मुदखेड(तालुका प्रतिनिधी)
देशभर नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला गेला असला तरी मातंग समाज हा विकासापासून कोसो दूर आहे आजही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रभावीपणे प्रयत्न करत असताना दिसून येत नाही मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षण वर्गीकरणाचा लढा आजही सुरू आहे उच्च शिक्षणात मातंग समाजातील विद्यार्थी पुरेशा प्रमाणात पुढे येत नसल्याचे चित्र आज घडीला निर्माण झाले आहे मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आज खऱ्या अर्थाने गरज असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील मातंग समाज हा उपेक्षितच असल्याचे प्रतिपादन लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा संघटक संतोष तेलंग यांनी महाटी येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना केले .
तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रभाकर बालाजी ढगे पो पा यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व लाल ध्वजाचे ध्वजारोहण गावच्या महिला सरपंच सौ राजश्रीताई ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. जाहीर सभेच्या अध्यक्ष स्थानी संभाजी नागोजी पा ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिनिधी, बळी दत्तराम पा ढगे माधवराव धोंडीबा पा गाढे(शालेय व्यवस्थापन अध्यक्ष) शिवाजी काशीनाथ पा ढगे नागेश विठ्ठल पा ढगे हे होते, प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे मराठवाडा प्रभारी प्रविण
गायकवाड मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांची उपस्थिती होती
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अशोक ढगे मारुती ढगे बळवंट ढगे गणेश ढगे हनुमंत ढगे बाबूस ढगे प्रभाकर ढगे बचतगटाच्या प्रमु�

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा