विधानसभा निवडणुकीचा मतदारांवर प्रभाव कायम
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
भोकर मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व विशिष्ट पक्षाकडून मतदारांवर नोटाचा वर्षाव करण्यात आला होता. त्याच नोटाची आठवण आज सुद्धा मतदारांच्या डोक्यात कायम आहे.
सध्या महाराष्ट्रात पदवीधर मतदान यांचा प्रचार व सभांचा जोर आहे.तर अनेक ठिकाणी मतदारांना पोलचीट वाटपाचे काम जोरात सुरू आहे. अनेक गावात कार्यकर्ते आपल्या पक्षाचे जाहीरनामे व पोलचीट वाटप करण्याचे काम करत आहेत. गावातील अनेक कार्यकर्त्यांना पोल चीट वाटप करताना मतदारांकडून एकच मागणी होत आहे " काही आहे की नाही" ?? अशी विचारणा मतदारांन कडून वारंवार केली जात आहे.त्यामुळे गावातील पोलचीट वाटप करणारे सामान्य कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.कोरोनामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार नाही.खाजगी शाळा बंद आहेत.
गेल्या विधानसभे सारखं या पदवीधर मतदानात सुद्धा आपल्याला "धनलक्ष्मी" मिळणार या आशेने वाट पाहत असतानाचे चित्र आज ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा