बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

संपादक आशिष मुगटकर



बारड / प्रतिनिधी

       दि. २६ रोजी मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. 

          जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या आपल्या भारत देशात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली.अनेेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारून ते देशाला अर्पण केले. ३९५ कलमे, २२ भाग,८ परिशिष्ट असलेल्या भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाची अंमलबजावनी २६ जानेवारी १९५० पासुन करण्यात आली.

          भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे.जे आपल्याला आर्थिक आणि वैयक्तिकरित्या मजबुत बनवते.देशाला एकता आणि विकास क्षमता प्रदान करते.संविधानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे.भारत देशाला धर्मनिरपेक्ष गणराज्य म्हणुन घोषित करण्यात आले आहे.


          भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो.

 याप्रमाणे आज दि २६ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी  प्राचार्य हेमंत इंगळे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रतीमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

 यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ पंजाबराव शिंदे, प्रा माने पी पी, प्रा सावंत एन एल, प्रा कैलाश कपाटे, प्रा कैलाश खानसोळे, प्रा मारोती पवार, प्रा मनोहर ओसावर, प्रा बापू केंद्रे, प्रा गोकुळ चव्हाण, प्रा संभाजी रावते,प्रा प्रशांत कपाळे, प्रा सौ ज्योत्स्ना पवार, संतोष पवार, प्रकाश फाजगे,कमलबाई बुकतरे आदी उपस्थित होते

जि.प.हा.विष्णुपुरी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा




मुदखेड तालुका / प्रतिनिधी

     दि. २६ रोजी संपुर्ण भारतात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज विष्णुपुरी येथील प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मितभाषी, संयमी व सुसंस्कृत मुख्याध्यापक मा.एन.एन.दिग्रसकर हे होते. 

या प्रसंगी  संविधान  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मु.अ. दिग्रसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हणाले की, संविधान हे जगातील एकमेवाद्वितीय असा ग्रंथ असून यामध्ये सर्वधर्मसमभावचे तत्त्व पाळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून संविधानाचे वाचन व चिंतन करणे आवश्यक आहे.



      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभारयुक्त मार्गदर्शन इंग्रजी विषयाचे जेष्ठ-तज्ज्ञ माध्यमिक शिक्षक एम.ए.खदिर यांनी केले. यासमयी सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले.

"हे प्रशिक्षण परिषद आहे का सक्त वसुली संचालनालय,शिक्षकांच्या संतप्त प्रतिक्रीया"

शिक्षक आमदार यांनी लक्ष घालण्याची मागणी !...


 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून राज्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक वअध्यापक विद्यालयातील सर्व पात्र शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची प्रक्रीया  सुरुवात झाली या प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांकडुन प्रत्येकी दोन हजार रु. प्रशिक्षण शुल्क सक्तीने आकारल्या जात आहे त्यामुळे हे प्रशिक्षण परिषद आहे का सक्त वसुली संचालनालय आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांमधुन उमटत असुन या प्रकरणी शिक्षक आमदार यांनी लक्ष घालण्याची मागणी बहुजन शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी एका निवेदनाद्ववारे केली आहे.

            राज्यातील  ज्या शिक्षकांची सेवा १२वर्ष  २४ वर्ष सलग झाली आहे अशा पात्र शिक्षकांसाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून वरिष्ठ व निवड वेतनश्रणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी आँनलाइन नोंदणी सुरुवात केली आहे.मागील ५ ते ६ वर्षापासून हे प्रशिक्षण घेणे बंद केले होते. त्यामूळे अनेक शिक्षक या श्रेणीपासून वंचीत आहेत म्हणुन अनेक शिक्षक संटनेकडुन शिक्षक आमदार व पदविधर आमदार यांना वेळोवेळी निवेदने देवुन प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा अशी विनंती केली होती.त्यामूळे शिक्षक आमदार विक्रम काळे व पदविधर आमदार सतिश चव्हाण यांनी सर्वच संघटनेच्या निवेदनाचा स्विकार करुण या प्रकरणी लक्षदेवून प्रशिक्षण घेण्यासाठी शासना कडे पाठपुरावा केला.त्याचाच परीणाम की काय राज्य प्रशिक्षण परिषदेने २२ नोव्हेंबरला एक पत्रक काढून पात्र शिक्षकांची नोदणी सुरु केली आहे.

      मात्र पत्रातील मूद्दा क्र.१४ नुसार ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्या पात्र शिक्षकांनी प्रत्येकी २००० रु. आँनलाईन परिषदेकडे जमा करण्याची अट टाकली आहे.या अटीमुळे राज्यातील शिक्षक मात्र अचंबीत झाले असुन  शासनप्रती आपला रोष प्रगट करत आहेत कारण या पुर्वी याच श्रेणीचे प्रशिक्षण राज्यमंडळ जिल्हास्तरावर अगदी निशुल्क घेत होते शिक्षकांकडून कोणतीच फी आकारत नव्हते मग प्रशिक्षण परिषदेला काय गरीबी आली की शिक्षकांकडून सरसगट २००० रु सक्तीने वसुल करत आहे.मग हे काय प्रशिक्षण केंद्र आहे का सक्तवसुली संचालनालय आहे हाच प्रश्न राज्यातील शिक्षकांना पडला आहे व शासनप्रती रोष निर्माण होत आहे म्हणुन हे प्रशिक्षण निशुल्क घेण्याच्या मागणीचे निवेदन राज्य शासन,आमदार विक्रम काळे व पदविधर आमदार सतिश चव्हाण यांना दिल्याचीमाहीती माजी मंडळ सदस्य यशवंत कांबळे यानी दिली आहे.या निवेदनावर बहुजन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रोहीदास कांबळे,टि पी वाघमारे,वसंत दिग्रसकर शंकरराव हानमंते,शेख नजिर,अरविंद काळे,नागोराव ढवळे व इतर पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

 • भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे    उद् घाटन
 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

दि.२२ मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई ही न समजण्यापलीकडची आहे. दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याच्या विकासाकडे पाहण्याची दृष्टी दुजाभाव करणारी असल्याची संतप्त भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 

 


नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूकीस आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे असून याबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा करेल असे त्यांनी स्पष्ट केले. भोकर येथील आज उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाला सन २०१६ मध्ये मान्यता प्रदान केली गेली. अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते. या प्रलंबित असलेल्या कामाला मागील २ वर्षात युद्ध पातळीवर गती देऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करतांना मला आत्मिक समाधान असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. याचबरोबर ज्या सर्वसामान्य जनतेनी संपूर्ण गावाला वळसा घालून इतके वर्षे त्रास सहन केला त्यांच्याप्रती शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली. या पुलाच्या भुयारी मार्गाची पुर्तता येत्या ३ महिन्यात करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


 भोकरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच येथे १०० खाटाचे रुग्णालय आपण उभारत आहोत. न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार करुन जनतेच्या प्रशासकीय सुविधेसाठी दर्जेदार कामे आपण करीत आहोत. या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुप धारण करतो. याची मला कल्पना असून त्याबाबतही आमचे नियोजन सुरू असून सुधा प्रकल्पाची उंची वाढवून अधिक पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उंची वाढविण्यास शासनाची मान्यता मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले. यातून सर्वच गावांचा प्रश्न सुटेल असे नाही तर सुधा प्रकल्पासमवेत पिंपळढव प्रकल्पालाही आपण चालना देत असल्याचे त्यांनी सांगून पाणी पुरवठ्याच्या प्रलंबित प्रकल्पांना मार्गी लावू असे स्पष्ट केले.  

 राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आमाप नुकसान झाले. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी जी ६ हजार ८०० रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करुन ती मदत आम्ही १० हजार रुपये हेक्टरी पर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची जी दिशभूल केली गेली ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी आपण जवळपास ११०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकलो. यात पिक विमा योजनेचे ५५० कोटी रुपये हे संपूर्ण महसूल यंत्रणा दक्ष ठेवून त्या विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि पिक विमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून राज्य शासनाच्या धर्तीवर ही सुधा हेक्टरी १० हजार रुपयापर्यंत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 या रेल्वे उड्डाण पुलाच्या वाहन मार्गाची रुंदी ७.५ मिटर असून एकुण लांबी ८७४ मिटर इतकी आहे. एकुण मान्यता ४० कोटी रुपयाची असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ३२.१६ कोटी रुपयाचा निधी व तांत्रिक मान्यता प्रदान केली.

 कामाचा दर्जा व वेळेवर कामाची निर्मिती यात कोणतीही तडजोड नाही विकास कामांना मिळणारा निधी हा अनेक आव्हानातून मिळावावा लागतो. ज्या विकास कामांसाठी आपण हा निधी आणलेला आहे त्या कामांवरच हा निधी कामातील गुणवत्तेसह दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करुन घेऊन खर्ची घालणे हे प्रत्येक विभाग प्रमुखांचे कर्तव्य आहे. रस्ते विकासासह इतर कामात जर काही गडबड आढळली तर खुशाल आमच्याकडे तक्रार करा आम्ही वेळेवर त्याचा बंदोबस्त करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 आज सकाळी त्यांच्या हस्ते पिंपळढव येथे नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन व इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

नांदेड जिल्ह्यातील वारकरी दाम्पत्याचा सत्कार करतांना जेंव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार भारावून जातात !

 कार्तिक एकादशी निमित्त निळा येथील टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी 

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

  कार्तिक एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्यासमवेत मानाचे वारकरी म्हणून संधी मिळाली ती लोहा तालुक्यातील निळा गावच्या टोणगे दाम्पत्याला. मागील 30 वर्षापासून पंढरपूरची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. 



राज्याच्या 12 कोटी जनतेच्यावतीने आज पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी मिळाली. कोरोना सारख्या आरीष्टातून राज्याला सावरता आले. जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. अशा या काळातून सावरतांना राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाला स्थैर्य व समृद्धी येऊ दे. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने व एकदिलाने राहून त्यांच्या आरोग्याची, प्रगतीची मी प्रार्थना केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून सत्कार करतांना ते कृतज्ञतेने भारावून गेले. 



यावेळी टोणगे दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचा यथोचित विठ्ठल राखुमाईची मूर्ती देऊन सत्कार केला. तीस वर्षे विठ्ठलाची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याच्या भक्तीचा गौरव करुन त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. या दाम्पत्यासाठी राज्य परिवहन महामार्गाच्या बसद्वारे प्रवासासाठी पास हस्तांतरित करतांना लवकरच एसटीचा प्रश्न सुटेल असे भाष्य करीत वस्तुस्थिती अजित पवार यांनी सर्वांपुढे मांडली.


प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष मुदखेड च्या वतीने खासदार चिखलीकर यांना निवेदन

 

हिंगोली जिल्ह्यातील उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्याची मागणी

संपादक आशिष मुगटकर


निवेदन :- खासदार चिखलीकर  यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्षा व पदाधिकारी मुदखेड


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे भाजप चे खासदार मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर दिपावली निमित्त मुदखेड येथे शुभेच्छा देण्यासाठी आले असता प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व जनशक्ती पक्ष मुदखेड च्या वतीने खासदार साहेबांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या नांदेड जिल्ह्यातील व मुदखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या खासदार निधीतून ५% निधी मिळून द्यावा.हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी अपंगांसाठी हिंगोली जिल्ह्यात उपक्रम राबविले तो उपक्रम नांदेड जिल्ह्यात ही राबविला जावा यासाठी साहेबांशी चर्चा करण्यात आली .

आपल्याला साहेबांनी येत्या दोन महिन्यांच्या आत निकाली लागणार असे सांगितले आहे ..

यावेळी प्रहार प्रमुख अनिल शेटे पाटील महिला अध्यक्षा केशरबाई शंकरराव शिंदे पाटील शहराध्यक्ष गोविंदराव लोने , साहेब निवडंगे , सल्लागार नामदेव हाटकर, शंकरराव शिंदे पाटील,मानिका मामा जोंधळे ,पावडे बंघु व गुडमलवार , व बरेच दिव्यांग बांधव उपस्थित होते .

मुदखेड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 

 विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी १९९० च्या अयोध्या कारसेवेत श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील अमर बलिदानी कारसेवक कोठारी बंधू आणि समस्त रामभक्तांच्या दिव्य बलिदानाची आठवण म्हणून दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशभरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याचनिमित्ताने मुदखेड शहर व तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाच्या वतीने श्री अपरंपार मठात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नांदेड जिल्हा मंत्री श्री शशिकांतजी पाटील जिल्हा सहमंत्री यांची विशेष उपस्थिती होती. श्री राजकुमार गोडसे मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. श्री दिलीप फुगारे सर,माजी नगरसेवक कैलास गोडसे,सुरेश शेटे, देविदास चंद्रे,शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे,भाजप शहरअध्यक्ष अमोल पाटील अडकिणे ,मुन्ना चांडक,अविनाश झमकडे,कालिदास जंगलीवाड,संतोष चमकुरे, गिरीष कोत्तावार, विठ्ठल आचार्य,ऋषीकेश पारवेकर,राहुल चिंतेवाड, दैनिक सकाळ चे नांदेड चे प्रतिनिधी श्री गौरव वाळिंबे,गंगाधर पाटील मगरे,अमोल कुलकर्णी, अभय बलमखाणे,अमोल आबादार,गजानन कमळे, राजेश बादलवाड शुभम बोडके, मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक यांची या रक्तदान शिबिर उपस्थिती होती.

  त्याचबरोबर शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम भारतमाता, भगवान श्रीराम आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. रक्तदाब शिबिराला सुरुवात करण्यात आली.





लोकप्रिय बातम्या