मुदखेड तालुका / प्रतिनिधी
येथील प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय वाई येथे संस्थेच्या वतीने वार्षिक श्नेह संमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून मौजे वाई च्या सरपंच शोभा ढगे,पार्डी वैजापूर च्या सरपंच अर्चना हौसरे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवा निवृत्त व्यवस्थापक प्रल्हाद वाघमारे,कृ.ऊ.बा.स.मु. संचालक मधुकर हौसरे,वाई च्या उपसरपंच शिला कसबे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भगवान हाणवते,माजी अध्यक्ष मारुती गायकवाड, मुख्याद्यापक निर्मला आडे राठोड,अरुणा गायकवाड स.शी.आषा सोनटक्के,से.स.सो. वाई चे संचालक साहेबराव पाटील वडजे, ग्रामपंचायत सदस्य विलास गायकवाड, गोविंराव पाटील पवार, विमा प्रतिनिधी वसंत पाटील कवळे, सुनील वाघमारे,वैभव टेन्ट अँड डेकोरेटर्सचे प्रो प्रायटर सुरेश वाघमारे,भुजंग वडजे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजे भोसले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून धूप व दीपाचे प्रज्वलन करून मान्यवारांच्या सत्काराने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरपंच अर्चना हौसरे म्हणाल्या की, सद्याच्या युगात महिलांना आरक्षण आहे पण सुरक्षितता नाही. म्हणूनच कधी निर्भया तर कधी श्रेया अस्या प्रकारच्या क्रूर हत्याकांडाचीं मालिका तयार होत आहे. हे थांबावायचे असेल तर मॉ जिजाऊचें संस्कार प्रत्येक आईने आपल्या पाल्याना द्यायला हवेत तरच समाजात बाल शिवाबा तयार होतील आणि शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना आरक्षण नसले तरी संरक्षण होते तसे संरक्षण करणारे शिवबा तयार करायचे असतील तर आई वडिलांच्या संस्कारा बरोबरच शालेय संस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहेत.त्या करिता प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयाने जी सैक्षणिक चळवळ सुरु केली आहे.या चळवळीत आपण सर्वांनी तन मन धनाने सहभाग नोंदऊन संस्कारमय समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तरच आरक्षणा बरोबरच स्त्रियांचे संरक्षण होईल असे मार्मिक विचार व्यक्त केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देतांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना तन मन धन ओवाळून परदेशी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली.तो आदर्श डोळ्यापुढे ठेऊन संस्थेने डोंगराळ ग्रामीण विद्यार्थ्यांना एकाच छताखाली पहिली ते बारावी पर्यंतचे चांगले शिक्षण माफकरित्या उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवला आहे.हा मानस पूर्ण करण्यासाठी गावकर्यांनी पुढे येऊन संस्थेस मदत करावी असे आवाहन केले.
या नंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे संगीताच्या निनादात आपापल्या विविध कला गुणांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले हा कार्यक्रम यशस्वीते करिता मुख्याध्यापक निर्मला आडे राठोड, स.शी. आशा सोनटक्के, लिपिक राहुल सोनकांबळे,सेवक दत्ता बहादुरे आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा