सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु करा नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीची मागणी

राज्यात जवळपास सहाय्यक प्राध्यापक १२०००  जागा रिक्त .

संपादक आशिष मुगटकर

निवेदन :-  शासनाने तात्काळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्याकडे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देेताना प्रा.डॉ बाबु महंत गिरि,आदीसह समीती पद अधिकारी उपस्थित होते.

बारड/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडून तब्बल दहा वर्षापासून महाविद्यालय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीतपणे होत नसल्याने शासनाने तात्काळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्याकडे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

             राज्यात जवळपास सहाय्यक प्राध्यापक १२०००  जागा रिक्त आहेत त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम झाला असून उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सहायक प्राध्यापकाच्या जागा त्वरित शासनाने भरण्याची गरज आहे तर या विपरीत या जागा भरल्या नसल्यामुळे नेट-सेट पीएचडी केलेल्या प्राध्यापकाचे शिक्षण घेऊन हा सुशिक्षित बेरोजगार झाला असल्याने आर्थिक इनकम नसल्याने चिंतेची बाब बनली आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या पालकांमध्ये एवढे शिक्षण घेऊन मुलगा बेरोजगार असल्याने मोठी चिंतेची बाब असून पालक वर्गातून असंतोष निर्माण झाला आहे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सहाय्यक प्राध्यापकांची भरती त्वरित करण्यात येण्याची मागणी यावेळी संघर्ष समीतीच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनावर प्रा.निरंजन गिरी, प्रा.नितीन चौदंते,प्रा.सुदर्शन शेळके, प्रा.साहेबराव हनमंते, प्रा.डॉ बाबू महंत गिरी आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या