नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वनविभाग सतत विविध गोष्टींवरून चर्चेत राहत असतो काही चांगले काम केल्यामुळे तर काही कर्मचाऱ्यांन प्रशासकीय त्रास देण्यामुळे सतत चर्चेत असतो पण् कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास दिल्यास वनविभागाची नाचक्की होते हे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे वनपाल पदावर कार्यरत असलेले इंद्रजित हरिभाऊ बारस्कर यांनी प्रशासकीय त्रासाला कंटाळून साखळी उपोषणाला स्वातंत्र्य दिनी सुरुवात केली असून त्यांचेसोबत त्यांच्या आई श्रीमती मालतीबाई हरिभाऊ बारस्कर, विद्या इंद्रजित बारस्कर ( पत्नी)
शिवबा इंद्रजित बारस्कर (मुलगा) इंद्रजा इंद्रजित बारस्कर (मुलगी) आदी बारस्कर कुटुंबियांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना वनविभागातील कर्मचाऱ्यांसोबतच सर्व सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळत असून वरिष्ठ अधिकारी सूडबुद्धीने कसे वागतात याची प्रचिती येत असून या प्रकरणामुळे वनविभागाची नाचक्की होत आहे.
वनपाल इंद्रजित बारस्कर यांनी मा . वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक अमरावती यांनी २३ आक्टोबर २०२३ ते ०५ जुलै २०२४ पर्यंतच्या काळात ०५ वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याची माहिती ई मेल द्वारे दिली आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून होणारा मानसिक त्रास व पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे आठ महिन्यांच्या वेतनासह अन्य मागण्यांबाबत रितसर अर्ज केलेला असून संपूर्ण कुटुंबियांसोबत साखळी उपोषणाला बसण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी अशा प्रकारामुळे वनविभागाची नाचक्की तर होतंच असून वनविभागातील विविध कर्मचारी संघटना सामाजिक कार्यकर्ते तथा मुदखेड शहरातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे कार्यकर्ते विनोद टिकाराम चंद्रे.,स्मिता चंद्रे,दिपक जुजाराव,निता दिपक जुजाराव आदींसह असंख्य समाजबांधवांनी आपला पाठिंबा इंद्रजित हरिभाऊ बारस्कर यांना दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा