युवा पत्रकार सचीनकुमार कांबळे यांचे दुःखद निधन

मुदखेड पत्रकारितेतील उगवला तारा काळाच्या पडद्याआड!

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड येथील युवा पत्रकार सचिन कुमार कांबळे यांचे आज सकाळी हृदय विकारांचा झटक्याने निधन झाले. एक युवा पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

'केसरी' या दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले.पत्रकारिता क्षेत्रात त्यांना आवड होती.त्यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले.त्यांनी बीजे,एमजे.पर्यत पत्रकारीतेचे शिक्षण नांदेड येथे घेतले.कमी कालावधीत त्यांची ओळख लेखनीतुन दिसून आली.मुदखेड तालुक्यातील निर्भिड पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.त्यांनी मुदखेड पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष पद भुषवले.

 त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे मुदखेड तालुक्यातील पत्रकारात त्यांची उनिव भरुन न निघणारी आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आसुन या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघा कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

मुदखेड शहरात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/अतिक अहेमद

मुदखेड येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मुदखेड शहरातील राष्ट्रसंत गाडगे बाबा चौकातील फलकाला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.यावेळी मुदखेड शहरातील विविध पक्षातील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. 

ज्येष्ठ नेते रामेश्वर वाघमारे, मुख्याधिकारी रामराजे कापरे,मा. नगरसेवक कैलास गोडसे, नगरसेवक गोविंदराव गोपनपल्ले, नगरसेवक माधव कदम, किशोर पारवेकर ,कमलेश चव्हाण ,भाजपा शहराध्यक्ष मुन्ना चांडक संचालक मुन्ना चौधरी,


 धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत कार्याध्यक्ष माधव अस्कूलकर, विनोद वाघमारे, भाजपाचे कालिदास जंगीलवाड,अमोल अडकिणे, शिवसेना शहर प्रमुख सचिन माने, सचिन चंद्रे, डेबूजीची शहराध्यक्ष संदेश वाघमारे ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, पत्रकार ईश्वर पिन्नलवार, प्रकाश सूर्यवंशी ऋषिकेश पारवेकर,बालाजी वाघमारे,ओम वाघमारे, राहुल चौदंते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि धोंगडे, गणेश वाघमारे, गजानन सावंत, नवनाथ वडपत्रे, अंकुश वाघमारे, गजानन माचनवाड, गिरीश माचनवाड,शाम सावंत,राजु वाघमारे, गोपाल वाघमारे सह आदिनी परिश्रम घेतले.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हक्काची पगार मिळावी यासाठी विनाअनुदानित उच्चमाध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

 जिल्ह्यातील शिक्षक - शिक्षिका धरणे आंदोलनात सहभागी


नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

          दि १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथें महाराष्ट्र राज्य उमावि/कमवी शाळा कृती संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी १४६ व १६३८ उच्च माध्यमिक विदयालय/कमवि चा २४/०२/२०२०/च्या पुरवरणी नुसार अनुदान वितरणाचा आदेश निर्गमित करणेबाबत व अघोषीत उच्च माध्यमिक शाळा घोषीत करुण आर्थीक तरतूद करनेबाबत या मागण्या करीत शासनाच लक्ष केंद्रीत करण्यात आले.

 १३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत व अनुदानास मंजुर १४६ व १६३८ उच्च माध्यमिक विद्यालयांना २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर पुरवणी मागणीदवारे १०६ कोटी ७४ लक्ष ७२ हजार रुपये मंजूर असलेला निधी तात्काळ वितरीत करण्यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात यावा मागील १८ वर्षापासून विनावेतन वेठबिगारीचे जीवन जगणाऱ्या शिक्षक बांधवांवर हा मोठा अन्याय आहे. निधी मंजूर असून वारंवार तपासणीच्या नावाखाली वितरणाचा आदेश निर्गमित केला जात नाही. तरी तपासणीच्या अहवालाच्या अधीन राहुन याच अधिवेशनात निधी वितरणाचा आदेश निर्गमित करावा यासाठी दि.१४/१२/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.


आंदोलनाचे वेळी सर्व शिक्षक व सहकारी मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत व शासनाचे आदेशांचे पूर्णतः पालन केले यावेळी लातूर विभागीय कार्याध्यक्ष प्रा कैलाश खानसोळे, लातुर विभागीय उपाध्यक्ष प्रा भागवत गोरे,नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा सुधोधन हाटकर सह जिल्ह्यातील असंख्य महिला व पुरुष शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

मुदखेड शहरातील ग्रामीण रूग्णालयात हर्नियाच्या आणि एनक्रिप्टेड हायड्रोसिल कॉर्डवर रुगणांवर शस्त्रक्रिया यशस्वी - डॉ. दिलीप फुगारे यांची माहिती

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

०३  डिसेंबर २०२० रोजी, मुदखेड शहरातील ग्रामीण रुग्णालया मध्ये एनक्रिप्टेड हायड्रोसिल कॉर्डवर व  हर्नियाच्या रूग्णाचे यशस्वी ऑपरेशन केले. शहरातील ग्रामीण रुग्णालयात यशस्वी ऑपरेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती  देण्यात आली, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप फुगारे सांगितले.

शहरातील ग्रामीण रुग्णालयात हर्निया आणि एनक्रिप्टेड हायड्रोसेरोल कॉर्डने ग्रस्त रूग्णांवर०३ डिसेंबर २०२० रोजी ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडली गेली. शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांना भुलथाप भूलतज्ञ डॉक्टर अनुरकर यांनी दिली. 

तसेच शस्त्रक्रियेमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल जाधव,डॉ.संजय कदम, डॉ. गायत्री राठोड, तरोडे मॅडम, पंकज बंधू, प्रकाश, राणी मासी  मोहम्मद अलीम यांनी मदत केली.

याआधी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य व्यवस्थापक डॉ. दिलीप फुगरे यांनी अशा प्रकारच्या ऑपरेशनविषयी सांगण्यापूर्वी असे सांगितले की अशा प्रकारच्या रोगांवर याआधी मुदखेड च्या ग्रामीण रुग्णालयत शस्त्रक्रिया शक्यता  झाली नसेन अस सांगितले  परंतु हर्नियामध्ये शस्त्रक्रिया आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयात एनक्रिप्टेड हायड्रोसिल कॉर्ड आता  शक्य असून शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुगणालयात सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि भविष्यात देखील ऑपरेशन करण्याचे वचन दिले आहे, दोन्ही ऑपरेशन केलेल्या रूग्णांची प्रकृती अद्याप स्थिर आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमीत्त अभिवादन

  मुदखेड भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

    दि.१२ रोजी मदखेड येथील लुंबिनी नगर स्थित कार्यालयात भाजपाच्या वतिने लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते लोकनेते पुष्प माला अर्पण करुन,धुप आणि दीप प्रज्वलीत केले आणि लोकनेत्याच्या विचारांची उजळणी करुन अभिवादन करण्यात आले.

     या अभिवादन कार्यक्रमास भाजपचे मराठवाडा प्रदेश प्रभारी प्रवीण गायकवाड,मुदखेड बाजार समितीचे माजी सभापती भगवान पानेवार,माजी संचालक निळकंठ हामंद,अल्पसंख्यांक मोर्चाचे शेख रफिक,प्रा.दिनेश शेटे,मोदी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटिल मुंगल,ता.अध्यक्ष भायेश्वर मुंगल,माधव वाघमारे,केशव पाटिल ढगे,गंगाधर कसबे, म.कबिर,हानिफ खुरेशी,लक्षिमन पाटिल मुंगल,चांदू निखाते,मारुती गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

काँग्रेस पक्षाचा बंद बारडकर यांचा पुढाकार

शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा ;कृषी विधेयक कायद्यास विरोध

संपादक आशिष मुगटकर

बारड/ प्रतिनिधी

दि.८ डिसेंबर- शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याने अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये बारच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत गाव कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला असून केंद्र शासनाच्या कृषि विधेयक कायदा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

     केंद्र शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सप्टेंबर 2020 संसदेत कृषी विधेयक कायदा पारित केला असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक घातक असल्याने देशाची ची राजधानी दिल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे परंतु केंद्र शासन तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेतून तोडगा निघाला नसल्याने लक्ष वेधण्यासाठी दि.८ डिसेंबर भारत बंद देशव्यापी आंदोलन घेण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

     या धर्तीवर काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे यांनी दि.८ डिसेंबरला बारड बंद ठेवण्यात संदर्भात पोलिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते.काँग्रेस पक्षाच्या बंदच्या हाकेला दाद देत व्यापारी संघटनेने संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. केंद्र शासनाचा कृषी विधेयक कायदा शेतकरीविरोधी असून यामध्ये सुधारणा करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला आहे.  

      काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्यासंदर्भात सक्ती करण्यात आली नाही परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व स्तरातून घेण्यात आला होता.व्यापारी संघटनेचे अशिष देशमुख यांनी करुणा संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली असून व्यापाऱ्यांना वेठीस धरून बाजारपेठ बंद करण्यात येऊ नये असा सल्ला दिला.भारत बंद आंदोलन यशस्वीतेसाठी काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, श्रीराम कोरे ,राहुल आठवले, बालाजी लोणवाडे ,किशोर पिलेवाड ,गुणाजी आमदुकर, आनंदा कांबळे ,बालाजी चव्हाण, संजय आठवले, बंटी कांबळे, बाबुराव लोमटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांचे रक्षण करणे हिच बाबासाहेबांना आदरांजली-नेते प्रवीण गायकवाड

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

दि.६रोजी.मुदखेड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी नगर परिषद मुदखेडच्या वतिने दरवर्षी प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आयोजित आदरांजली सभेच्या ठिकाणी काही निवडक आंबेडकरी अनुयायानी बाबासाहेब आंबेडकरांना शब्दांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना भाजपाचे मराठवाडा प्रभारी नेते प्रवीण गायकवाड म्हणाले की,बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला ते समाजाने मुखोगत केला आहे.जसेकी शिक्षण हे वाघिनिचे दुध आहे.ते प्राशन केल्यास माणूस गुर्रगुर्रल्या शिवाय रहाणार नाही.शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!समता-बंधुता-न्याय आणि स्वातंत्र्य असे मोठ मोठे शब्द माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून अनेकदा सहजतेने ऐकायला मिळतात.हे बाबासाहेबांचे विचार आपण जसे उच्चारतो तसे अंगिकारणे देखील महत्वाचे आहे.जसेकी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार व्यक्त करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य दिले आहे.याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत आसलेली लोकशाही समजुन घेणे गरजेचे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.मानव समाजाच्या अंगातिल रक्ताचा थेंबही न सांडता समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणनारी प्रक्रिया म्हणजे लोकशाही असे सांगितले आहे.

या बाबासाहेबांच्या लोकशाही मूल्यांचे जतन करतांना अपण जेंव्हा समाजात आपले भाषण स्वातंत्र्य व्यक्त करतो तेंव्हा त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याची दक्षता घेऊन,व्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांची जोपासना करणे ही बाबासाहेबांना आचरणाची आदरांजली ठरेल असे परखड मत व्यक्त केले.

या वेळी सचिनकुमार कांबळे,रत्नाकर तारु,महेंद्र काळबांडे,देवराव चौदंते,भिसे आदींची समायोचीत भाषणे झाली.

या कार्यक्रमास नारायणराव चौदंते,प्रा.दिनेश शेटे,सुदाम गायकवाड,एकनाथ तारु,संजय सोनटक्के,दादाराव चौदंते,शिवानंद देवके,विलास कांबळे,मन्सूर पठान,सतिश पाटिल मुंगल,सुभाष चौ दंते,सुभाष यरपलवाड,सचिनकुमार कांबळे,ढगारे उपासक आदी आंबेडकरी अनुयाई उपस्थीत होते.

तळणी परिसरातील तुर अज्ञात रोगामुळे गेली वाळुन

सोयाबीन नंतर तुर पीकावर आलेल्या संकटामुळे शेतकरी हावालदिक

संपादक आशिष मुगटक

तळणी परिसरात तुर पीकावर आलेल्या रोगाची पाहणी करताना .


हदगाव/ तालुका प्रतिनिधी

   हदगाव तालुक्यातील तळणी परिसरातील अनेक शेतकऱ्यानी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत तुर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभी असलेली तुर वाळून जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक  अगोदरच गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. सोयाबीन पिकावर अस्मानी संकट आले असताना तुर पिक सुद्धा या अचानक आलेल्या रोगामुळे हातातून गेले आहे.एकीकडे तुर पिकावर अचानक आलेल्या रोगामुळे शेतकरी संकटात सापडला असताना कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून तालुका कृषी कार्यालय सध्या झोपेतच आहे हे दिसत आहे. शेतकऱ्यांनी भ्रमन ध्वनीवर कृषी सहाय्यक यांच्या शी बोलले असता त्यांनी असे  सांगितले कि मि अडीशनल आहे असे सांगून फोन ठेवून दिला.

ऐवढ्या मोठ्या तळणी गावासाठी पुर्ण वेळ कृषी सहायक मिळेल काय ?. जर मिळत नसेल तर अशा अचानकपणे आलेल्या रोगाला शेतकऱ्यांनी कशाप्रकारे बंदोबस्त करावा त्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी पहानी करून शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या कडून केले जात आहे. 

संकटात सापडले शेतकऱ्यांना भावनिकधीर देन्यासाठी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना मराठवाडा विभाग प्रमुख तथा किसान ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रमुख भगवानराव देशमुख, आणि शेतकरी प्रतापराव लोखंडे, प्रकाश तावडे, गजानन तावडे ,संघपाल पाईकराव , रामराव जाधव ,विष्णु तावडे , बळिराम चौरे यांनी तुर पिकाची शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

भगवानराव देशमुख यांनी मातृभूमी न्युजशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यां वर पुन्हा एकदा संकटं कोसळले असुन कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुर पिकावर आलेल्या अचानक रोगामुळे  शेतात विदारक चित्र दिसत आहे असे ते म्हणाले.

जवळा फाटक येथे जागतिक मृदा दिन साजरा

 मृदा दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन








मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

दि.५.रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे जवळा फाटक येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा मुदखेड यांच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती लक्ष्मणराव जाधव होते. प्रास्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी सुनील पुरी साहेब यांनी मृदा दिन साजरा करण्याचे उद्देश सांगून जमिनीच्या आरोग्याचे पिक उत्पादन वाढीमध्ये तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व सांगितले. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या सेंद्रिय खताचा वापर करावा तसेच माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

मंडळ कृषी अधिकारी वाघमारे साहेब यांनी विकेल ते पिकेल अभियान, स्मार्ट प्रकल्प व कृषी विभागाच्या योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक अनुप मोरे यांनी हळद पीक व्यवस्थापनातील स्वतःचे अनुभव सांगून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी केळी पिकाचे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन तसेच ऊसामध्ये पिकाला पूरक असलेले आंतरपीक घेऊन त्यापासून निघणाऱ्या उत्पन्नावर ऊस पिकाच्या उत्पादन खर्चाचे नियोजन करण्यास सांगितले. 

अध्यक्षीय संवादामध्ये लक्ष्मणराव जाधव यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून कृषी विभागाच्या सल्ल्याने खत तसेच कीड व रोगाचे नियंत्रण करावे असे आवाहन केले.

सूत्रसंचालन श्री धुमाळ साहेब यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक व्यंकटेश पाकलवार यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक श्रीमती रेशमलवार, श्रीमती देशमुख, श्रीमती शिंदे , श्रीमती हाटकर, श्रीमती शेख, संजय भिसे, अशोक मुंगल, आनंदराव उबाळे, विठ्ठल जाधव, बालाजी भोकरे,  कृषी मित्र आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार तालुका तंत्र व्यवस्थापक गीते यांनी मानले.

कृषक परवाना आणि लेआऊटची त्रुटी दाखऊन प्रलंबित !

मुदखेड शहरातील शेकडो फेरफार मंजुर करा-नेते प्रवीण गायकवाड (भाजपा मराठवाडा प्रभारी


संपादक आशिष मुगटक


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

 दि.३.मुदखेड येथील नगर पालिका क्षेत्र विकसनशील असून शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराचे निवाशी प्रयोजनाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.त्यातच जमीन माफिये याचा गैरफायदा घेत जमीन खरेदी विक्री व्यवहारात नागरिकांची मोठी फसवणूक करतात.त्यातच नियमांवर बोट दाखवून काम करणारा अधिकारी लाभलाच की,भ्रष्ट कारभारास अजुनच ऊत आला असे म्हंटलेतर नवल कसले? असाच प्रकार मुदखेड शहरात सुरु असुन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी लेआऊट आणि अकृषक जमिनीची परवानगीद्या आणि फेरफार करुन घ्या असा एकमेव कार्यक्रम गेल्या एक वर्षा पासून सुरु केला आहे.

त्यामूळे मुदखेड शहरातील शेकडो नागरिकांचे निवाशी प्रयोजनाचे भूखंड नोंदणीकृत दस्त असून देखील फेरफार कामी प्रलंबित आहेत परिणामी मुदखेड शहरातील शेकडो नागरिक निवाशी वापराच्या प्रयोजना पासुन वंचित आहेत.ही बाब कायदे संहीत नाही तर ही नागरिकांची कुचंबणा आहे. असा आरोप भाजपा मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  सविस्तर वृत्त असे की,मुदखेड शहरात गेल्या वर्षभरात शेकडो नोंदणीकृत दस्त परिवर्तनाच्या प्रतिक्षेत आहेत.यासाठी अकृषक आणि लेआऊट परवानगी नसल्याचे कारण समोर केल्या जात आहे.या कारणाचा धागा पकडून प्रवीण गायकवाड यांनी सन १९६६ चा क्रमांक ४१यामध्ये कलम ४२ब व ४२क समाविष्ट करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा)अधिनियम २०१७ चा हवाला देऊन हा कायदा अस्तित्वात असताना महाराष्ट्र जमीन महसूल सहिता ३७मधिल तरतूदीत सुधारणा करून ४२ब (१)कलमे४२,४२अ ४४आणि ४४अ यामध्ये कलमे अंतर्भूत आसले तरी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ यांच्या तरतूदी नुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रशिद्ध केल्या नंतर,जर पोट कलम (२)मध्ये तरतूद केल्या प्रमाणे रुपांतरण कर,अकृषक आकारणी आणि लागू असेल तेथे नजराणा किंवा अधिमुल्य आणि इतर शासकीय कर यांचा भरणा केला असेल तर अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीचा वापर हा अशा विकास योजनेतील वाटप आरक्षण किंवा निर्देशन या स्वरुपात दर्शविलेल्या वापरात रुपांतरीत करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि अशा विकास योजने नुसार अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापरा करता कलम ४२आणि कलम ४४अन्वये कोणतीही परवानगी घेण्याची अवशकता नाही.असे कायद्यात नमूद असताना उपरोक्त कायद्याचा विचार मुख्याधिकारी करत नाहीत तसेच सेवा अधिनियम कायद्याचा भंग करून मुदखेड शहरातील नागरिकांना वेठीस धरित आहेत. असा गंभीर आरोप करुन,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अधिनियम २०१७चा अवलंब करून,मुदखेड शहरातील नागरिकांचे निवाशी वापराच्या प्रयोजनासाठी प्रलंबित असलेले शेकडो परिवर्तनाचे प्रस्ताव मंजूर करुन,मुदखेड शहराच्या वाढत्या निवाशी नागरी जीवनास सुखकर सहकार्याची मागणी लेखी स्वरुपात गायकवाड यांनी केली आहे.

 या निवेदनाच्या प्रति ई प्रणाली आणि भ्रमणध्वनी, वॉट्स अप प्रणालीचा वापर करुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री ना.अशोक चव्हाण,विरोधिपक्ष नेते देवेंद्र फडणवीस,खा.प्रताप पाटिल चिखलिकर,आ.राम पाटिल रातोळिकर यांना माहितिस्तव पाठवल्या आहेत.यावर मुदखेड शहरातील लोकनियुक्त प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण मुदखेड शहराचे लक्ष्य लागले आहे.

मुगट येथे हॅपीनेस प्रोग्राम शिबीर संपन्न

   शिबीरातील युवकां कडून स्वयंस्फूर्तीने केली ग्राम सफाई.


मुगट/ प्रतिनिधी

 मुगट येथील मुगट पाटी जवळील आश्रम शाळेमध्ये परम पूज्य. श्री.श्री.रविशंकरजी महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग या जागतिक संस्थेद्वारे मुदखेड तालुक्यातील मुगट येथे सहा दिवशीय हॅपीनेस प्रोग्राम (आनंदाची अनुभूती) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सहा दिवशीय शिबिरात सहभागी झालेल्या अनेक साधकांना या शिबिराचे आयोजक तथा आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक श्री राजेश्वर भुरे यांनी या सहा दिवशीय शिबिरामध्ये योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया व जीवन सुखमय जगण्यासाठी  प्रशिक्षित केले. सुखी जीवनाची गुरुकिल्ली या सहा दिवशीय शिबिरामध्ये उपस्थित साधकांना त्यांनी दिली.


 या सहा दिवशी शिबिरामध्ये गावातील अनेक नवतरुण, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिरांमधून प्रेरित होऊन स्वयंस्फूर्तीने सर्व साधकांच्या कडून मुगट ग्रामतील मुख्य रस्त्याची सफाई करण्यात आली.


 मुगट येथे हॅपीनेस प्रोग्राम चे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वयंसेवक म्हणून माधवराव कल्याणे, विश्वनाथ कल्याणे, अनिल कुलकर्णी, वामन हाटकर सह आदींनी परिश्रम घेतले

लोकप्रिय बातम्या