शिवसेनेची तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी .!
बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यात दिनांक १८ रोजी सकाळी तीन तास ढगफुटी सारख्या पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह इतर पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून तालुक्यातओला दुष्काळ जाहीर करा. यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी तहसीलदार दीनेश झांपले यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
या परिसरातील शेतकरी हा सततच्या नुकसानीने परेशान झाला असून पेरणी पासूनच बोगस बियाण्यापासून तीनदा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर कसेतरी सोयाबीन हाताला आले होते परंतु अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यासह इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने मुदखेड तालुकातील शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानीचा सर्वे करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. हाताला आलेला सोयाबीन हंगाम पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने याकडे गांभीर्याने घेत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तत्परतेने मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे, विधानसभा संघटक विश्वंभर पवार उप्पतालुका प्रमुख गोविंद शिंदे, शहर प्रमुख सचिन पाटील माने, अविनाश झमकडे, सचिन चंद्रे, गुलाबराव देशमुख सुधाकर सूर्यवंशी संचालक सुरेश शेटे साहेबराव चव्हाण बाळू चंद्रे पवन अटकलवाड, संजय गाडे, फालाजी पवार, निवेदनावर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा