अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी देवानंद गुंडेकर तर शहराध्यक्षपदी अनिल नाईक यांची निवड

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड जिल्हयात अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची हिमायतनगर तालुका पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम दिनांक 30 जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संपर्क प्रमुख मनोज कमटे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा अध्यक्ष शुद्धोधन हनमते,नांदेड जिल्हा महासचिव आशिष पाटील कल्याणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आलेल्या अतिथीचे स्वागत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ, पुष्पहार घालून करण्यात आले.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना नांदेड शाखा हिमायतनगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी हिमायतनगर तालुका अध्यक्ष देवानंद गुंडेकर, तालुका महासचिव गणपत नाचरे, तालुका उपाध्यक्ष विजय वाठोरे, तर शहर अध्यक्षपदी अनिल नाईक यांची नियुक्ती प्रदेश संपर्क मनोज कामटे, जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते, जिल्हा महासचिव आशिष कल्याणे पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने हिमायतनगर तालुक्यातील अनेक पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा विस्तार जोमाने होत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रदेश प्रवक्ते रविंद्र मेंढे यांनी हिमायतनगर तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मनिपुर घटनेचा निषेध व्यक्त करत मुदखेड सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन

     संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

     मनिपुर राज्यात दोन महिला यांची निर्वस्त्र धिंड समुहाच्या माध्यमातुन काढल्या च्या निषेध म्हणून मुदखेड तालुक्यातील माजी सैनिक संघटना व सैनिक फॅडरेशन च्या माध्यमातुन सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून मुदखेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार मार्फत वरील निवेदन राष्ट्रपती महोदय व प्रधानमंत्री महोदय यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली. 

      सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे राजाराम हळदे सुनील चौदंते संजय चव्हाण शशिकांत मोडवान प्रभू घोंगडे विद्याधर तहकीक साहेबराव वने विकास बलफेवाड देवराव चौदंते मारुती गुंठे देविदास पवार बालाजी गव्हाणे विद्याधर तहकीक साईनाथ राठोड व इतर सैनिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय मुदखेड येथे निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित होते.

मणिपूर येथील दोन महिलांची नग्न अवस्थेत जे धिंड काढले त्यात एक सेवानिवृत्त माजी सैनिक यांची पत्नी असून संबंधित स्थानिक प्रशासन सैनिकाच्या बाबतीत जर असा विचार करत असेल तर देशाची रक्षा सैनिकांनी का करावी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

संबंधित समूहातील धिंड काढणाऱ्या सर्वांना पकडून ताबडतोब फासावर लटका व तेथील राज्य सरकार बरखास्त करून संबंधित दोन्ही महिलांना अब्रू नुकसानीचा भरपाई म्हणून प्रत्येकी ५०लाख रुपये केंद्र सरकारने द्यावे अशी विनंती मुदखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने देशाचे राष्ट्रपती महोदय व प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांना करण्यात आली आहे.

संबंधित गुन्हेगारांना मग तो कोणत्याही जाती धर्माचा या पक्षाचा असो त्याला ताबडतोब शासन झाल पाहिजे हीच मागणी आम्ही केलेली असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर अशा घटनाची दखल घ्यावी लागत असेल तर हे केंद्र सरकार चे अपयेश आहे व तो लोकशाही व व्यक्ती स्वातंत्राचा अपमान आहे.सत्ताधारी म्हणून राज्य व केंद्र सरकार यांचे अपयेश आहे असेच म्हणावे लागेल .

विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाचा अनुभव

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी

दि. १४.  संपूर्ण भारतीय व जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या चांद्रयान ३ चे प्रक्षेपण इसरोच्या लाँन्चपँड दोन वरुन सुरु झाले आणि विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली. विष्णुपूरी शाळेतील जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी दूरदर्शनच्या सहाय्याने आज चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. तत्पूर्वी राज्य पुरस्कार प्राप्त व इसरो श्रीहरीकोटा येथे १८ मे २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून आलेले तथा याविषयावर पुस्तक लिखाण करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी अत्यंत वैज्ञानिक भाषेत चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाची तयारी, गरज,आवश्यकता, वैज्ञानिक फायदा व भविष्यात देशातील विकासात या मोहिमेचे काय महत्त्व आहे, हे अभ्यासपूर्ण पध्दतीने समजावून सांगितले व विद्यार्थ्यांच्या शंकेचे यशस्वी निराकरण केल्यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा शिगेस पोहचली होती. कुलकर्णी यांनी या मोहिमेबद्दल सविस्तर वर्णन करतांना असे सांगितले की, 

चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ चे फॉलो-अप मिशन आहे, ज्याने चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित केली आहे. यामध्ये लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. हे LVM३ द्वारे SDSC SHAR, श्रीहरिकोटा येथून लॉन्च केले जाईल. प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन १०० किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत नेईल. प्रणोदन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मेट्रिक मापनांचा अभ्यास करण्यासाठी हॅबिटेबल प्लॅनेटअर्थ पेलोडचे स्पेक्ट्रो-पोलारिमीटर वाहून नेतो.

लँडर पेलोड: थर्मल चालकता आणि तापमान मोजण्यासाठी चंद्र पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोग लँडिंग साइटच्या आजूबाजूला भूकंप मोजण्यासाठी लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी साठी उपकरणे; लँगमुइर प्रोब (एलपी) प्लाझ्मा घनता आणि त्याच्या फरकांचा अंदाज लावण्यासाठी.रोव्हर पेलोड: अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप लँडिंग साइटच्या आसपास मूलभूत रचना प्राप्त करण्यासाठी.चांद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM), प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि रोव्हर यांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक करणे आहे. लँडरमध्ये नियुक्त केलेल्या चंद्राच्या जागेवर मऊ लँड करण्याची क्षमता असेल आणि एक रोव्हर तैनात करेल जो त्याच्या गतिशीलतेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करेल. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक पेलोड वाहून नेतात. PM चे मुख्य कार्य म्हणजे LM ला प्रक्षेपण वाहनाच्या इंजेक्शनपासून अंतिम चंद्राच्या १०० किमी वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत नेणे आणि LM ला PM पासून वेगळे करणे. याव्यतिरिक्त, प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये मूल्यवर्धन म्हणून एक वैज्ञानिक पेलोड देखील आहे जो लँडर मॉड्यूल वेगळे केल्यानंतर ऑपरेट केला जाईल. चांद्रयान-३ साठी ओळखले जाणारे प्रक्षेपक LVM३ M४ आहे जे अंडाकृती पार्किंग ऑर्बिटमध्ये एकात्मिक मॉड्यूल ठेवेल आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चांद्रयान ३ चे प्रक्षेपण अनुभवले प्रोप्युलर माँड्युल, लँन्डर व रोहर कसे आपापले कार्य करते, त्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी याची देहा,याची डोळा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनमध्ये आपसूकच वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास होण्यास हा उपक्रम सहाय्यभूत ठरल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापिका सौ.उज्जवला जाधव व पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, प्रविण सूर्यवंशी, डि.के.केंद्रे,एम.ए.खदिर यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पालक, नागरिक यांच्यावतीने विष्णुपूरी शाळेचे कौतुक करुन आभार मानले.

अन्यथा सकल मराठा समाजा तर्फे हदगाव तालुका बंद ची हाक

 संपादक आशिष मुगटकर



प्रतिनिधी  हदगाव (भगवान देशमुख)

दत्ता पाटील हडसणीकर हे मागील ११ दिवसापासून मराठा समाजास ओबीसी मधून ५० टक्के च्या आत आरक्षण व विविध मागण्या करीता मौजे हडसणी तालुका हदगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत , त्यांनी आज प्रर्यंत मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या संवैधानिक पद्धतीने आंदोलने केली आहेत , पण त्यांच्या व समाजाच्या पदरी कायम निराशा आली आहे. वैधकीय अहवालानुसार दत्ता पाटील यांची प्रकृती खालावत असुन त्यांना काल विष्णुपुरी नांदेड येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी रुग्णालयात सुद्धा आपले आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.

आज शासकीय विश्राम गृह हदगाव येथे सकल मराठा समाजा तर्फे दत्ता पाटील यांच्या उपोषणा बाबत बैठक आयोजित केली होती त्या बैठकी मध्ये सर्वानुमते दि . १६-०७-२०२३ प्रर्यंत शासनाने व सरकारने या आमरण उपोषणाची दखल घेऊन तातडीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या  अन्यथा दि.१७-०७-२०२३ रोज सोमवारी हदगाव तालुका सकल मराठा समाजा तर्फे कडकडीत बंद ठेवण्यात येईल असे सर्व समाज बांधवांनी एकमताने ठरवीले आहे,

त्या अनुषंगाने आज सकल मराठा समाजातर्फे त्या आशयाचे निवेदन हदगाव तहसील प्रशासनास दिले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत राजकुमार भुसारे, अविनाश पाटील हरडफकर , राजु पाटील कोथळेकर, शिवाजी पाटील हरडफकर, राजू पाटील हडसणीकर प्रल्हाद पाटील हडसणीकर संदेश पाटील हडसणीकर सचिन पाटील देवराय  शरद पाटील हरडफकर, रवी पाटील सूर्यवंशी, एकनाथ पाटील सूर्यवंशी, किशोर पाटील कदम, दिनेश पाटील वडगावकर, व ईतर असंख्य मराठा बांधव उपस्थित होते

मराठा समाज आरक्षणासाठी पुकारलेल्या आमरण उपोषणाला छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड चा पाठिंबा

संपादक आशिष मुगटकर



 हदगाव प्रतिनिधी (भगवान देशमुख

हदगाव - हडसणी ता हदगांव येथे मागील ७ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण , कोर्पडी ताईच्या नराधामाला तात्काळ शिक्षा व मराठा समाजाच्या विविध मागणी करीता उपोषणाला बसलेले दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गिरीश भाऊ जाधव ,  उपाध्यक्ष रामेश्वर काकडे , छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे गजानन भाऊ कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हडसणी येथे दत्ता पाटलांच्या उपोषण स्थळी जाऊन तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या उपोषणाला छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड तर्फे पाठिंबा देण्यात आला.

या वेळी प्रदेश प्रवक्ते अँड.दिंगाबर देशमुख व प्रदेश संघटक राजकुमार भुसारे , माजी शहर प्रमुख बजरंग भरकड , गजानन दळवी , अमोल वानखेडे ईत्यादी समाज बांधव उपस्थित होते. आझाद मैदान मुंबई येथे केलेलं आमरण उपोषण असो की हदगाव ते मुंबई अशी ७००-८०० कि.मीटरची पायी वारी हे सर्व मराठा समाजासाठी केलेल्या दत्ता पाटील यांच्या पदरी शिंदे सरकार कडून आश्वासना शिवाय दुसरे ठोस असे काही ही हाती न पडल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषनाचा मार्गाचा अवलंब केला आहे.

उपोषणाला ७ दिवस उलटून गेले आहेत तरीही आयाराम गयाराम यांची खोगीर भरती करण्यात व्यस्त आसलेल्या शिंदे सरकारकडून अद्याप पर्यंत अजून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही असे दत्ता पाटलांन कडून सांगण्यात आले.

दत्ता पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत आहे, जर दुर्दैवाने काही विपरीत घडले तर होणाऱ्या परिणामांची संपुर्ण जबाबदारी ही सरकारची राहील त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून मराठा समाजाला व दत्ता पाटलांना न्याय देण्याचे कार्य या राज्य सरकारने करावे. दत्ता पाटील यांच्या मागण्या तातडीने मंजूर करून दत्ता पाटलांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा अन्यथा सकल मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रदेश संघटक राजकुमार भुसारे यांनी या वेळी कळविले आहे.

संत,महंत आणि भदंतांच्या उपस्थितीत आरएलशी अर्बन निधी कं.बँकिंग व्यवसायाचा मुदखेडात शुभारंभ

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड दि.७

येथील नांदेड रोड मुदखेड येथे जेष्ठ नेते राम चौधरी यांच्या अध्यक्षते खाली त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरएलशी अर्बन निधी कं. या बँक व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी बौध्द धम्माचे धम्म गुरु भदंत संघपाल, माता साहिब गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा तेजासिंग महाराज,महानुभाव पंथाचे महंत कन्हेरेनाथ बाबा रोहिपिंळगावकर,अपरंपार मठाचे मठाधिपती संत ईश्वर महाराज, ओम शांतीच्या पूजा बहनजी इत्यादी संत, महंत आणि भदंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपापले धार्मिक मंत्रोचार आणि प्रार्थना करून होऊ घातलेल्या बँक व्यवसायास शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,मुदखेड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्षुमनराव देवदे,बंदेअली खान पठाण,माजी नगरसेवक ऍड. कमलेश चौदंते,माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांची समायोचित भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएलशी निधी कंपनी बँक व्यवसाय समूहाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी प्रास्ताविक करून निधी कं स्थापने मागची भूमिका विषद केली तर प्रशांत पाटील मुंगल यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.




या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सचिव हनुमंत देशमुख, ता. अध्यक्ष शंकर मुतकलवाड,कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती म्हैसाजी भांगे,माजी सभापती भगवान पानेवार,संचालक बालाजी खटिंग, बालाजी तेलंग,मधुकर हौसरे,दिगंबर टिप्परसे,शहर अध्यक्ष पुरुषोत्तम चांडक,प्रा. दिनेश शेटे,प्रवक्ते मनोज कमठे माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के,माजी संचालक निळकंठ हामंद,निवघा पंचायत समिती प्रमुख सतीश पाटील मुंगल,सोशल मिडिया भोकर विधानसभा प्रमुख प्रभाकर पांचाळ,व्यापारी आघाडीचे ता. अध्यक्ष कानोबा बिष्मीले,युवा मोर्चा शहराध्यक्ष गजू कमळे शिवसेनेचे ता.प्रमुख संजय कुरे,संचालक सुरेश शेटे,पंजाब पाटील मुंगल,ठाकरे गटाचे ता.प्रमुख पिंटू उर्फ लक्षुमन कांजाळकर,काँग्रेसचे कृ.ऊ.बा.स.नांदेडचे संचालक गांधी पवार,मुदखेडचे उप सभापती तेजाब पाटील मुंगल माजी उपाध्यक्ष नपा.शंकर शेठ राठी,मारुती बिचेवाड,रा.कॉ.चे शहराध्यक्ष, युमो ता.अध्यक्ष युमो रा.कॉ. केशव पाटील मुंगल, माजी यु.मो.रा. कॉ.हनुमंत पाटील नटुरे, एम.आय.एम. चे शहराध्यक्ष अब्दुल्ल रज्जाक, सरपंच सौ. अर्चना हौसरे, सरपंच प्र.केशव पाटील ढगे, माधव वाघमारे, व्यापारी,उत्तम अप्पा चिद्रावार संजय गळगे,

साईनाथ नरडले,अनिल काचावार,महाजन जाकापुरे, अँड.अशोक हामंद, अँड.थोरात, अँड. चंदनशिवे, अँड वैभव गायकवाड,डॉ.पांडुरंग हामंद,डॉ.जाधव,डॉ एच. एल.हामंद, मुख्याध्यापक बाबुराव नाईक, शिक्षक हौसाजी गाढे,माधव ढगे,भुजंग वडजे,शरद आढाव,माजी नगरसेवक हमीद भाई भंगारवाले,माजी सैनिक संजय चव्हाण,राजाराम हळदे,संपादक इमामसाब,पत्रकार संतोष पाटील गाढे, रुक्माजी शिंदे, दिनेश शर्मा, निधी कं चे कर्मचारी माधव हौसरे, कपिल खटिंग यांच्यासह तालुका भरातील शेतकरी, शेत मजूर,कस्टकरी व्यापारी हजारोच्या संख्येनी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने दिले संकेत, राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार

  संपादक आशिष मुगटकर



पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला.

आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.

कोणत्या होणार निवडणुका

राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही.

 राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

महिला सरपंचाच्या हस्ते नुतन महिला मुख्याधिपिकेचा सत्कार

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

     संस्कार, गुणवत्ता व प्रगती या तीन ब्रीदांच्या संकल्पनेतून शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासात अग्रेसर ठरत असलेल्या जि.प.हा.विष्णुपूरी शाळेच्या मुख्याध्यापक पदी सौ.उज्ज्वला जाधव यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. यानिमित्ताने विष्णुपूरी गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.संध्या विलासराव देशमुख हंबर्डे व ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिया सचिन हंबर्डे यांच्यावतीने सौ.जाधव यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.संध्या हंबर्डे यांनी शुभेच्छा देवून जि.प.नांदेडचा कारभार महिलाच वर्षा ठाकूर-घुगे,मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग प्राथमिकचा कारभार डॉ सविता बिरगे,देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी महामहिम आदरणीया द्रौपदी मुर्मू समर्थ व यशस्वीपणे सांभाळत आहेत, कारभार सौ.जाधव सांभाळतील असे गौरोद्गार काढून नेहमी सहकार्यास तत्पर राहू अशी ग्वाही दिली. सत्कारास उत्तर देतांना नुतन मुख्याध्यापिका सौ.जाधव यांनी गावाचे नेहमीच सहकार्य राहील आणि सहकारी सुध्दा अपेक्षित सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकला इदलगावे यांनी केले तर आभार शैलजा बुरसे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पंचफुला नाईनवाड, जयश्री शिंदे,जयश्री देवशेट्टे, कांचनमाला पटवे,शकुंतला पाईकराव, अर्चना देशमुख, वैशाली कुलकर्णी, प्रिती कंठके यांनी विशेष परिश्रम घेतले.

------------------------------------

लोकप्रिय बातम्या