मुदखेड तालुका प्रतिनिधी
गेल्या महीनाभरापासून उन्हाचा पारा वाढला असून पशु पक्ष्यांसह नागरीक उन्हाच्या काहीलीने अक्षरशः त्रस्त होत आहेत उन्हामुळे जमीनीतील पाणी पातळी खालावलेली आहे नदी नाल्यांचे व छोट्या तलावातील पाणि बाष्पीभवन होऊन आटून गेले आहे गावागावांत पाणी पुरवठा सुद्धा कुठे एक दिवसाआड नळाला पाणी येत आहे तर काही गावात पाणी टंचाईच्या झळा नागरीकांना सोसाव्या लागत आहेत सध्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडले आहे ते पाणी पशु-पक्षी,जनावरे व नागरीकांसाठी जमीनीतील पाणी पातळी वाढल्याने पिण्याच्या प्रश्न सुटेल म्हणून तात्काळ नदी नाल्यांत कॅनालचे पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा