(आठ दिवसांतच दोन वेळा डि.पी जळाल्याने नागरिक हतबल)
मुगट वार्ताहार
मुगट गावातील डिपी वरुन शेती पंपाच्या मोटारी सुरू असल्यामुळे आठ दिवसांतच डिपी जळाला आहे.
त्यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात मोठ्या प्रमाणात आकोडे चोरांची संख्या चांगलीच असुन सुद्धा डिपी जळन्याच्या घटना जास्त घडत नाहीत .संपुर्ण गावाचा भार हा सहा ते सात डिपी वर आहे.
गावातील वेशीतील हनुमान मंदीरा जवळील डिपी वर सुद्धा जास्त लोड दिसत नाही.परंतु मागील काही दिवसांपासून या गावठाणातील अनेक शेतकरी या डिपी वरुन विज चोरी करून,आकोडे टाकून,शेती पंपासाठी विज घेत आहेत.त्यामुळे डिपी जळन्याच्या घटना घडत आहेत.लाईनम्यान यांनी संबंधित शेतकऱ्यांना वारंवार सांगुन सुद्धा ऐकण्यास तयार नाहीत उलट अरेरावीची भाषा वापरत आहेत.त्यामुळे मात्र सर्व सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत आहे.
संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून शेती पंपासाठी वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्युत ग्राहक करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा