना संसर्ग व्याधींपासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे. 

चक्रीवादळाच्या तडाख्यात मजबूत बांधकामाची घरे टिकून राहतात परंतु कच्ची घरे, झोपडी हे नष्ट होतात त्याचप्रमाणे कोरोना महामारीत देखील ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे व यदाकदाचित झालाच तर त्यापासून विनाउपद्रव बचाव करून बाहेर पडू शकतो. ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे व त्याचे विपरीत परिणाम होण्याची शकयता नाकारता येणार नाही. 

असा मोलाचा सल्ला त्यांनी सर्व जनतेला दिला. कोरोना महामारीत घाबरून जाऊ नये तसेच धीर न सोडता सामूहिक लढा उभारण्याची गरज आहे. सात्विक गुणधर्म वाढविण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कोरोणावर लसीचा शोध लागेपर्यंत कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे व त्यापासून बचाव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (वैद्य विश्वंबर पवार निवघेकर : 9881166777)

लोकप्रिय बातम्या