मुदखेड तालुक्यास ओला दुष्काळ जाहीर करून १००%पिक विमा मिळवून द्यावा.

मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांचेकडे मागणी.


मुदखेड / तालुका प्रतिनिधि

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पुरजन्य परिस्थितिमुळे सर्व नद्यानाल्यातून पाणी बाहेर येऊन सर्व शेती पाण्याखाली गेली होती व गोदावरीच्या बैक वाटरमुळे आजही पुर्ण शेती पाण्याखाली आहे.

त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापुस,मुग,उडीद,केळी,ऊस व फुलशेती संपुर्णपणे नासून गेली आहेत व केळी वरील करपा रोगामुळे केळी पिका-पिकी आल्यामुळे केळीचे दरही क्विंटलला फक्त ४००/-ते ५००/-रूपयाला कोणी विचारत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाला आहे. आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत करावी आणि शेतकऱ्यांना  त्यांच्या हक्काचा विमा १००℅मिळवून देण्यासाठी आदेशित करावे.

  अशी  मागणी मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे तहसिलदार सुजित नरहरे यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला तालुकाध्यक्षा सौ. पुजाताई व्यवहारे,सामाजिक न्याय विभागाचे संतोष दर्शनवाड,सोशियल मिडीया तालुकाध्यक्ष ऋषीकेश पाटील पाथरडकर, प्रशांत पाटील मुंगल,माधवराव व्यवहारे,सुरज पवार,शिवाजी शिंदे,नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या