मुदखेड / तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील प्रशासनाची नजर पैसेवारी पाहुन मुगट येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ८ तालुक्याची नजर पैसेवारी ५०पैशापेक्षा अधिक काढली आहे.
त्यात मुदखेड तालुक्याचा समावेश आहे.यातील एकाही गावाची पिक पैसेवारी ५०पैशा पेक्षा खाली निघालेली नाही.
हि बातमी जेव्हा शेतकऱ्यांना दैनिक लोकमत वृत्त पत्रातून समजल्या वर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
गोदावरी नदीच्या आलेल्या पुरामुळे,मुगट मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक १०० टक्के खराब झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पीक पावसामुळे हातचे गेले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त व दुःखी आहे.त्यावर प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी(आनेवारी) हि शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठ चोळल्या सारखी आहे.प्रशासनाने अतिवृष्टीमुळे व नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पुन्हा पंचनामे करावे.नंतर हातात सोयाबीन उरले तर त्याची खुशाल पैसेवारी काढली असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
( या संबंधात मुगट तलाठी सौ.देशपांडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की हि प्रशासनाने नजर पैसेवारी ही सोयाबीन पेरणीनंतर च्या काळातील म्हणजे जुलै,आगस्ट महिन्यातील आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या नजर पैसेवारीस गांभीर्याने घेऊ नये.अंतीम पैसेवारी (आनेवारी) ही अद्याप काढण्यात आली नाही.ती सोयाबीन पीकाच्या काढणी नंतर काढली जाईल असे त्या म्हणाल्या.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा