महाडीबीटी अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ द्यावी-भास्कर डोईबळे

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

          भारत सरकार तर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती ची तारीख वाढवून देण्यात यावी यासाठी माननीय समाजकल्याण मंत्री धनजय मुंडे यांना मेल द्वरे निवेदन. शिष्यवृत्तीची ३१ मार्च २०२१ ही शेवटची देण्यात आली होती.

पण काही महिन्यांपासून covid-19 या रोगाचे महाराष्ट्रात वाढते प्रमाण लक्षात घेता अनेक जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या नांदेड,परभणी, हिंगोली जिल्ह्यात तर गेली काही दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे त्यामुळे अजूनही बरेच विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत. 

याच बरोबरीने खेडे गावातील लोकांना कधी नेट च समस्या अश्या अनेक समस्यांमुळे बरेच विद्यार्थी वंचित राहत असून या सगळया गोष्टीचा विचार करून  फॉर्म भरण्याचे बाकी आहेत. त्यामुळे आदरणीय साहेबांनी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ द्यावी असे निवेदन भास्कर डोईबळे यांनी दिले आहे.




महावितरणच्या विद्युत केबलमुळे नागरिकांचा जीव धोक्यात.

 संपादक आशिष मुगटकर

 केबल :- गावातील बँकेजवळ अशाप्रकारे केबल लोंबकळत असून शेतकऱ्याला आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडी चालवावी लागत आहे.

मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुगट येथे महावितरण ने गावातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी गावात संपूर्ण केबल केले.पण आज याच केबल मुळे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.

गावात केबल करुन सुध्दा वीज चोरीचे प्रकार कमी झाले नाहीत.गावाला दोन लाइन मन आहेत.त्यांचा कारभार हा जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालतं असतो तर आधुन मधुन गावाला भेट देवून जातात.याच्या हाताखाली गावातील लाईट चे काम करण्यासाठी दोन कंत्राटी रोजमजुर ठेवण्यात आले आहेत.त्यांची सुध्दा गावात मुजोरी वाढली आहे. गावातील छोटी,मोठी लाईट चे काम करुन देण्यासाठी धनलक्ष्मी ची मागणी करताना दिसत आहेत.त्यामुळे सामान्य मीटरग्राहक चांगलेच वैतागले आहेत.

गावात केबल मुळे वानरांचा धुमाकूळ चालत असतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी केबल मुख्य रस्त्यावर लोंबकळत आहे.शेतातील बैलगाडी, डोक्यावर चारा,जळतन घेऊन घरी जाणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या मुख्य रस्त्यावरून जावे लागत आहे. गावातील कंत्राटी कामगारांना वारंवार सांगून सुद्धा ते याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.उलट उधट पनाने वीज ग्राहकांना बोलताना दिसते.

 मागच्या महिन्यात गावातील मुख्य रस्त्यावर केबल पडल्याने नांदेड मुदखेड मार्ग काही तासांसाठी बंद होता. वाहनचालकाच्या प्रसंग अवधाने या ठिकाणी मोठी जीवित हानी थोडक्यात टळली. याचा सुधा विसर महावितरण ला पडला आहे.



 गावात अनेक सकाळी- सायंकाळी लहान मुले रस्त्यावर खेळत असतात गावात दररोज अनेक ठिकाणी या विद्युत तारेला स्पार्किंग होऊन जाळ होत असतो.या केबल ची जोडनी विद्युत खांबावरील खोक्यात न करता बाहेरच ते केबल जोडले गेले आहे.त्यामुळे आकोडे चोरांना ते अधिक चांगले झाले आहे. ग्राहकांच्या अनेक अडचणी आहेत त्याकडे लक्ष द्यायला  महावितरण कडे वेळच मिळत नाही. त्यामुळे गावातील अनेक ठिकाणी जीवित हानी अनेक वेळा प्रसंग अवधानने टळली आहे. 

 याकडे महावितरणने दुर्लक्ष केले तर नक्कीच याठिकाणी जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी  होत आहे.

नांदेड येथे हल्लाबोल मिरवणूकीदरम्यान तुफान दगडफेक, एसपींसह अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या, सहा पोलिस गंभीर

  मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने संतप्त तरुणांनी केली दगडफेक, पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, शहरात प्रचंड दहशत.



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

 दि.२९: शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत. शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बनले असून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे. सध्या शहरात तणावाचे वातावरण बनले असून वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आले आहे. पोलिस विभागाकडून धरपकड सुरु असून सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे. हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी (ता. २९) हल्लाबोल मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली. एवढेच नाही तर संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात एसपीचे अंगरक्षक श्री. दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले या हल्ल्यात बचावले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून धडपडीचे काम सुरु आहे. या प्रकरणात सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसून या भागात तणावाचे वातावरण बनले आहे. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या नियमाचे कठोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


 • नांदेड जिल्ह्यात आज १ हजार १६५ व्यक्ती कोरोना बाधित
• सहा जणांचा मृत्यू


नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

दि.२३ रोजी नांदेड जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

जिल्ह्यात दिनांक २४ मार्च रोजी १ हजार १६५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल ४ हजार ९२४ तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६०८ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५५७ अहवाल बाधित आहेत. आजचे १ हजार १६५ बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३५ हजार ५०२ एवढी झाली आहे. 

 आजच्या ४ हजार ९२४ अहवाला प्राप्त ३ हजार ६४२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३५ हजार ५०२ एवढी झाली असून यातील २६ हजार ७७९ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ७ हजार ८१६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ६२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- २ लाख ८५ हजार ५३

एकुण निगेटिव्ह स्वॅब- २ लाख ४३ हजार ६४९

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३५ हजार ५०२

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २६ हजार ७७९

एकुण मृत्यू संख्या-६७४

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.४२ टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-२९

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-६८

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-४१०

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-७ हजार ८१६

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-६२.


शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


मुगट येथे घंटा गाडी चे लोकार्पण

  जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे यांच्या हस्ते घंटागाडी चे लोकार्पण 



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील मुगट गावामध्ये 'माझे गाव, सुंदर गाव' या अभियानातून गावात खूप मोठ्या प्रमाणात अनेक विकासकामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून होताना दिसत आहेत.

 गावात स्वच्छता, नालेसफाई यावर अधिक भर दिला जात आहे. गावातील घनकचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून गावात एक घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. ही घंटा गाडी गावात आल्यावर गावातील घनकचरा उचलण्यासाठी सोयीचे होणार आहे.


 आज या घंटागाडीची लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले तर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते गावातील ग्रामदैवत श्री.हानुमाण मंदिर परिसरात या नवीन घंटागाडीचे पुजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी सरपंच सौ. कांताबाई वंजे संचालक भीमराव पा. कल्याणे तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा. कल्याणे, धोंडीबा वंजे ग्रामपंचायत सदस्य धाराजी पवार, एकनाथ कल्याणे, बालाजी कल्याणे, देवदत्त हाटकर, रामेश्वर तुप्पेकर, तुकाराम हाटकर, विलास कल्याणे, वैभव गजेले, पत्रकार आशिष मुगटकर ,ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे, दादा पाटील,साईनाथ पांचाळ, प्रल्हाद कल्याणे,नारायण रंगवाळ,माधव कल्याणे, दाजीबा कल्याणे, नवनाथ कल्याणे, रामराव कल्याणे, पांडुरंग कल्याणे, विठ्ठल जरतारे, विकास कल्याणे, अनिल कुलकर्णी,चंपतराव कल्याणे, विठ्ठल पवार, लिंगु मिटकर,आदीची यावेळी उपस्थिती होती.

कै. शंकरराव देशमुख बारडकर यांची पुण्यतिथी साजरी

 संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

 नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते,नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बारडचे भूमीपुत्र कै. शंकरराव राजाराम देशमुख बारडकर यांची बारड येथे दि.२० रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालुन आदरांजली वाहिली आली.


 यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,सचिव रामेश्वर कोरबनवाड,सहसचिव अशोक गव्हाणे, पंडितराव भोसले शाळेचे मुख्याध्यापक रामकीशन चुबेवार, प्रा नारायण सावंत,प्रा कैलाश खानसोळे, प्रा कैलाश कपाटे,शिवाजी मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

 दहावी- बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार- वर्षा गायकवाड (शालेय शिक्षणमंत्री)


नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

वर्षा गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा 

🛑 दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार

🛑लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार

🛑वर्गखोल्या कमी पडल्या बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार

🛑यंदा ८०  गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटं वाढीव वेळ

🛑 ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार

🛑दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २०

 मिनिटं

🛑प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने

🛑जर विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन

🛑विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार

  लेखी परिक्षा होनार

कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

तसेच यंदा ८० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटं वाढवून देणार आहे.

प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने

दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा विशिष्ट लेखन कार्य (असाईनमेंट)  पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत. हे असाईनमेंट २१ मे ते १० जूनपर्यंत शाळेत द्यायचे आहे. तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या २२ मे ते १० जून यामध्ये होतील. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात असाईनमेंट सादर करायचे आहेत.

मात्र १२ वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर १५ दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत.

१० वी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. (SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline)




नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना कोरोनाची बाधा

 मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन !

 


नांदेड /जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध बैठका, अर्थसंकल्प व इतर विषयांबाबत मागील काही दिवसात झालेल्या बैठका व सभा लक्षात घेता संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

माझी प्रकृती ठिक असून मी अत्यावश्यक असलेले सर्व कामकाज ई-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करीत आहे. मी गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करीत असल्याचे वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

कार्यालयीन कामकाजासंदर्भात कार्यालयात व परिसरात जे कोणी माझ्या कार्यालयात उपस्थित होते त्यांनी काळजी घ्यावी. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असून आवश्यकता जर नसेल तर जनतेने बाहेर जाणे टाळावे, असेही वर्षा ठाकूर यांनी सांगितले. 





पाटनुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

 शेतातील नापिकी व बँकेच्या कर्जामुळे टोकाची भूमिका



बारड/ प्रतिनिधी

अर्धापूर तालुक्यातील पाटणूर येथील शेतकरी गोविंद नारायण सोनटक्के (५१) यांनी दि. १७ रोजी बुधवारी रात्रीला आपल्या राहत्या घरातील नाटीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.अल्पभुधारक शेतकरी होते.त्यांच्या कडिल असलेल्या अडीच एकर शेतीवर ते  आपला उदरनिर्वाह करत होते.

 त्यांनी शेतीसाठी स्टेट बँक शाखा नांदेड यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते परंतु शेतीत नापिकी झाल्यामुळे उत्पन्न झाले नाही. म्हणून त्यांची पत्नी व मुलगा हे मजुरीने कामाला जाऊ लागले. त्यामुळे  ते मानसिक तणावाखाली वावरत होते.  बँकेचे शेतीसाठी काढलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे व शेतात सतत नापिकी झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

 याबाबत बारड पोलीस स्टेशन मध्ये  आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मुदखेड : आडत असोशिएशन ता. अध्यक्ष संदिप गाढे, शहर अध्यक्ष गणेश सोनी यांची बिनविरोध निवड

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद

मुदखेड तालुक्यातील आडत व्यापारी आसोशियन ची बैठक मोंढा येथील विरशैव गवळी समाज मंदिर येथे  आयोनीत करण्याली आली होती. 

या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी  शंकर  राठी माजी उपनगराध्यक्ष मुदखेड, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संजय आऊलवार जिल्हा आडत व्यापारी आसोशियन नांदेड , या बैठकीत पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. मुदखेड तालुका अध्यक्ष पदि संदिप पा. गाढे , कार्यअध्यक्षपदि घनश्याम  दाड, उपध्यक्षपदि ज्ञानेश्वर राजकुंठवार कोषाअध्यक्ष पदि विलास  नगनुरवा,सचिव पदि अनुप कालानी सह सचिवपदि साईनाथ गंगाधरराव पवार, सदस्य पदि लक्ष्मणराव  वट्टमवार, रियाज  पठ्ठाण, अमिन अहेमद शेख,संदिप सुर्यवंशी,  अशोक  जाधव, यानुसार मुदखेड तालुका आडत व्यापारी आसोशियनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.


 तर शहर अध्यक्ष पदि  गणेश सोनी यांची प्रसंगी बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस माधवराव सुर्यवंशी ,रूखमाजी आक्कमवाड उपस्थीत होते.आडत असोशिएशनच्या नवनियुक्त कार्यकारणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

दहावी बारावी च्या बोर्ड परीक्षा कामकाजावर शिक्षकांचा बहिष्कार

 नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाकडून  जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन


नांदेड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने शिक्षक समन्वय संघाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा,व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे २०२१च्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

या विषयीचे निवेदन  नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.शिक्षक समन्वय संघाचे २९ जानेवारी २०२१ पासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.

    निवेदनात म्हटल्याप्रमाणे शासनाकडून २०% अनुदानासाठी व ४०% अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान वितरणाचा आदेश काढला  त्याबद्दल महाविकास आघाडीचे अभिनंदन करण्यात येत आहे पण  २४ फेब्रुवारी ला घोषित केलेल्या मुंबई कोल्हापूर विभागातील उच्च माध्यमिक शाळांना पुरवणी मागणीतुन वगळण्यात आले आहे.त्या दोन्ही विभागांसाठी शालेय शिक्षण विभागाने निधी देऊन त्यांचा ही अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढण्यात यावा.

   १२,१५,व २४ फेब्रुवारी रोजी शुल्लक त्रुटी दाखवत अपात्र  केलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्चमध्यमिक शाळा यांनी त्रुटी पूर्तता करताच त्यांचा ही समावेश पुरवणी निधीत करून,अनुदान वितरणाचा आदेश काढावा.अनुदान वितरण करताना १५/११/११ व ४/६/१४ नसून अनुदान वितरण व्हावे.

  सर्व अघोषित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा घोषित कराव्यात.विनाअनुदान व अंशतः अनुदानित शाळा वरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू करावी, शिवाय सेवा संरक्षण द्या अश्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

    मागण्या तातडीने मान्य न झाल्यास ५ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१या कालावधीत होणाऱ्या १० वी व १२ च्या बोर्ड परिक्षा कामकाज अर्थात पेपर तपासणी,प्रात्यक्षिक परीक्षा,सुपरविझन आदि कामांवर बहिष्कार कायम राहील असे नमूद करण्यात आले.

   निवेदन देताना यावेळी नांदेड जिल्हा शिक्षक समनव्य संघाकडून प्रा.कैलाश खानसोळे, प्रा बापूसाहेब केंद्रे,प्रा.कैलाश जगताप, प्रा सुदर्शन फाजगे आदि उपस्थित होते.



मुगट गावाला मिळाला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार.

  व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकारी सरपंच यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव !


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट या गावाची सन २०१९-२०२० या वर्षात ...जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेमध्ये सहभागी झालेल्या नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ग्रामपंचायत मधून १६ ग्रामपंचायतीची निवड तालुका स्मार्ट ग्राम म्हणून यावेळी करण्यात आली आहे. 

या ग्रामपंचायत मधून एका ग्रामपंचायत ला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीची निवड ही जिल्हास्तरीय तपासणी समितीने कडून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब डॉ.विपीन ईटणकर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांचा समावेश होता.  नमूद केलेल्या निकशाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत सर्वाधिक गुण मुगट ग्रामपंचायतला मिळाल्यामुळे या गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम  म्हणून यावेळी निवड करण्यात आली आहे.

 नांदेड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशान्वये आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मुगटला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम अधिकाधिक सुंदर, स्वच्छ, सुशोभित करण्यासाठी म्हणून हा ५० लाख रुपयाचा धनादेश गावाला मिळणार आहे.


मुगट गावाला लाभलेले ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात परम पूज्य श्री श्री रविशंकर जी महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने गावात सात हॅपिनेस शिबिर घेण्यात आली त्यामुळे गावातील लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्यामुळे गावात हळूहळू बदल होन्यास सुरुवात झाली आहे.


मुगटच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे, संचालक भिमराव पा कल्याणे,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना हाटकर, माजी सभापती सौ.शोभाताई मुंगल, सौ.लक्ष्मीबाई हाटकर, माजी.सरपंच सौ.सुमनबाई कल्याणे, या सर्वांनी नूतन सरपंच सौ. कांताबाई वंजे उपसरपंच श्रीमती जिजाबाई कल्याणे व नवीन ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव कल्याणे व ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपल्या मुगट गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.हा पुरस्कार मिळाल्यामुळे गावकऱ्यांची जवाबदारी आणखी वाढली आसुन अशाच पध्दतीने यापुढे ही आपल्या सर्वांनी आपलं गाव सुंदर, स्वच्छ, सुशोभित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले.

मुगट तंटामुक्ती अध्यक्ष पदी माधवराव पा.कल्याणे यांची बिनविरोध निवड.

 संपादक आशिष मुगटकर

मुगट / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावात तंटामुक्ती समिती अस्तित्वात नव्हती.गावातील काही मंडळी कडून या समिती निवडीत मुद्दा मुन खोडा घालण्याचे काम केले.त्यामुळे समिती ची निवड झाली नव्हती. 
समिती नसल्यामुळे गावातील तंटे हे सुटत नव्हते.गावात नवीन सरपंच निवड झाल्याने गावातील अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत.
पहिल्याच ग्रामसभेत त्यांनी तंटामुक्ती समितीची निवड बिनविरोध करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी माधवराव पा कल्याणे तर उपाध्यक्षपदी बालाजी पा मुंगल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खेळी मेळीच्या वातावरणात इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
संचालक भिमराव पा कल्याणे, सरपंच प्रतिनिधी धोंडिबा वंजे यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माधवराव पा.कल्याणे चेअरमन, राजेश्वर भुरे ग्रामविकास अधिकारी,धाराजी पवार, एकनाथ कल्याणे, विलास कल्याणे, तुकाराम हाटकर, देवदत्त हाटकर, अशोक बुवा बाळापुरकर, आशिष पाटील, साईनाथ पांचाळ, नागोराव गिरे मामा, योगेश छापरवाळ, शिवानंद कल्याणे, प्रल्हाद कल्याणे,तातेराव हातागळे, किशनराव कल्याणे,पुयड, वैभव गजेले,मरिबा मिटकर, राहुल हाटकर, अनिल कुलकर्णी,वामन हाटकर,डिंगाबर निखाते,किशन हातागळे आदीची यावेळी उपस्थिती होती.
सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर चा यावेळी वापर केला गेला. तंटामुक्ती समिती गठीत केल्यामुळे पोलिस पाटील भगवान हाटकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन उपस्थित लोकांचे आभार मानले.

मातृभूमी न्युज कडून नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन!



नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ मार्च पर्यंत बंद - संजय बेळगे (शिक्षण सभापती)

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय



नांदेड/प्रतिनिधी

 नांदेड जिल्ह्यातील  सर्व शाळा दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिली.

 नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे  यांच्याशी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज चर्चा केली.

  कोविड विषाणूंच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी मिशन बिगीन अंतर्गत शाळा बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक  आज दि.१५ मार्च रोजी जारी केले आहे. 

 शाळा स्तरावर ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात,विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांमध्ये कुठल्या पद्धतीची घबराट पसरणार  नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

  विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपापल्या परिसरात ,घरात वावरताना कोविडच्या संदर्भाने सर्व  काळजी घ्यावी.काही लक्षणे आढऴल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.




मुगट येथे शिव जयंती अत्यंत साधेपणाने साजरी

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने जयंती साजरी



मुगट / प्रतिनिधी

मुगट येथील बस स्थानकाजवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. 
देवगिर बुवा मठ संस्थान चे मठाधिपती मोतीगिरी महाराज यांच्या हस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. 

उपस्थित गावातील मंडळी च्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. तरुणांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षीची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने मिरवणूक न काढता, न कसला गाजावाजा करता मुख्य जागेवरच साजरी करण्यात आली.
गावात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षीची शिवजयंती ही अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे ठरवले.
यावेळी रमेश पा.कल्याणे, विलास कल्याणे, माधवराव पा. कल्याणे, डिंगाबर सावंत,शिवाजी कल्याणे, योगेश कल्याणे, विकास कल्याणे, आशिष पाटील, कपिल कल्याणे, साईनाथ देशमुख, विठ्ठल जरतारे,मनचीक कल्याणे, विकास कल्याणे, राजेश कल्याणे, सतीश कल्याणे, पांडुरंग कल्याणे, सेहवाग कल्याणे, राहुल कल्याणे,शुभम कल्याणे, राजेश मुंगल, प्रदिप कल्याणे, गंगाधर कल्याणे, साईनाथ उदगिरे,सह गावातील अनेक तरुणांची यावेळी उपस्थिती होती.






मुदखेड शहरात दररोज सुरळीत पाणीपुरवठा करा!- अमोल आबादार

 संपादक आशिष मुगटकर

निवेदन :- मुदखेड शहरात पाणीपुरवठा दररोज सुरळीत करण्यात यावा. यामागणीसाठी आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपरिषद मुदखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले.


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद

मुदखेड नगरपरिषदे कडून मुदखेड शहरात दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वर्षांमध्ये सहा महिनेच नागरिकांना चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा होत आहे म्हणून नगर परिषदेने सहा महिन्याची नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करावी. नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारामुळे आज मुदखेड शहरातील लोकांना दोन दिवसा आड पाणी घेण्याची वेळ आली आहे दरवर्षीपेक्षा या ही वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे तरी पण एवढा पाऊस पडून सुद्धा नगर परिषद पाणी पुरवठा दोन दिवसा आड करत आहे याचे कारण काय? नगरपरिषदेने पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना शुद्ध, दररोज पाणी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 अमोल आबादार (शहर संघटक मुदखेड) यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपरिषद मुदखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष बोडके, कालिदास जंगी लवाड, प्रकाश बल्फेवाड, राहुल कोटे वाड, सुरेश फुलारी, राकेश हेमके ,माधव असवलकर, सुरज हेंबाडे आधीची यावेळी उपस्थिती होती.




मुदखेड तालुक्यात एच. पी गॅस एजन्सीकडून जादा दराने सिलेंडर विक्री

 सर्वसामान्याची लुट थांबवा ; भाजपाचा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा.

निवेदन :- बारड येथील विठाई गॅस एजन्सी जादा दराने गॅस विक्री करत असल्याने निवेदन भाजपा शहर संघटक आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदअधिका-याने  तहसिलदार दिनेश झांपले  यांना दिले.

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

मुदखेड तालूक्यातील बारड या ठिकाणी असलेली विठाई गॅस एजन्सी जादा दराने गॅस विक्री करत असल्याने निवेदन भाजपा शहर संघटक आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदअधिका-याने मा. तहसिलदार दिनेश झांपले साहेब यांना दिले. सदरील गॅस एजन्सी नियमापेक्षा ५५ रू जास्त घेत आहे. आणि ग्राहकाला त्याची पावती पण देत नाही. नियमाने १५ किमी विनाशुल्क देणे अपेक्षित आहे. पण जो नागरिक तक्रार करतो त्याला ५५ रू सुट देण्यात येते. आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र ५५ रू जादा दराने सिलेंडर विक्री केली जाते. यामध्ये सर्वसामान्य जनतेची लुट होत आहे असे या तक्रारीत म्हटले आहे. 

सदरील निवेदनाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास तहसिल कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला. यावेळी भा.ज.पा. युवा जिल्हाअध्यक्ष किशोर देशमुख युवा शहअध्यक्ष प्रकाश बल्फेवाड, शहर संघटक अमोल आबादार, शहर उपाध्यक्ष संतोष चमकुरे, राहुल कोठेवाड, कालीदास जंगीलवाड, संतोष बोडके, राकेश हेमके, सुरेश कल्याणे, सुरज हेबाडे, माधव आस्कुलकर, उमा आडाणे श्याम मोरे व असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

सदरील गॅस एजन्सी १५ किमी विनाशुल्क देणे अपेक्षित आहे. याचा खर्च एच. पी कंपनीकडून एजन्सीला भेटत असतो. मग सर्वसामान्य माणसांकडून जास्त पैसे घेणे आणि कंपनीकडून पण पैसे घेणे ही लुट नाही तर काय असा प्रश्न पत्रकाराशी बोलतांना श.संघटक अमोल आबादार यांना विचारला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुदखेड तालुक्यात संघटन बळकट करनार-संतोष दगडगावकर

 मुदखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक

      संपादक आशिष मुगटकर  

आढावा बैठक :- मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी मार्गदर्शक करताना पक्षनिरीक्षक संतोष दगडगावकर, सोबत श्रीकांत मांजरमकर, शिवानंद शिप्परकर,चक्रधर कळणे .

 मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद  

भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख तालुका असणाऱ्या मुदखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्ष बळकट करू व आगामी सर्व निवडणूका संपुर्ण ताकदीनिशी लढवू असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक संतोष दगडगावकर  यांनी व्यक्त केले.

        या बैठकीला पक्षाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य संतोष दगडगावकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी रिक्त असलेल्या पक्षाच्या पदांवर नियुक्त्या करणे याबाबत चर्चा करण्यात आली. ईच्छूकानीं या बैठकीत आपले पक्षातील कार्य बद्दल माहिती देऊन पद देण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले .पक्षातील सर्व पदाधिकारी यांनी गटा तटाचे राजकारण न करता पक्षाचे संघटन मजबूत करून पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्याचे आव्हान संतोष दगडगावंकर यांनी केले तसेच यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना निरीक्षकांनी मार्गदर्शन करून पक्ष वाढीसंदर्भात व आगामी निवडणुकी बाबत  सूचना केल्या.


या बैठकीचे सुत्रसंचलन राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल चे तालुकाध्यक्ष प्रा.संदीप पवार निवघेकर यांनी केले व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी प्रास्ताविक केले,यावेळी बसपाचे संतोष दर्शनवाड यांनी पक्षप्रवेश केला.

    या बैठकीला विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,अल्पसंख्याक माजी जिल्हाध्यक्ष मकसूद पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस चक्रधर पाटील कळणे,राष्ट्रवादी महीला कांग्रेसच्या पुजा पाटील व्यवहारे,पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष प्रा संदीप पवार निवघेकर,म.बुर्हाण,आशिष कल्याणे,प्रशांत मुंगल,शंकर खवास,माधव पाटील व्यवहारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मुदखेड शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज दाखल

 राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस, शिवसेना,भाजपा यांचा समावेश

संपादक आशिष मुगटकर


नांदेड/ प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असणारी निवडणूक म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकी  कडे बघितले जाते.या निवडणूकी ची रणधुमाळी सुरू झाली आहे.या निवडणूकीसाठी विविध पक्षा कडून उमेदवार अर्ज दाखल केले जात आहेत.

याच निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी आपला नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांच्या कडे दाखल केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश चे वसंत सुगावे, जिल्हा परिषद सदस्य अँड.विजय धोंडगे, जीवनराव पाटील घोगरे, माधवराव पवार, दिगंबर पेठकर अंबादास देशमुख, शंकरराव कदम, मधुकरराव पाटील बनसोडे, दिगंबर सोनवळके, रेखा राहिरे, बालाजी माटोरे, श्रीकांत मांजरमकर, बाळासाहेब भोसिकर, रवींद्र सिंग पुजारी, शिवानंद शिप्परकर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक अनुषंगाने मुदखेड तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख बारडकर व शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी निवडणूक अधिकारी लतिफ पठाण यांच्याकडे दाखल केला.


 उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, माणिक लोमटे, पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर, श्रीकांत पावडे,शाम वानखेडे, शिवाजी देशमुख सह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मुगट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टनचा फज्जा.

ना मास्कचा वापर, ना सोशल डिस्टन्स

संपादक आशिष मुगटकर

फज्जा :- मुगट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुदान वाटप सुरू असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

मुगट / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या टप्प्याच्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप संथ गतीने सुरू आहे.

दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा बँकेत येत आहेत.त्यामुळे बँकेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बँकेत जमा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसल्याच प्रकारचे नियम या ठिकाणी पाळले जात नसून सोशल डिस्टन्सचा फज्जा या ठिकाणी उडालेला दिसत आहे.

या शाखेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसल्याच प्रकारची दक्षता घेतली जात नाही.

 या ठिकाणी मास किंवा सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स चा वापर न करताच बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी  होत आहे.

या शाखेत शेतकऱ्यांसाठी कसल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.ना बसन्याची,ना पाण्याची सुविधा या ठिकाणी अजिबात नाही. लोकांना बँकेत समोरच ताटकळत पैसे मिळेपर्यंत उभेच राहावे लागते किंवा शेजारच्या घराचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान, जिल्हात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.त्यानंतरही नागरिकांची बेफिकीरी कायम आहे.जर अशीच परिस्थिती राहिली तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.




लोकप्रिय बातम्या