नांदेड जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्यात अंशतः अनुदानित शिक्षक वारंवार आंदोलन करूनही शासनाने खोटी अश्वासने या व्यक्तीरिक्त शिक्षकांच्या पदरी काहीच मिळत नाही व हक्काचा १००% पगार मिळत नसल्याने राज्यभर गेली दिडमहिनाभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन, पाथरी, धाराशिव येथे अन्नत्याग आंदोलन केले त्यावेळेस शिक्षणमंत्र्यांनी फक्त अस्वासन दिले ते अश्वासन पूर्तीसाठी शिक्षक समन्वय संघाचे १६ ऑगस्ट पासुन आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे.
त्याच प्रमाणेकोल्हापूर येथे मागील अकरा दिवसापासून अन्नत्याग करणारा संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या उपोषण स्थळी गंभीर परिस्थिती पाहता आणि कोल्हापूर मधील घडामोडी पाहता महाराष्ट्रातील ६३ हजार शिक्षकांनो आता अंतिम तीव्र लढा करत ५ सप्टेंबर काळा दिन साजरा करणार.
काळा दिन हाच आपल्या आयुष्यात आता हक्काची पगार नक्की घेऊन येईल, तो दिन आपला खरा शिक्षक दिन असेल असे नांदेड जिल्हा समन्वयक प्रा.कैलास खानसोळे यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा