केळी विमा कंपनीने बारड मंडळ वगळल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष

 केळी विमा भरूनही नुसकान भरपाई मिळत नसल्याने याला जबाबदार कोण? 

बारड / प्रतिनिधी

केळी विमा कंपनीने बारड मंडळाला विमा रक्कम देण्यातून वगळल्याने उन्हाळ्यातील तीव्र तापमानाने गेलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून उन्हाच्या तापमानाने केळी बागाचे मोठे नुसकान झाले असल्याने केळी विमा भरूनही नुसकान भरपाई मिळत नसल्याने याला जबाबदार कोण असा सवाल शेतकरी केळी उत्पादक वर्गातून केला जात आहे. हा सरास बारड मंडळावर विमा कंपनीने केलेला अन्याय असल्याचे यावेळी शेतकरी वर्गातून भावन व्यक्त करत आहेत.

बारड परिसर हा केळी पिकासाठी अनुकूल असल्याने या भागातील सर्व शेतकरी आपल्या शेतावर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतो परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि केळी बागांना लाखो रुपये खर्च करून कधी ठेंगा हातात मिळत असल्याने शेतकरी अडचणीत असतो याला सपोर्ट म्हणून या भागातील जागृत शेतकरी विमा कंपनीकडून केळी विमा नेहमी काढण्यात सजग असतो २०१९-२० मध्ये उन्हाच्या तापमानाने या भागातील शेतकऱ्यांच्या केळी बागाचे अतोनात नुकसान झाल्याच्या घटना याठिकाणी घडल्या आहेत परंतु हवामान मापक यंत्राच्या आधारावर विम्याची केल्म मंजूर करण्यात येतात या भागातील शेतकऱ्यांनी ज्या वेळेस केळी बागा करपल्या केळी घड उन्हाच्या तापमाने गळती होवून बागाचे नुसकान होत होते अशा वेळेस विमा कंपनीला सूचनाही केल्या होत्या त्यांना मेल द्वारे संदेश पाठवला होता परंतु याकडे दुर्लक्ष झाले असावे

 २०१९ -२० मध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी विमा काढला होता परंतु ज्या भागात केळीचे क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणी विमा कंपनीने क्लेम मंजूर केला असून कंपनीचा घाट  असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे. मुदखेड मंडळ मुगट मंडळाला विमा लागू करण्यात आला आहे परंतु बारड मंडळाला यातून वगळल्याने नुस्कान झालेल्या केळी उत्पादकांचे काय?याबाबत शेतकऱ्यांन कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विमा कंपनीने या भागाचा त्यावेळेस सर्वे करून शेतकऱ्यांना विमा देण्याची गरज होती.तसे झाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

याभागात विम्याचा क्लेम शेतकरी केळी बागाच्या संरक्षणात मोठ्या प्रमाणात भरला जातो. त्यांना विमा पासून कंपनीने वंचित केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे तसेच हवामान मापक यंत्र ही नादुरुस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे मुदखेड तालुक्यातील मुदखेड मंडळ, मुगट मंडळाला विमा मिळत आणि बारड मंडळ वगळण्यात येते याला जबाबदार कोण असा सूरही या भागातील शेतकरी वर्गातून निघत आहे. याबाबत या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कंपनीच्या विरोधात व प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर रोष व्यक्त करण्यात येत आहे

मागील काही दिवसापूर्वी पण विमा कंपनीने याच भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला होता कंपनीने चक्क एका बँकेला विम्याची रक्कम पुरेपूर दिली तर दुसर्‍या बँकेतील शेतकरी खातेदारांना रक्कम कमी दीली होती परंतु सतत जागरूक शेतकऱ्यांनी पाठपुरावा करत दैनिक लोकमतच्या माध्यमातून कंपनीला जागे करून 65 लाख रुपयाचा क्लेम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून घेतला होता यावेळी निलेश देशमुख,शेतकरी मित्र मंडळ व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी यासाठी परिश्रम घेत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवून दिली होती

परंतु यावेळी मात्र विमा कंपनीने बारड मंडळ वगळून केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी नुकसानीचा क्लेम मिळाला नसल्याने केळी बागाच्या नुसकान भरपाई साठी जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे विमा कंपनीच्या कामावर संकोच निर्माण केला जात असून विमा कंपनी च्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या