अखेर नगरपरिषदेच्या लेखी पत्रा नंतर शेतकऱ्याचे आमरण उपोषण आंदोलन मागे

शेतकऱ्यांला पाजले नगरअध्यक्षाने नारळ पाणी

उपोषण मागे:- जागा मावेजा मिळण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन नगर अध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी शेतकरी एडके यांना नारळपाणी पाजवून उपोषण मागे घेण्यात आले .


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

अखेर मुदखेड नगरपरिषदेने नगररचना नांदेड विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्या सुचनेनुसार जागामावेजा साठी शासनाकडे पाठपुरावा करु यासाठी  शिवाजी रामा ऐडके यांना लेखी पत्र दिले त्या नंतर दोन दिवसीय चाललेले आमरण उपोषण मागे घेतले यावेळी पत्रात उपरोक्त पत्रान्वये वरिल पाठवलेला अभिप्राय मिळताच  न.प.मुदखेड मार्फत शेतक-याच्या मागणीनुसर शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आशी हामी न.प.चे सि.ओ. रामराजे कापरे यांनी लेखी पत्र देवुन शेतक-याला दिली आहे. जागामावेजा मिळण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन नगर अध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी शेतकरी एडके यांना नारळपाणी पाजवून उपोषण मागे घेण्यात आले आहे.

यावेळी भाजप दीव्यांग मराठवाडा अध्यक्ष प्रविण गायकवाड, भाजपा विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी सी.ओ.रामराजे कापरे याच्यांशी चर्चा करुन याप्रकरणी लक्ष घालून शेतक-याला जागा  मावेजा मिळण्यासाठी चा प्रस्ताव नगरपरिषदेने लवकर पाटवून शाषनस्तरावरुन पाठपुरावा करुन मावेजा लवकरात लवकर मिळवुन दयावा याबाबत मध्यस्थी करत लेखी पत्र घेऊन शेतक-याचे उपोषण सोडवले आहे.

यावेळी नगरअध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, काँग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटिल कदम, दीव्यांग मराठवाडा अध्यक्ष प्रविण गायकवाड, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, भाजप ता.अध्यक्ष शंकर मुतकलवार, पप्पु सोनटक्के सी.ओ.रामराजे कापरे,नगरसेवक करिमखाँन साब,सलाम सर,गोविंद गोपनपल्ले, मुन्ना चांडक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या