मुदखेड तालुक्यातील वाळू घाटांवर वाळू उपसा जोरात; महसूल प्रशासनाच्या कारवाईचे सोपस्कर पूर्ण.

वाळू उत्खनन करणारे पाच व्यक्ती ताब्यात 




मुदखेड / तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असून याकडे मात्र प्रशासनाचे सोपस्कर दुर्लक्ष होत असून नावालाच महिनाभरातून एखादेवेळी महसूल प्रशासन कारवाई करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत आहे.

मागील दोन-अडीच महिन्यापासून कोरोना काळामुळे वाळू माफियांचे मोठे फावले आहे या काळात वाळूमाफियांनी आपला मोर्चा मुदखेड तालुक्यातील गोदावरीच्या घाटांवर वळवला आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा, वासरी, शंखतीर्थ, ब्राह्मणवाडा, खुजडा, टाकळी व चिलपिंपरी या भागांमध्ये सक्शन पंपाच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असून या वाळू माफियांना महसूल विभागातील कोणत्या अधिकार्‍यांचे तर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे हा विषय मात्र संशोधनाचा बनलेला आहे.

लाकडाऊनच्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून मुदखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असून या बांधकामांना वाळू तस्करांकडून वाळूचा पुरवठा केला जात आहे. सध्याला तीन ब्रास वाळूची गाडी १८ ते २२ हजार रुपये या दराने विक्री होत आहे त्यामुळे वाळूतस्करांनी मात्र आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.

गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या आमदुरा, वासरी, चिलपिंपरी, शंखतीर्थ, कांबळज, खुजडा, टाकळी, ब्राह्मणवाडा या भागातून राजरोसपणे दररोज मुदखेड मार्गे शेकडो वाळूच्या गाड्या जात असून या गाड्यांवरती व या वाळूतस्करी वरती प्रशासनाचा कुठलाच अंकुश दिसत नाही. प्रशासन मात्र  महीन्यातून एक ते दोन वेळा आपली कारवाई गोदावरीच्या पात्रात सक्शन पंप जिलेटिन च्या द्वारे उडवून देऊन कायदेशीर कारवाई व प्रक्रिया पूर्ण करतात मात्र हे उडवून दिलेल्या सक्शन पंपाचे अवशेष जप्त करण्याची तसदी मात्र प्रशासन घेत नाही, जर हे सक्शन पंप जप्ती केले तर या सक्षम पंपाचे मालक कोण आहेत याचा शोध पोलीस प्रशासन लावू शकते व संबंधित तस्करांवर ती कार्यवाही देखील होऊ शकते, परंतु महसूल प्रशासन अशा या कारवायांना पुढे का जात नाही? हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे.

मागील अनेक दिवसापासून गोदावरी गंगा प्रेमीकडून सतत मागणी होत असते की सदरील सक्शन पंप हे जिलेटिन द्वारे पाण्यामध्ये उडवून देऊ नये हे सक्शन पंप पाण्यातून बाहेर काढून उडवून द्यावे किंवा जप्त करावे अशी मागणी होत असते कारण गोदावरीच्या पात्रांमध्ये असलेल्या पाण्यात जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात असून या सक्षन पंपामध्ये असलेले ऑइल, डिझेल व जिलेटिन कांड्या द्वारे उडवून देण्यात आल्याने होणारा विषारी वायु पाण्यात पसरून या पाण्यात असलेले जलचर प्राणी मृत्यू पावत आहेत या प्राण्यांच्या मृत्यू व गोदावरी नदीच्या पात्रातील दूषित होत असलेले पाणी यास जबाबदार कोण? असा प्रश्न गोदावरी गंगा प्रेमीकडून होत आहे.

आज  आज ता.३०, रविवारी पहाटे ४.३० वाजता उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसीलदार दिनेश झाम्पले यांच्या पथकास वासरी येथे गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा करणारे सक्शन पंप ( वाळू उपसा करणारी बोट ) चालू असल्याची माहिती मीळताच महसूलच्या पथकाने सक्शन पंप उध्दवस्त करण्याची कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झाम्पले,नायब तहसीलदार संजय नागमवाड यांचे पथक वासरी येथे पहाटे ४.३० वाजता पोहोचले असता वासरी हद्दीतील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैध उत्खनन करणारी सक्शन पंप बोट आढळून आली. लगेच सदर ठिकाणी परवानाधारक जिलेटीनचा वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोट करवून बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट करण्याची कारवाई केली गेली. तसेच सदर वाळू उत्खनन करणारे पाच व्यक्तीना ताब्यात घेऊन मुदखेड पोलिसांकडे सुपूर्द   करण्यात आले. सदर कारवाई पूर्णत्वास नेण्याकरिता मंडळ अधिकारी बालाजी कुहाडे , मंडळ अधिकारी हयुम पठाण, तलाठी मारुती मगरे, संजय खेडकर व विकास गलांडे यांनी सहभाग घेतला होता.




हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा द्या. किसान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष - भगवानराव देशमुख

 संपादक आशिष मुगटकर


हदगाव / तालुका प्रतिनिधी

हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२०- २०२१ मध्ये सोयाबीन, कापसाचा पेरा केला होता. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिकाचा पिक विमा भरला होता.त्यात सोयाबीन कापूस यांचा समावेश होता.

 सोयाबीन, कापूस पीक काढणीच्या वेळी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यात मोठ्या प्रमाणात वर शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीनच्या  ढगा खाली पाणी जाऊन त्याला मोड फुटले होते.तर अनेक सोयाबीन ढग पाण्यावर तरंगत होतो. या नुकसानीच्या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली तर अनेक शेतकरी ऑनलाइन तक्रार करू शकले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.? 

यावेळी सुध्दा बळीराजा संकटात सापडला आहे. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा अशी मागणी किसान ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी एका लेखी निवेदनात हदगाव तहसीलदार यांच्या कडे मागणी केली आहे. 

निवेदनावर गणेशराव तावडे, नारायण तावडे सह आधीच्या स्वाक्षर्‍या आहेत.







राष्ट्रीय महामार्गावरील कॅनॉल पुलाजवळ पाण्यात कार कोसळून अपघात

 अपघातात जीवीत हानी टळली

संपादक आशिष मुगटकर

मदत कार्य :- राष्ट्रीय महामार्गावरील कॅनॉल पुलाजवळ पाण्यात कार कोसळली ती कार काढण्यासाठी मदत कार्य करताना पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ.

बारड / प्रतिनिधी

बारड राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग पोलीस केंद्राच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनल पुलाजवळ कार पाण्यात कोसळून अपघात घडल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे कारमधील तिघेजण कॅनॉलच्या मोठ्या नाल्यांमध्ये बुडत असताना बारड महामार्ग पोलिस व बारड ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांचा जीव वाचवण्यासाठी यश मिळाले असून त्यांच्या प्रयत्नाने तिघांंचा जीव वाचला आहे.

कार चालक कोडींबा जाधव वय ३५वर्षे रा.हसापुर ता.भोकर येथील रहीवाशी असुन ते आपल्या परिवारासह पत्नी  रुक्मिणीबाई जाधव,मुलगी प्रगती, मुलगा विश्वास, हे चौघे गावाकडे रात्री च्या वेळी कार क्रमांक एम.एच.२६ए.एस.४९९९या गाडीत जात असताना बारड शेंबोली कँनोल पुलाजवळ गाडी थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरले हँडब्रेक न लावता गाडी थांबवली नुटल मध्ये असलेलेली गाडी कँनोल पुलाच्या उताराच्या दीशेने कँनोल च्या वाहत्या पाण्यात पडली पाण्यात पडलेल्या कार मध्ये परिवार असल्याने जाधव यांनी थेट महामार्ग पोलीस केंद्र गाटले घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच क्षणाचाही विलंब नकरता घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जाधव यांच्या पत्नी व दोन मुलांना बारड ग्रामस्थानच्या मदतीने कँनोल पाण्यात पुलामध्ये अडकलेल्या कार मधुन तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.


घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असुन अपघातात अडकलेल्या तिघांना ही बारड रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आला आहे.

घटनास्थळी महामार्ग पोलीस व बारड ग्रामस्थ वेळीच पोहचल्याने "देव तारी त्याला कोण मारि म्हणी नुसारच त्यांना बचाव दुतच बनले आहे.

यावेळी घटनास्थळी वर बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख,प्रकाश देशमुख,युवा कार्यकर्ते विठ्ठल गोडसे तर पोलीस आधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बालाजी यवते,योगेश भद्रे, शेवाळकर, चनाजोलु, सातारे,गणी,श्रीनिवास, श्रीमंगले,थाडके आदीने घटनास्थळी परिश्रम घेत पाण्यात पडलेल्या कार मधुन बाहेर काढून तिघांचा जीव वाचवला आहे.

गेल्या अनेक दीवसापासुन राष्ट्रीय महामार्गाचे कामे सुरु आहेत परंतु धोकादायक ठिकाणी रेडथिप किंवा दिशा फलक हलगर्जीपणे लावले असल्याने अनेक अपघातात घटना घडल्या आहेत या घटनेस समंधीत कंट्रशन राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असल्याने समंधीतांनवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थान कडून करण्यात येत आहे

मुगट परिसरात दुचाकी स्वारांना लुटनारी टोळी सक्रिय.

 कामगारांना आडवून रोख रक्कम व मोबाईलची लुट

संग्रहित छायाचित्र

मुगट / वार्ताहर

 मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातील मुगट पाटी ते मातासाहेब रोड रात्रीला दुचाकी स्वारांना लुटनारी टोळी चांगलीच सक्रिय झाली आहे.आता पर्यंत त्यांनी रात्रीचा फायदा उचलून अनेकांना चाकुचा धाक दाखवून लुटले आहे.

मुगट पाटी पासुन जवळच खडकी व  होळ नाला असुन त्यावर मोठें पुल बांधण्यात आले.या पुला जवळील रस्त्या हा वळनदार आहे.पुला जवलच गतीरोधक झाल्यामुळे रात्रीला याठिकाणी वाहनांची गती कमी होते.याचाच फायदा घेत रात्रीला ८ते८:३० च्या वेळेत दबाधरुन  पुलाच्या जवळ बसतं आहेत.तर कधी गाडीचा पाठलाग करत या पुलावर दुचाकी स्वारांना गाठुत आहेत.

या पुलावर वाहनाची गती कमी होताच दुचाकी स्वारांच्या गळ्याला चाकू लावुन त्यांच्या कडील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला जात आहे.

आता पर्यंत मुगट येथील नांदेड ला दुकानात कामाला गेलेल्या कामगारांना तीन, चार दुचाकी स्वारांना या टोळीने लूटले आहे. या घटनेमुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





निवघ्यात अज्ञात व्यक्तीकडून पिस्तूलाने गोळ्या झाडून युवकाचा खून

 

पोलीसांना तपासात मयताचे प्रेत ईजळी शिवारात आढळले


बारड / प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील निवघा येथील शिवाजी पुतळा चौकात अज्ञात व्यक्तीकडून पिस्तूलाने  गोळ्या झाडून युवकाचा खून झाला असल्याची घटना घडली आहे. 

मयत देविदास माधवराव पवार वय ३५ वर्ष रा.निवघा ता.मुदखेड धंदा शेती या युवकाचे प्रेत पोलीस तपासात ईजळी शिवारात मिळाल्याची माहिती पोलीसांन कडून मिळाली आहे.

अज्ञात  व्यक्तीकडून देविदास पवार यांच्या सोबत शिवाजी चौकाच्या बाजूवरील रस्त्यावर बाचाबाची झाली असल्याची माहिती ग्रामस्थान कडून मिळाली असून नेमके घटनेमागचे  कारण काय ते अद्याप कळाले नसून तपासात पुढे येणार आहे.

अज्ञात व्यक्तीने गोळीचा फायर करत देविदास पवार यांना गाडीवरून पळूवन नेत असताना तिघेजण असल्याचे कळाले या  सदरिल घटना गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बारड पोलीसानी घटना स्थळावर धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे याप्रकरणी एडिशनल एसपी विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी बाळासाहेब देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे पोलीस उपनिरीक्षक वानोळे यांच्या पोलीस पथकाने तपास चक्र गतीने चालवत तपासाअंती अवघ्या दोन तासात तपासात पोलीसांना मयत देविदास पवार यांच्या वर गोळीबार झाला प्रेत ईजळी शिवारात मिळून आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांनी यावेळी सांगितले पढील तपास चालू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

निवघा येथे देविदास पवार नावाच्या व्यक्ती वर गोळीबार झाला ईजळी शिवारात तो मय्यत मिळाला पुढील तपास चालू आहे.शिवराज तुगावे सहाय्यक पोलीस निरीक्षक बारड, ता.मुदखेड हे करत आहेत

नांदेड व मुदखेड तहसीलच्या पथकाकडून वाळु माफिया विरुद्ध धडक कारवाई

 मुगट गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे सक्शन पंप उध्वस्त करून नष्ट.


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 दि. १३ रोजी सकाळी नायब तहसिलदार महसूल १ मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांना मौजे मुगट येथे गोदावरी नदी पात्रात अवैध रित्या वाळु उपसा करणारे सक्शन मशीन ( वाळू उपसा करणारी बोट) चालू असून काल रात्री पासून उपसा चालू असल्याचे समजले. 

    सदरील महिती त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली असता त्यांनी सदर बोट नष्ट करण्याचे आदेश दिले .

तदनंतर नांदेड तहसिल चे पथक व मुदखेड तहसील चे पथक जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर  यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री लतीफ पठाण , व उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे तहसीलदार  किरण अंबेकर ,व तहसीलदार  दिनेश झांपले नायब तहसिलदार  मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड व मुदखेड तहसिल चे पथक मौजे मुगट येथील गोदावरी नदीच्या पात्रात सकाळी १० वाजता पोहोचले या ठिकाणी त्यांनी परवाना धारक जिलेटीन वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोट करवून बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट करण्यात आली आहे.

सदर कारवाई पूर्णत्वास नेण्याकरिता मंडळ अधिकारी , खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, बालाजी कुऱ्हाडे  तलाठी ईश्वर मंडगीलवार , आकाश कांबळे,राहुल चव्हाण,संजय खेडकर प्रवीण होंडे, विकास गलांडे , तलाठी  अपर्णा देशपांडे कोतवाल भांगे यानी सहभाग घेतला 

महसूल प्रशासन जरी कोव्हीड च्या कामात व्यस्त असले तरी अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर फोजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार श्री किरण अंबेकर व श्री दिनेश झांपले यांनी कळविले आहे..

शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करा.

  शिवा संघटना मुदखेड यांची तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी.

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये व निमशासकीय कार्यालयांमध्ये शासनाच्या जीआर नुसार सर्व ठिकाणी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करा याबाबत सक्तीचे  तहसील प्रशासनाने आदेश देण्या संदर्भात शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश कांचनगिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीनेश झांपले यांच्या कडे लेखीनिवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी जगातील पहिली संसदीय लोकशाही निर्माण करण्याचे कार्य केले असुन वयाच्या ३६वर्षी आयुष्यात सामाजिक समतेचे प्रचंड काम केले या महामानवाची  ८९० वी जयंती अक्षय तृतीयाच्या दिवशी  सर्वत्र साजरी करण्यात येते मुदखेड तालुक्यातील  सर्व शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत शासकिय, निमशासकीय,कार्यालय कोरोना नियमावलीचे पालन करत जयंती साजरी करण्याचे आदेश तहसिल प्रशासनाने द्यावेत अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनावर शिवा संघटना तालुका अध्यक्ष प्रकाश कांचनगिरे,कृ. उ. बा. स. संचालक सुरेश शेटे, शिवकुमार देशमुख,विलास कापसे,सचिन चंद्रे,सुधाकर कराळे, नारायण नरडेले,सदाशिव तांडे, राजेश महाशेठे,चंद्रकांत राजेवार,प्रल्हाद गोरगे,मन्मथ राजेवार, बाळू चुंचे,प्रकाश देवठाणकर,बाळू चंद्रे,आशोक नरडेले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गोविंदराव नागेलीकर यांनी घेतली मृत महिलेच्या परिवाराची भेट.

संपादक आशिष मुगटकर


मुगट /प्रतिनिधी

दि. १० रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मुगट येथील वीज पडून मृत्यू पावलेल्या लक्ष्मी बालाजी वर्षेवार यांच्या परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. या घटनेत जखमी झालेल्या ३ महिलांची सुद्धा त्यांनी विचारपूस केली व त्यांच्या परिवाराला धीर दिला. यावेळी शासनाकडून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भिमराव पा कल्याणे,माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी विलास हाटकर, माजी सभापती प्रतिनिधी शत्रुघ्न गंड्रस, माजी उपसरपंच रमेश पा.कल्याणे, चेअरमन माधवराव पा कल्याणे, उपस्थित होते.

मुगट येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू;तीन महिला जखमी

 संपादक आशिष मुगटकर

मुगट/वार्ताहर

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि९ रोजी सकाळी ९:३० ते१० च्या दरम्यान अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडला  मुगट शिवारातील मुगट रेल्वे स्टेशन जवळ एका शेतात ही वीज पडली. रेल्वे स्टेशन जवळील शेतात लक्ष्मी वर्षेवार व इतर तीन महिलांसोबत आपल्याच शेतात ज्वारी खुडण्याचे काम करत होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे व विजेच्या कडकडाटा मुळे लक्ष्मी व इतर सोबतच्या तीनही महिला लिंबाच्या झाडाखाली थांबल्या होत्या त्यातील सौ. लक्ष्मी बालाजी वर्षेवार (अंदाजे वय२५) या महिलेच्या अंगावर वीज पडली व त्या जागीच मृत्यू पडल्या.

 त्यांच्या सोबत असणाऱ्या तीन महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या असून या सर्वांना मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी नेल्यावर लक्ष्मी वर्षेवार यांना मृत घोषित करण्यात आले असून सोबतच्या तिनी महिलांना नांदेड येथील दवाखान्यात हलविण्यात आलेले आहे.

 जखमी महिला. मध्ये इंदुबाई लोखंडे, रेणुका वर्षेवार, अर्चना मेटकर यांचा समावेश आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे

मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे राज्य व केंद्र सरकारचा निषेध

 मुदखेड तहसीलदार यांना लेखीनिवेदन देऊन सकल मराठा समाज मुदखेडच्या वतीने निषेध.


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद

दि.६रोजी मुदखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे मुदखेड तहसीलदार यांना लेखीनिवेदन देऊन आपला निषेध व्यक्त केला.



सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या मनात एक असंतोष निर्माण झाला आहे. त्याचेच पडसाद आज मुदखेड तालुक्यात दिसून आले. सकल मराठा समाजाच्या वतीने मुदखेड तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देण्यात आले. त्यात सुप्रीम कोर्टाने मराठाआरक्षण साठीचा कालचा दिलेला निर्णय हा मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आहे. राज्य व केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. 

राज्य व केंद्र सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा नाहीतर मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरेल. कोरोनाच्या या महामारी मुळे शांततेत केवळ निवेदन देत आहोत परंतु यापुढे राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा सकल मराठा समाज मुदखेड च्या वतीने यावेळी देण्यात आला.

या निवेदनावर शत्रुघ्न गंड्रस, गोपीराज पवार, पंजाबराव मुंगल, नामदेव शिंदे, शिवाजी वडजे, गंगाधर मगरे, विश्वंभर पवार, सुभाष मगरे, मारुती गाडे, गोविंद शिंदे, गोविंद गाडे, गणेश खानसोळे, अमोल अडकिने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

बंगाल मधील हिंदूं वर होणाऱ्या अत्याचाराचा विश्व हिंदू परिषद नांदेड कडून निषेध

 दोषीवर कठोर कारवाई व राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी.

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात तेथील हिंदू समाजावर अत्याचार केला जात आहे हिंदू समाजातील लोकांची काही समाज विघातक लोकांकडून निर्घृण हत्या केल्या जात आहेत. महिलांवर अत्याचार करून त्यांनासुद्धा मारून टाकली जात आहे. हे सर्व चालू असताना सुद्धा तेथील सरकार डोळे बंद करून बसले आहे. अशा समाजविघातक लोकांना वेळीच आळा घातला गेला पाहिजे नाहीतर कित्येक हिंदूचा नरसंहार येणाऱ्या काळात होतील हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे.

या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद कडून व बजरंग दल कडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हंटले आहे. सदरील निवेदन हे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

 या निवेदनावर शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार,महेश देबडवार, कृष्णा इंगळे, अक्षय पाटील, पवन यादव, सचिन, गणेश फुलारी,गौरव,राम, चंद्रकांत धसकनवार, कृष्णा उदावंत, दामोपंथ गोस्वामी, चंदनसिंह चंदेल,आकाश कापकर, कृष्णा सिंग ठाकूर आदीच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.



आमदुरा येथील गोदावरीच्या काठावर घाटाचे आणि आमदुरा- चिकाळा -चिकाळा तांडा लहान या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन आ.राजुरकर यांच्या हस्ते संपन्न



भूमिपूजन :- आमदुरा येथे गोदावरी नदीच्या काठावर घाट बांधकामांचे भूमिपूजन करताना आ.अमरनाथ राजुरकर,सौ.अरुणा कल्याणे,श्री.भीमराव पाटील कल्याणे,व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मा.अशोकरावजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नांदेड यांच्या प्रयत्नातून मुदखेड तालुक्यातील आमदुरा गोदावरी नदीच्या काठावर घाटाचे बांधकाम करण्यासाठी ५०लक्ष रुपये व आमदुरा- चिकाळा- डोनगाव -कोल्हा -चिकाळा तांडा लहान येथे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ६० लक्ष रुपये रस्त्याचे भूमिपूजन आज  संपन्न झाला.

विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार मा. अमरनाथ राजूरकर यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी सौ. अरुणाताई भीमराव पा कल्याणे.जि.प सदस्या नांदेड,श्री रोहिदास जाधव मा.जि.प.सदस्य,श्री भीमराव पाटील कल्याणे संचालक भा.च.स.सा.कारखाना,श्री उद्धवजी पवारअध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मुदखेड,श्री पिंटू पाटील वासरीकर,श्री माधव पाटील कदम गटनेते मुदखेड,श्री.उत्तमराव चव्हाण नगरसेवक मुदखेड यांची प्रमुख उपस्थिती होती.


या भुमीपुजन कार्यक्रमाला परिसरातील सरपंच मंडळी यावेळी उपस्थित होते.आमदुरा येथील युवकांनी मा.आशोकरावजी चव्हाण यांच्या कडे नांदेड येथील गोदावरी नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या घाटा प्रमाणे आमदुरा येथे सुध्दा घाट बांधण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. श्री मारुती किरकन ,श्री विनोद चव्हाण,श्री साहेबराव गोरखकवाड सरपंच आमदुरा,श्री पंडित पुनाजी चव्हाण सरपंच चिकाळा तांडा लहान, श्री.रोहीत तोंडले (कार्यकारी अभियंतासा.बा‌.वि. नांदेड),श्री बालाजी पाटील (उपकार्यकारी अभियंता सा.बा.वि.नांदेड.) श्री. टी.व्ही. पिनगाळे (शाखा अभियंता सा.बा.वि नांदेड) ,मारुती पा पवार ,नवनाथ पंडित,दतराम पाटील पवार, माजी सरपंच आमदुरा,खंडू पाटील पवार, बिशनसिंग महाराज नंबरदार,बालाजी पंडित माजी उपसरपंच आमदुरा तसेच आमदुरा व चिकाळा तांडा लहान येथील सरपंच उपसरपंच ,चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.




लोकप्रिय बातम्या