लहूजी साळवे यांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचला ; कॉ.प्रा.सदाशिव भुयारे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात  विविध सामाजिक संघटनाच्या वतीने  क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात "लहूजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान" या विषयावर प्रमुख वक्ते मनून बोलताना सुप्रसिध्द पुरोगामी विचारवंत तथा राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांनी  प्रतिपादन केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पिराजी गाडेकर हे होते तर प्रमुख सूत्रसंचलन मानव हित लोकशाही पक्षाचे आकाश सोनटक्के यांनी केले.

प्रा. सदाशिव भुयारे पुढे बोलताना असे मन्हाले की क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ येथील अतिशय शूर साळवे नाईक परिवारात झाला. लहूजीचे आजोबा थोरले लहूजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सैनिकाला प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना दांडपट्टा कसब थोरले लहूजी यांनी शिकवले होते.लहूजीचे वडील  राघोजी साळवे यांनी एका जिवंत वाघाला पकडुन पेशव्याच्या दरबारात हजर केले होते.१८१७ च्या ब्रिटिश आणि पेशवे यांच्यातील महत्वपूर्ण खडकी च्या लढाईचे नेतृत्व विर राघोजी साळवे यांनी केले होते. दुसरा बाजीरावाच्या पळकुटेपणामुळे  खडकीच्या लढाईत लहुजीचे वडील राघोजी साळवे यांना वीरमरण आले.त्याचवेळी क्रांतीगुरू लहूजी राघोजी साळवे यांनी" जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी " अशी शपथ घेतली व मी भारतातला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लग्न करणार नाही अशी शपथ घेतली.

 पेशव्याचे २५००० सैन कोरेगाव भिमा येथे दडून बसल्याची खबर ब्रिटिश अधिकारी लॉर्ड एलिफिंस्टन याला लागताच महार बटालियनचे ५०० सैनिक पाठवून लॉर्ड एलिफिस्टन यांनी पेशव्याच्या २५ हजार सैनाच्या खात्मा केला. व दुसरा बाजीराव पळून गेला. सन १८२२ मध्ये ब्रिटिश विरुद्ध सशत्र लढा उभारण्यासाठी क्रांतीगुरू लहूजी साळवे यांनी पुण्यात गंजपेठेत सैन प्रशिक्षण केंद्र तालीम सुरू केली आणि त्यात वासुदेव बळवंत फडके, तात्या टोपे,बाळ गंगाधर टिळक,क्रांतीबा ज्योतिराव फुले सह शेकडो शसस्त्र क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढाई यशस्वी केली मनून लहूजी साळवे यांना भारतीय स्वातंत्र्या लढ्याचा पाया रचला असे संबोधले जाते.

 याशिवाय क्रांती बा ज्योतिराव फुले व क्रांतीआई सावित्रीआई फुले यांनी सण १८४८ मध्ये पुणे येथे देशात  सर्व प्रथम सुरू करण्यात आलेल्या मुलीच्या शाळेला संरक्षण दिले मनून भारतात फुले दाम्पत्य यांनी शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणली असे प्रतिपादन कॉ.प्रा.सदाशिव भुयारे यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश सोनटक्के, पांडुरंग सूर्यवंशी,माणिक कांबळे,इकबाल कुरेशी,सखाराम बोकेफोड,शैलेश बोकफोड, अजय बोकेफोड,माधव रणखांबे,प्रदीप बोकेफोड,ओमकार कंधारे ,सोनू कंधारे,विशाल कंधारे, यशवंत बस्वंते,विनोद कंधारे,कृष्णा गायकवाड, कृष्णा खंडाळे, चंद्रकांत बोकेफोड ,गजानन गवाले,राजू सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या