आमदुरा येथे बाल संस्कार शिबिर व कीर्तन महोत्सवाचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था पुणे कडून बाल संस्कार शिबिर व कीर्तन महोत्सवाचे आयोजन  तसेच अधिकमासाच्या निमित्ताने भव्यदिव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

 या बाल संस्कार शिबिराला दि.१७ मे २०२६ पासून सुरुवात होणार असून त्याची सांगता दि. २५ मे २०२६ रोजी होणार आहे. या शिबिरात दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते १०, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ४ संत चरित्र कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे.

 या शिबिरात बालकांवर वारकरी संप्रदायाचे विविध संस्कार केले जाणार आहेत त्यात प्रामुख्याने हनुमान चालीसा, टाळ पावल्या, नित्याचे श्लोक, संत चरित्र, गीता संहिता, पखवाज गायन, यांचा समावेश असणार आहे. 

या १० दिवस चालणाऱ्या संस्कार शिबिरामध्ये कीर्तन महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले बाल कीर्तनकार हे या ठिकाणी कीर्तन करणार आहेत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत या कीर्तनाचा महोत्सव होणार आहे.

या बालसंस्कार शिबिरात परिसरातील  बालकांनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून  करण्यात आले आहे.

 या बाल संस्कार शिबिर व किर्तन महोत्सवाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार ह.भ.प गणेश महाराज पवार आमदुरेकर यांनी केली आहे.



भाजपा शिक्षक आघाडीने राष्ट्राभिमान व विकासाची कास धरावी.

प्रदेश उपाध्यक्ष अँड.चैतन्यबापू देशमुख यांचे गौरौद्गार

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा परिषद 

   शिक्षक हा सामान्य नसून उद्याच्या भारताचे चिमुकले भविष्य घडविण्याचे भाग्य त्यांच्या हातात असते. भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा नांदेडने शिक्षकांच्या भरीव सहकार्याने पक्षाची ध्येयधोरणे शिक्षकांपर्यंत आणि पर्यायाने जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक श्रम घेवून राष्ट्राभिमान व विकासाची कास धरावी , असे गौरवोद्गार प्रदेश उपाध्यक्ष अँड.चैतन्यबापू देशमुख यांनी भाजपा शिक्षक आघाडीच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून काढले आहेत.



  
                                         
         दि.12 एप्रिल रोजी सेवाभावी संस्था विष्णुपूरी परिसर येथे अत्यंत भव्य पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप सोहळा तथा पदवीधर निवडणूक नोंदणी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस 178 शिक्षकांची उपस्थिती लाभली होती. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण हे होते,तर विशेष अतिथी वक्ते म्हणून डॉ प्रशम कोल्हे प्रदेश संयोजक तथा पुणे शिक्षक मतदार संघ नोंदणी प्रमुख , प्रा.संजय भातलंवडे संयोजक मराठवाडा, डॉ बालाजी गिरगावकर जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा नांदेड, प्रा.राजेश कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी नांदेड दक्षिण, गणेश पाटील बेळीकर सहसंयोजक मराठवाडा, बि.ए.जाधव उत्तर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
     अध्यक्षीय समारोपात डॉ हंबर्डे यांनी भाजपा स्थापनेपासूनचा इतिहास, काश्मीरचे 370 कलम रद्द, डॉ शामाप्रसाद मुखरजी यांचे अतुलनीय बलिदानाविषयी रोमांचकारी मार्गदर्शन करुन शिक्षकांना प्रेरित केले. प्रमुख वक्ते डॉ प्रशम कोल्हे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पध्दतीने आकडेवारी, इसवी सनाचा दाखला देत मोदी व फडणवीस सरकारने शिक्षकांच्याच हिताची कामे केली , हे पटवून दिले. यासमयी उपस्थित अनेक शिक्षकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी प्रा.संजय भातलंवडे यांनी पदवीधर नोंदणीचे महत्त्व विशद करुन प्रत्येक शिक्षकांस नोंदणी अर्जाचे वितरण केले. 

            एकूण तीस मंडळातील पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व निवेदन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार जाधव यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीतानंतर सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नांदेड भाजपा शिक्षक आघाडीच्यावतीने शिक्षक मेळाव्याचे आयोजन.

संपादक आशिष मुगटकर

नियुक्ती पत्र व पदवीधर निवडणूक नोंदणी आढावा घेतल्या जाणार 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

    भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा नादेडच्यावतीने रविवार दि.12 रोजी सहयोग सेवाभावी संस्था, विष्णुपूरी परिसर येथे सकाळी 11 वाजता भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संतुकराव हंबर्डे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण ग्रामीण हे राहणार असून उद्घाटक म्हणून ऍड. चैतन्यबापू देशमुख प्रदेश भाजपा उपाध्यक्ष, संजय कौडगे उपाध्यक्ष प्रदेश भाजपा तर विशेष अतिथी अमरनाथ राजूरकर महानगराध्यक्ष नांदेड, किशोर देशमुख जिल्हाध्यक्ष उत्तर ग्रामीण यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून डॉ प्रशम कोल्हे प्रदेश संयोजक भाजपा शिक्षक आघाडी, प्रा.किरण पाटील शिक्षक नेते तथा प्रा.संजय भातलंवडे संयोजक मराठवाडा विभाग भाजपा शिक्षक आघाडी यांचे टीईटी, शिक्षकांवरील अतिरेकी कामाचा बोजा,विविध प्रलंबित प्रश्नावर सखोल व भरीव मार्गदर्शन लाभणार आहे.


                  याच कार्यकमात नांदेड जिल्ह्यातील भाजपा शिक्षक आघाडीच्या विविध पदाधिकारी नेमणूकीचे नियुक्ती पत्र वितरण केल्या जाणार आहे. यासमयी मान्यवर येवू घातलेल्या पदवीधर निवडणूक नोंदणीचा सुध्दा आढावा घेवून जास्तीत जास्त नोंदणी कशी करुन घेता येईल, यासंदर्भात योग्य सूचना व मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातून सोळा तालुके,  नवू मंडळे, महानगर, दक्षिण व उत्तर नांदेडमधील जवळपास तीनशे शिक्षक उपस्थित राहतील. अशा महत्वपूर्ण शिक्षक कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीतजास्त शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.राजेश कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी नांदेड दक्षिण, पंढरीनाथ काळे नांदेड महानगराध्यक्ष शिक्षक आघाडी, बि.ए.जाधव उत्तर आणि गणेश पाटील बेळीकर सहसंयोजक मराठवाडा विभाग यांनी केले आहे.




सरदार रामस्वरूप सिंह खालसा यांच्या धार्मिक पदयात्रेला सुरक्षा प्रदान करा ; शिवकांत शुक्ला (राष्ट्रीय अध्यक्ष) भारतीय गण वार्ता पार्टी भोपाल यांची मागणी.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / सरदार गुलाबसिंग महाराज 

             शिखधर्मीयाचे दहावे गुरु तथा खालसा पंथाचे पिता श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या नांदेड येथील पवित्र पावन या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी  भोपाळ वरून सरदार रामस्वरूप सिंह खालसा, आर. एस. सिंह खालसा भगवा पार्टीचे राष्ट्रीय संघटन महामंत्री असून दैनिक विश्वसत्ताचे ते संपादक आहेत.  खबर खालसा या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक सुध्दा आहेत.



दि. ६ एप्रिल पासून भोपाळ येथून महाराष्ट्रातील नांदेड येथे धार्मिक पदयात्रा करत येणार आहेत. पवित्र, पावन सचखंड हुजूर साहिब अबचलनगर नांदेडला भेट देणार आहेत.

 त्यांची ही पदयात्रा बेतुल, होशंगाबाद, अमरावती, हिंगोली, नांदेड अशी मार्गक्रमण करत येणार आहे. 

त्यांच्या या पदयात्रेला यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याची मागणी भारतीय गण वार्ता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकांत शुक्ला यांनी एका पत्रकाद्वारे संबंधित जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

मुगटचे विकास पुरुष श्री.गंगारामजी पाटील कल्याणे काळाच्या पडद्याआड .

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुक्यातील उशाला अखंडीत पणे वाहनारी गोदा माय.गोदा माईच्या कुशीत वसलेले छोटस पण वैभवशाली संपन्न असलेले गाव म्हणजे मुगट होय.

 याच गावात लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन. शेतकरी कुटुंबात गंगाराम (बापु) यांचा जन्म झाला.

       घरात माली पाटीलकी होती. जवळपास शेकडो एकर जमीन त्यांच्या कडे होती. दशरथ पाटील यांना मुलबाळ नव्हते. अनेक देवाला साकडं घातलं. काही वर्षांनंतर घरात पाळणा हलला दशरथ पाटलांच्या पुत्र रत्न जन्माला आले.त्या गोंडस बाळाचे नाव गंगाराम ठेवण्यात आले. दशरथ पाटलाना आकाश ठेंगणे झाले होते.त्यांचा या आनंदात संपुर्ण गाव सहभागी झाले होते.

          या आनंदात त्यांनी संपूर्ण गावाला त्या काळात पुरण पोळी जेवण दिले.हळु-हळु बाळ गंगाराम मोठे होत गेले तसे- तसे आपल्या शेतात, विशेष करून प्राण्यांत त्यांची रुची वाढत गेली. घरात शेकडो एकर जमीन, मोठ्या संख्येने पशुपालन यात त्यांना रुची वाढली.       गावातील समाज कार्यात ते सहभागी होऊ लागले.कालांतराने गावातील राजकारण त्यांनी प्रवेश केला.गावातील सोसायटी, ग्रामपंचायत मध्ये त्यांना आपली वेगळी छाप निर्माण केली.

            पंचकृषीत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.कालांतराने त्यांना दोन मुल, दोन मुली झाल्या. पशुची पारख करण्यात अत्यंत कुशल होते.जनावरांच्या अंगावर खाना खुना त्यांबद्दल त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यातल्या त्यात त्यांचे अश्व प्रेम खुपचं जास्त होते.दक्षिणेत प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या यात्रेला दे दरवर्षी न चुकता जायचे.त्यांच्या हताने लाखोचे अश्वाची खरेदी लोक करत असत.

  गावातील लहान मोठी व्यक्ती त्यांना बापू या नावाने हाक मारत असत.राजकारणा ते निष्कलंक, एकनिष्ठ राहिले.कोनताही राजकीय पुढारी गावात आलातर प्रथम त्यांना भेटत असे.मुगट ग्रामपंचायत वर १९९५ पर्यंत त्यांनी सत्ता होती.वयांचे कारखान्याच्या बैठकीत जाने होत नसल्याने त्यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला.भाऊराव कारखान्याचे संचालक म्हणून २०१०पर्यत त्यांनी काम केले.

   गावाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.गावात लोकांसाठी पाण्याची व्यवस्था,रस्ते,नाल्या या सारखी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली.राजकारणात कांग्रेसचे कै.शंकरराव चव्हाण साहेब, खा.अशोकराव चव्हाण साहेब यांचे कट्टर समर्थक होते.शेवट पर्यंत ते कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

  कालांतराने वय होत गेल तरी त्यांचे अश्व, श्वान,बैल यांच्या प्रतीचे प्रेम तसेच कायम होते.त्यांचा वारसा आता पुढे त्यांचे नातवंडे चालवत आहेत.दि.१४रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मध्यरात्री १२ नंतर त्यांच्या शरीराने साथ सोडली त्यांचे वय ९७ वर्ष होते.मुगट गावचे लाडके बापू सर्वांना पोरक करुन कैलासात कायम स्वरुपी निघून गेले.

अशा या मुगटच्या मातीत जन्मलेल्या कर्तृत्ववान, एकवचनी, एकनिष्ठ, विकास पुरुष यांना मुकला आहे.

त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.🌹🌹🙏🙏

संकलन आशिष कल्याणे 

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील 

 दि.०४ फेब्रुवारी रोजी बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडच्या वतीने आज इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.

   कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत, भावपूर्ण मनोगते व्यक्त केली。शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.ज्यावेळी वातावरण भावूक झाले होत.

      प्रमुख पाहुणे प्रा. नारायण सावंत मार्गदर्शन करताना, 'निरोप घेणे कठीण असले तरी, ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे' असे सांगत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा डॉ पंजाब शिंदे यांनी' १२वी च्या बोर्ड परिक्षेला सामोर जातांना' येणाऱ्या अनेक अडचणीचा उलगडा केला . अध्यक्षीय समारोपात प्रा. परशुराम माने यांनी विद्यार्थांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

       तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कैलाश खानसोळे,सूत्रसंचालन गायत्री पवार, तनुजा पवार या विद्यार्थिनींनी केले तर कार्यक्रमाची सांगता प्रा मनोहर ओसावर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता अकरावीचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



मुगट जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

      दि.१ फेब्रुवारी रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११वाजता माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

          या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन जोशी (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक),प्रमुख पाहुणे म्हणून श्री देविदास पवार (माजी मनपा आयुक्त ) हे होते.

          शाळेतील सण १९६५ ते २०१५ या कालावधीतील शालेय शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांसाठी शाळेकडून आयोजित करण्यात आला होता. 

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांनी सुरुवातीला केले. 

    कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. 

     शाळेत तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक म्हणून कार्य केलेल्या उपस्थित सर्वांचा शाल व पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      यावेळी जवळपास शाळेतील २५ माजी मुख्याध्यापक ,माजी शिक्षक, शिक्षीका यांनी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. 

   माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे, छ.संभाजीनगर येथून माजी विद्यार्थी व शिक्षक आले होते. या शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत तर अनेक जण मोठ्या पदावर विराजमान होऊन सेवानिवृत्त झाले आहेत.

       या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील माजी शिक्षकांनी आपले मनोगत मांडले व शालेय जीवनातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यात एस. के. पचलिंग सर, बी.टी पाटील सर, नारायण कुलकर्णी सर, चंडीदास देशपांडे सर, पी एम.पेंटेवाड सर, आदींनी आपले मनोगत यावेळी  मांडले. 

      माजी विद्यार्थी यांनी सुध्दा शालेय जीवनातील आपल्या जुन्या आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला. या प्रसंगी माजी विद्यार्थी यांच्याकडून शाळेला एक प्रिंटर, १५ पांढरे फळे या वस्तू भेट दिल्या.

    सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी आपण हा उपक्रम अशाच पद्धतीने राबवावा असं मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.         कार्यक्रमाचे सूत्रसंचाल ज्ञानेश्वर मरकंटे (शिक्षक) आशिष कल्याणे  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शालेय समिती,शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

      मुगट जिल्हा परिषद शाळेत प्रथमच हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा नवीनच उपक्रम शाळेमध्ये प्रथमच राबवला त्यामुळे शाळेतील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकप्रिय बातम्या