मुदखेड तालुका / प्रतिनिधी
महाराष्ट्र विकास आघाडी चे दिगगज मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश असे मिडीयाने दाखवले .......
काँग्रेस चे मोठे कार्यकर्ते ही उत्साहीत
आघाडीचे इतर पक्षाचे चिंताग्रस्त असल्याचे चित्र
नांदेड जिल्ह्यातीलविविध विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज मंत्री नितिन गडकरी यांनी शेकडो कोटी रुपये मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात नांदेड ते मुदखेड आणि भोकर मतदारसंघात सतत वापरायचे प्रमुख रस्ते खड्डेमय झाले मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता.या रस्त्याचा कायापालट करने साठी मंत्री गडकरी यांनी दुर दृष्टीने रस्त्याचे काम करायला लावले . रूंद व सरळ गुळगुळीत रस्ता करण्याच्या विकास कामाला दोनशे कोटी रुपये पेक्षा अधिक निधी मंजूर केला. आज पर्यंत शेकडो रूपये च्या पटीत नांदेड जिल्ह्यातील रस्तासाठी निधी मंजूर करणे सुरू च असुन त्याची बेरीज हजारो कोटीत होत आहे.
मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात माळकौठा तालुका मुदखेड येथे नवा रस्ता गाव वस्ती मधुन चक्क इंग्रजी यु आकारात केला होता .तो धोकादायक वळण असल्या ची ओरड मिडीयामध्ये झाले मुळे आता गाव वस्ती बाहेरून दुसरा प्रमुख रस्ता करणे साठी सुद्धा सरकार निधी देत.
या आधी अनेक कोटी रुपये रस्त्यावर कसे खर्च दाखवते याची चौकशी ईडी कडुन केंद्र सरकार करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही . निधी मागणी काँग्रेस कडुन आणि निधी पाठवणार भाजप चे सरकार आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी पार्टी सध्या भाजप च्या विरोधात आक्रमक आहेत पण नांदेड मध्ये त्यांच लक्ष नाही.
पाटबंधारे कॅनल वर नवीन पुल असोत की ग्राम पंचायत गावातून रस्त्याच्या कडेला तसेच शहराबाहेर मुदखेड कडुन उमरी रस्त्यावर मोठी नाली बांधकाम घेण्यासाठी अनेक कोटी रुपये निधी बांधकाम खात्याने आणला आहे.
काल परवा भोकर विधानसभा मतदारसंघात मुगट , माळकौठा, निवघा, मेंडका ग्राम पंचायत मधील चिखलमुक्त ग्राम विकास साठी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ८० लाख रूपये असे मुदखेड तालुक्यात ३ कोटी २० लाख रूपये निधी भाजप च्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या रोजगार हमीत मंजूर केला आहे. श्रेय घेण्यासाठी लगेच कार्यक्रम घेतले.
काँग्रेस चे जिल्हा व तालुका अध्यक्ष यांनी या कामासाठी कार्यक्रम घेऊन राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकार कडुन हे शेकडो कोटी रुपये आले हे सांगितले आहे.
एकी कडे शिवसेना नेतृत्व माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे व राष्ट्रवादी नेते तथा माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्री मंडळात मंत्री तथा पालकमंत्री चव्हाण यांचे कडून निधी साठी प्रयत्न केले तर त्यास भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील सरकार प्रतिसाद देते हा चिंतनाचा विषय आहे.
आणि
दुसरी कडे काँग्रेस सदस्य नोंदणी कार्यक्रमा त काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजुरकर यांनी देशपाळीवर मुस्लिम समाजाचे नेतृत्व, मुख्य नायक , खानदानी लोकसभेचे सदस्य असलेले खासदार आवैशी साहेब यांच्या बद्दल ठेवणीतील शब्द वापरून उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस च्या पराभवा बद्दल टिका करतात हे गंभीर चिंता करण्याचा विषय झाला आहे.
आता पुढे काय होईल हे स्पष्ट दिसते की नाही हे पहावे लागेल.
नाट्यमय आणि गुप्त घडामोडी सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या चिंता करण्याचा विषय आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा