नांदेडमधील तरुणाची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून त्यांची पदयात्रा आता मुंबईजवळ पोहचली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत.

त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. त्यातच आता नांदेड तालुक्यातील थुगाव येथील अरविंद बालाजीराव भोसले या तरुणाने बुधवारी रात्री मराठा आरक्षणाची मागणी करत गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नांदेड तालुक्यातील थुगाव येथील 22 वर्षांचा मराठा तरुण अरविंद भोसले याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करत गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी करणारी चिठ्ठी लिहून बुधवारी रात्री शेतातील झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. त्याच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी सापडली. गावकर्‍यांना याबाबत माहिती मिळताच गावकर्‍यांनी लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना माहिती दिली. तसेच महसूल मंडळातील लिंबगाव मंडळ अधिकारी कुणाल जगताप यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद भोसले यांच्या कुटुंबात आई-वडील व एक बहीण आहे. वडील व आई दुसर्‍याच्या शेतावर मोलमजुरी करतात. गेल्यावर्षी त्यांच्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे वीस गुंठे जमीन विकली. त्यामुळे आता त्याच्याकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे ते दुसर्‍याच्या शेतावर मजुरी करीत आहेत. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. समजाला आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

घटनेची माहिती कळताच मराठा सकल मराठा समाजातील माधव देवसरकर यांनी संबंधित जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जिवंत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे व यापुढे अशा आत्महत्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन या गावातील माजी सरपंच साहेबराव भोसले यांनी केले आहे.

१००% अनुदानासाठी नांदेडच्या सौं जयश्री पाटील , सौ वर्षा पांडागळे यांचे मुंबईत अन्नत्याग आंदोलन सुरू

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि 8 राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानावरील कर्मचारी यांना शासनाने 20 टक्के 40 टक्के 60 टक्के वेतन अनुदान मंजूर केलेले आहे. सदर कर्मचारी हे 100% अनुदानास पात्र असतांनाही शासनाकडून त्यांना केवळ 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात येत आहे या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचा पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा प्रत्येक वर्षी माहे एप्रिल महिन्यात बदलणे अपेक्षित असताना तो बदलत नाही, दि 9 नोव्हेबर 2023 रोजी मा शिक्षण मंत्र्यांनी आझाद मैदानावर येवून लेखी स्वरूपात अश्वासन देवूनही शिक्षकांना न्याय मिळत नाही यासाठी त्यांना सातत्याने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करावे लागते यामध्ये शिक्षकांचा शैक्षणिक वेळ वाया जातो.

       अनुदान घेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे शंभर टक्के अनुदानास पात्र असूनही त्यांना 20 टक्के अनुदान दिले जात आहे ही बाब अन्यायकारक आहे.तरी 20%40%60%अनुदान घेत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 15/ 11/ 2011 च्या व 26 जून 2014 च्या शासन निर्णयान्वये 100%टक्के वेतन अनुदान अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर करून या राज्यातील 63000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना न्याय द्यावा यासाठी नांदेड जिल्हयासह  संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व विना तथा अशंतः अनुदानित  शिक्षकांनी ३ जानेवारी 2023 बुधवार रोजी होणाऱ्या शिक्षक समन्वय संघ्याच्या आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित आहेत व आजपर्यत कोनीही आंदोलनाची दखल घेत नसल्याने दिः ८ जानेवारी पासुन प्रा. दिपक कुलकणी, ज्ञानेश चव्हान, रविकांत जोजारे, बहिरीनाथ सोकांडे यासह नांदेडच्या महिला प्राध्यापक सौ जयश्री पाटील नांदेड, सौ. वर्षा पांडागळे नांदेड आदि शिक्षक अन्नत्याग आंदोलन करीत जोपर्यंत पुढील  दिः1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा वाढ शासन आदेश निघेपर्यत माघार घेणार नाही तरी शासनाने महिलांच्या या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन त्वरीत न्याय द्यावा व नांदेड जिल्हयातील सर्व शिक्षकांनी सहभागी होवून आपल्या हक्काच्या लढाईचे भागीदार व्हा असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने समन्वयक प्रा कैलास खानसोळे यांनी केली आहे

.

भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्हा कार्यसमितीची बैठक किनवट येथे संपन्न

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

दि.७ रोजी किनवट येथील कलावती मंगल कार्यालयात आयोजित भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा कार्यसमितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भाजपा उत्तर जिल्ह्याचे कार्यकुशल जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील भोयर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आ.राम पाटील रातोळीकर प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.गजाननजी घुगे, प्रदेश सचिव देविदास भाऊ राठोड, हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर,किनवट विधानसभा नेते डॉ. सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.




यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जिल्हा संयोजक डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांनी दि.22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम लल्ला च्या मूर्ती प्रतिष्ठापणा या विषयावर संघटनात्मक कार्य हा विषय मांडून दि 22 जानेवारी रोजी होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि इतरांना सहभागी करून घेण्याचे उपस्थितांना आवाहन केले.जिल्हा महामंत्री सुहास पाटील डोंगरगाव कर यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी मंत्री तथा आ.जितेंद्र आव्हाड यांनी केलेली प्रभू रामचंद्र यांच्या विषयीची बरगळीच्या निषेधाचा ठराव बैठकीत मांडून तो एक मतांनी निषेध ठराव पारित करून घेतला.सौ. लता फाळके यांनी मोदी सरकारच्या योजणांची उपलब्धी जण सामान्यांन पर्यंत पोहचवा आणि विरोधी पक्षाची खोडसाळ वृत्ती हाणून पाडा असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले. प्रवीण गायकवाड यांनी कार्यकुशल जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी केलेली नांदेड उत्तर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त करतांना लेटरप्याड आणि व्हिजिटिंग कार्ड पुरता पदाचा वापर न करता समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचवून पंडित दीनदयाळ यांच्या अंत्योदयचा विचार आणि राष्ट्र भक्तीसे खून न खवले खून नही ओ पाणि है!देश भक्तीके काम न आये ओ जवानी नही कुर्बानी है!हा स्यामा प्रकाश मुखर्जी यांचा विचार आणि तुटे दिलसे कोई खडा नही होता और छोटे दिलसे कोई बडा नही होता या भारतरत्न अटल बिहारीं वाजपेई व जहाँ हुये बलिदान मुखर्जी ओ काश्मीर हमारा है या विचारांची मुहूर्त मेढ संसदेत बहुमताने 370 वे कलम रद्द करून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ध्यानी घेऊन समाजाला न्याय देण्याच्या भावनेने पदाचा वापर करावा आणि 2024 च्या महाविजयात नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्यासाठी कामाला लागा आणि मोदीजींच्या ह्याट्रीकचे शिल्पकार होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी आपापल्या बूथवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि विविध आघाड्या मोर्चा व प्रकोष्ठ प्रभारिंच्या निवडी घोषित केल्या.प्रदेश सचिव देविदास राठोड यांनी खासदार,आमदार आणि संघटनात्मक भूमिका व समन्वय या विषयी कोणताही संभ्रम न बाळगता नांदेड उत्तर भाजपा जिल्हा संघटन निवडणुकीसाठी सज्य व सक्षम असल्याची भावना व्यक्त केली. रामदास पाटील सोमठाणकर यांनी नमो ऍप आणि कार्यकर्त्यांचे कर्तव्य याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.गजानन घुगे यांनी सरल ऍप व नोम ऍप आणि सरकाच्या लोकोपयोगी योजना व कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा उद्याचे लोकप्रतिनिधी होणे तुम्हीस कुणीही थांबविणार नाही असे सांगितले.

अध्यक्षीय भाषनात सुधाकर भोयर यांनी बैठकीच्या लक्षनीय उपस्थितीवर समाधान व्यक्त करून अर्धापूर ते किनवट, मुदखेड ते किनवट, हदगांव ते किनवट दीडसे किलोमीटरचा भोगोलिक पल्ला ओलांडून स्वतःच्या आत्मबलाची उपस्थिती हे कार्यकर्त्यातील ऊर्जा संघटनेचे बळ असल्याचे सांगून वयाची सत्तर अंशी वर्ष विचाराने प्रेरित होऊन भाजपा जगणारी माणसं म्हणजे माझी ऊर्जा आहे. ही ताकत नांदेड उत्तर जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक हरणे आता शक्य नाही असा विश्वास व्यक्त केला.जिल्हा कार्य समितीच्या समारोपीय भाषणात आ.राम पाटील रातोलीकर म्हणाले की, कार्यकर्त्यांनी हवेच्या भरोस्यावर न राहता मोदीजीच्या कार्याची हवा मतदार रुपी ट्यूब मध्ये भरायची असेल तर पाईप बणून मोदींची हवा मतदारांपर्यंत पोहचवीने गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसची सत्ता  मोदीजीच्या सत्तेपेक्षा किती दुबळी होती.या बाबत महागाईच्या निर्देशांकाचे अनेक दाखले देऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे समारोपीय विचार मांडले. या कार्यक्रमांची सुरवात प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना पुष्पमाल्या अर्पण करून तसेच मान्यवारांच्या हस्ते धूप व दीप प्रज्वलीत करून करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा महामंत्री प्रा.किशनराव मिरासे यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. सूर्यवंशी,बालाजी स्वामी,अशोक नेमानिवार,रामराव भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, शंकर मुतकलवाड,विजया घिसेवाड,ऍड.अविनाश राठोड,सचिव सौ. केतकी चौधरी, भगवान पानेवार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या राठोड,उपाध्यक्ष सौ. मंजुषा शेटे, प्रियंका सूर्यवंशी,किसान मोर्चा अध्यक्ष सुधाकर पाटील कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास साबळे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष हुरदुके, मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग (मुदखेड),गणेश पाटील कापसे(भोकर),डॉ.लक्षुमन पाटील इंगोले(अर्धापूर),तातेराव वाकोडे (हदगांव), गजानन चायल(हिमायत नगर),बालाजी आलेवार (किनवट),श्रीकांत घोडेकर(माहूर),पंचायत राज व ग्रामविकास जिल्हाध्यक्ष मनोज कमठे यांच्यासह जिल्हा भरातून सर्व आघाड्या, प्रकोष्ठ,जिल्हा,मंडळ पदाधिकारी व शहर अध्यक्ष,महामंत्री यांच्यासह जिल्हा कार्यसमितीस अपेक्षित सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

हिमायतनगर येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

  संपादक आशिष मुगटकर



हिमायतनगर तालुका प्रतिनिधी 

दि.६ रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जयंतीनिमित्त तथा पत्रकार दिनानिमित्ताने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शाखा हिमायतनगर जिल्हा नांदेड यांच्यावतीने साजरी करण्यात आली.

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी हिमायतनगर तालुका अध्यक्ष देवानंद गुंडेकर, शहराध्यक्ष अनिल नाईक, तालुका उपाध्यक्ष प्रशांत राहुल वाढ, महासचिव गणपत नाचारी, पत्रकार धोंडोपंत बनसोडे, प्रकार गंगाधर गायकवाड, यश अकॅडमी चे संचालक शेख हनीफ सर पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेणारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

लोकप्रिय बातम्या