हदगाव तालुका/ प्रतिनिधी (भगवान देशमुख)
सन २०२२-२३ आॕक्टोबर महिण्यात व अगोदर झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही.त्यामुळे चिंचगव्हाण येथील शेतकरी बालाजी दिगंबर घडबळे,सौ.वर्षा बालाजी घडबळे यांनी विमा कंपनीला रितसर ईमेल पाठवून पिकांच्या नुकसानी बाबत कळविले होते.त्यानंतर सदर पिकविमा कंपनीच्या प्रतिनीधींनी प्रत्यक्ष शेतात येऊन पंचनामा सुद्धा केला व ८०% नुकसान झाल्याचे लिहुन आमच्या सह्या घेऊन सुद्धा विमा कंपनी विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.
यामुळे सदर शेतकऱ्याने दिनांक २७ मार्च रोजी माननिय जिल्हाधिकारी नांदेड यांना योग्य ती कार्यवाही करुन मला न्याय मिळवून द्या अन्यथा १ मे २०२३ रोजी मी व माझी पत्नी आत्मदहन करणार असल्याचे कळविले होते.त्या निवेदनाबाबत कोनतेही अश्वासन न मिळाल्याने सदर शेतकरी दांम्पत्याने पुन्हा जिल्हाधिकारी नांदेड यांना दिनांक २४ एप्रिल रोजी स्मरण पत्र दिले, ३० एप्रिल पर्यंत कारवाई करा अन्यथा १ मे महाराष्ट्र दिनी आत्मदहन करणार असल्याचे कळविले.हेच निवेदन नांदेड येथील सदर कंपनीच्या कार्यालयात शेतकरी प्रत्यक्ष गेले असता,त्यांचे निवेदन ब्रँच मॕनेजर शोयब आलम यांनी घेण्यास नकार दिला.व आपण कंन्ज्युमर कोर्टात जाऊ शकता असा सल्ला दिला.प्रत्येक शेतकऱ्यांना कोर्टातच जाऊन विमा घ्यावा लागत असेल तर नुकसान झाल्यावर ७२ तासाच्या आत विमा कंपनीला कळवायचे,नंतर पंचनामा करुन घ्यायचा हा खटाटोप कशासाठी करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
एकुनच लोक प्रतिनिधी , प्रशासन व पिक विमा कंपनीच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ यावी यापेक्षा दुर्दैव कोणते असा प्रश्न आता भेडसावत आहे.
सदर बाबतीत लोकप्रतिनीधी,प्रशासन ,व पिकविमा कंपनीने तात्काळ कारवाई करुन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या शेतकरी दाम्पत्याला न्याय मिळवुन द्यावा, अशी शेतकरी बालाजी घडबळे,व सौ.वर्षा घडबळे यांनी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा