खरबी शिवारातील ढगफुटी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी .
मुदखेड तालुक्यातील शेंबोली खरबी शिवारातील अचानक पडलेल्या ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांची आतोनात नुकसान झाले असल्याने त्याची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पाटील भोसीकर, खरबी सरपंच गंगाधर पाशमवाड,जि.प.सदस्य प्रकाशराव भोसीकर, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे तहसीलदार,मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी, कृषी सहायक, ग्रामसेवक,आदीची प्रमुख उपस्थितीत होते.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट बांधावर जाऊन शेंबोली, खरबी येथील शेतकरी नामदेवराव भोसले,संभाजीराव भगत, अशा तीन ,चार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात ढगफुटी सारख्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीची पाहणी केली.
![]() |
| संवाद :- पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनस्तरावरुन जे काही सहकार्य, मदतीसाठी प्रयत्न करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांच्याशी संवाद साधला. |


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा