श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील 

 दि.०४ फेब्रुवारी रोजी बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडच्या वतीने आज इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.

   कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत, भावपूर्ण मनोगते व्यक्त केली。शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.ज्यावेळी वातावरण भावूक झाले होत.

      प्रमुख पाहुणे प्रा. नारायण सावंत मार्गदर्शन करताना, 'निरोप घेणे कठीण असले तरी, ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे' असे सांगत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा डॉ पंजाब शिंदे यांनी' १२वी च्या बोर्ड परिक्षेला सामोर जातांना' येणाऱ्या अनेक अडचणीचा उलगडा केला . अध्यक्षीय समारोपात प्रा. परशुराम माने यांनी विद्यार्थांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

       तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कैलाश खानसोळे,सूत्रसंचालन गायत्री पवार, तनुजा पवार या विद्यार्थिनींनी केले तर कार्यक्रमाची सांगता प्रा मनोहर ओसावर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता अकरावीचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या